शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

लोकमत इम्पॅक्ट : महापालिकेचे डोळे उघडले, जन्माच्या दाखल्यावर टाकताहेत नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 21:26 IST

NMC Birth Certificate १५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या जन्म दाखल्यावर नाव टाकण्याचा आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही नागपूर महापालिका अनभिज्ञ होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाचे डोळे उघडले आणि जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएप्रिल २०२६ पर्यंत नागरिकांना मिळाली सवलत

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : १५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांच्या जन्म दाखल्यावर नाव टाकण्याचा आदेश राज्य शासनाने दिल्यानंतरही नागपूर महापालिका अनभिज्ञ होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाचे डोळे उघडले आणि जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरु करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या आरोग्य उपसंचालक व उपमुख्य निबंधक कार्यालयाच्या वतीने महापालिकेला ई मेल पाठवून संबंधित आदेशाची अंमलबजावणी करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु महापालिकेच्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्र विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी ई मेलची पडताळणी केली. सोबतच आदेशाची सत्यता तपासण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने पत्र लिहिण्यात आले. जन्म मृत्यु प्रमाणपत्र विभागाला आदेशाचा ई मेल आल्याची माहिती मिळाल्यानंतर जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. १५ वर्ष वयापर्यंत जन्माच्या दाखल्यावर नाव टाकता येऊ शकते. परंतु त्यापेक्षा अधिक वय झाल्यानंतर जन्माच्या दाखल्यावर नाव टाकणे बंद करण्यात आले होते. राज्य शासनाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पासपोर्ट, आधारकार्डसह अनेक कागदपत्रांवर नाव टाकण्यासाठी जन्माचा दाखला महत्वाचा असतो. राज्य शासनाने १५ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांचे नाव जन्माच्या दाखल्यावर टाकण्याची सुविधा २७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविली आहे. उल्लेखनिय म्हणजे राज्य शासनाने यापुर्वी जन्माच्या दाखल्यावर नाव टाकण्यासाठी तीन वेळा सवलत दिली आहे. सर्वात आधी २६ ऑक्टोबर २००५ पासून २५ ऑक्टोबर २००७, दुसऱ्यांदा एक जानेवारी २०१३ पासून १३ डिसेंबर २०१४ आणि १५ मे २०१५ पासून १४ मे २०२० पर्यंत सवलत दिली होती. पाच वर्ष नाव टाकण्याची सवलत दिल्याची अधिसुचना जारी झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नागरिकांमध्ये करणार जागृती

जन्म मृत्यु प्रमाणपत्र नोंदणी विभागाचे आरोग्य अधिकारी व उपनिबंधक डॉ. अतीक उर रहमान खान यांनी सांगितले की, जन्माच्या प्रमाणपत्रावर नाव टाकण्याचा कालावधी राज्य शासनाने एप्रिल २०२६ पर्यंत वाढविला आहे. या आदेशानंतर नाव नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना जागरुक करण्यात येईल. ज्यांची नाव नोंद झाले नाही त्यांनी येऊन आपल्या नावाची नोंदणी करावी, असे ते म्हणाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका