शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

लोकमत इम्पॅक्ट : २१९ दिवसानंतर धावणार आपली बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 21:25 IST

Apali bus, NMC, lastly run, Nagpur news कोरोनामुळे २१९ दिवसापासून बंद असलेली आपली बस उद्या बुधवारी २८ ऑक्टोबरपासून शहरातील रस्त्यांवर धावणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्देटप्प्याटप्प्यात सुरू होणार बस : नागरिकांना मिळणार दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे २१९ दिवसापासून बंद असलेली आपली बस उद्या बुधवारी २८ ऑक्टोबरपासून शहरातील रस्त्यांवर धावणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार बस ३० टक्के क्षमतेने चालविल्या जाणार आहे. संक्रमण न वाढल्यास पुढे क्षमता वाढविण्याला अनुमती दिली जाईल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धोरणानुसार बस चालविल्या जाणार आहे. यासंदर्भात परिवहन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

राज्यातील बहुतांश शहरात शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु नागपुरात या संदर्भात निर्णय होत नसल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी होती. याचा विचार करता ‘लोकमत’ने मागील दोन महिन्यात अनेकदा वृत्त प्रकाशित करून याचा पाठपुरावा केला. याची दखल घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अनेक सामाजिक संघ्टनांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली. बस सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. परंतु मनपातील सत्तापक्षाने यावर बघ्याची भूमिका घतेली. राज्यातील अन्य शहरात बस सेवा सुरू झाल्याने प्रशासनाकडे बस बंद ठेवण्याला उत्तर नव्हते. सामान्य दिवसात नागपुरात रस्त्यावर ३६० बस धावतात. परंतु सुरुवातीला १२० ते १५० बस धावणार आहेत. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बसची संख्या वाढवली जाणार आहे. बस सेवा सुरू करण्यासंदर्भात महापौर संदीप जोशी, आयुक्त राधाकृष्णन बी., परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी टप्प्याटप्प्याने बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर परिवहन समितीने बैठक घेऊन या निर्णयाची माहिती दिली.

जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न

शहर बस सेवेसाठी मनपा अर्थसंकल्पात २०२०-२१ या वर्षासाठी १०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ८५ कोटी खर्च झाले. शहर बस तोट्यात असल्याने जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न मनपा प्रशासन करीत आहे. सत्तापक्षातील काही नेत्यांनी मेट्रो रेल्वेने शहर बसची जबाबदारी घ्यावी यासाठी प्रयत्न चालविला आहे. परंतु अद्याप मेट्रो आपल्या पायावर उभी राहिलेली नाही. यापूर्वीही असा प्रयत्न झाला होता. पण यश मिळाले नाही.

नियमाचे पालन करावे लागेल-बोरकर

बुधवारपासून शहर बस सुरू होत आहे. परंतु कोविड संसर्ग टाळण्यासाठी दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल. सुरक्षित अंतर व मास्क लावणे, सॅनिटायजेशन अशा नियमांचे पालन करावे लागेल, अशी माहिती परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाPublic Transportसार्वजनिक वाहतूक