शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

लोकमत दिवाळी उत्सव २०१८ प्रसिद्ध झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 10:57 IST

राजकारण, समाजकारण, लोककारण आणि मनोरंजन व चिंतन असे बहुआयामी विषय घेऊन आलेला लोकमत दिवाळी उत्सव २०१८ वैचारिक दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे.

ठळक मुद्देवैचारिक खाद्यमेवा मान्यवरांच्या व्यक्तिरेखाआगामी राजसत्तेचा कानोसा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकारण, समाजकारण, लोककारण आणि मनोरंजन व चिंतन असे बहुआयामी विषय घेऊन आलेला लोकमत दिवाळी उत्सव २०१८ वैचारिक दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे.देशात सुरू असलेल्या विद्यमान घडामोडी आणि नव्या वर्षात होऊ घातलेल्या निवडणुकांबाबतचा, मोदी विरुद्ध राहूल असा परिसंवाद या अंकाचे मुख्य आकर्षण ठरला आहे. या परिसंवादात काँग्रेसचे खजिनदार अहमद पटेल यांची विशेष मुलाखत वाचता येणार आहे. त्याचसोबत प्रकाश जावडेकर, दत्तप्रसाद दाभोळकर, प्रकाश बाळ जोशी, सुरेश भटेवरा आणि संकल्प गुर्जर यांचे समीक्षापर लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.भारतातील समधर्मसमभावा पुढील आव्हाने या विषयावर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी आणि सुरेश द्वादशीवार यांचे चिंतनपर लेख आहेत.समाजावर आपल्या प्रतिभेची, कर्तृत्वाची छाप सोडणाऱ्या व्यक्तिंच्या विलक्षण व्यक्तिरेखा या अंकाचे दुसरे वैशिष्ट्य आहे. ज्यांच्या निधनाने हिंदी साहित्यसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली अशा कवी नीरज यांच्या प्रतिभेविषयी सांगत आहेत, लक्ष्मीकांत देशमुख. बंडखोर लेखिका असा ज्यांचा परिचय आहे त्या कविता महाजन आणि ज्येष्ठ कवी तुळशीराम काजे या दोन साहित्यिकांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या निकटवर्तियांनी रेखाटल्या आहेत. अवघ्या देशात ज्यांच्या नावाचा दबदबा आहे, असे रा.स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मा.गो. वैद्य उपाख्य बाबूराव यांची दमदार व्यक्तिरेखा रेखाटली आहे, ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी यांनी. कायदा, समाजकारण, गांधीविचार आणि प्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रेसर न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याविषयी लिहिले आहे, डॉ. रुपा कुलकर्णी यांनी. महाराष्ट्रातील स्त्री चळवळीला ज्यांनी गतीमान केले अशा विद्या बाळ यांच्याविषयी सांगत आहेत, गिताली वि.मं. तु. शं कुलकर्णी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे मधू जामकर यांनी. कथा विभागात वसंत आबाजी डहाके, गिरीजा कीर, महाबळेश्वर सैल, दामोदर मावजो, विश्राम गुप्ते, डॉ. विजया वाड, सुप्रिया अय्यर, द.ता. भोसले, रेखा बैजल, माधवी भट, जगदीश पाटील, राजा शिरगुप्पे या मान्यवरांच्या कथा आहेत. कविता विभागात चित्तरंजन भट, तुळशीराम काजे, प्रवीण दवणे, सदानंद देशमुख, रेषा आकोटकर, अनुपमा उजगरे, जुई कुलकर्णी यांच्यासह अनेक उत्तमोत्तम कवींचा समावेश आहे. सुधाकर नातू यांनी वर्तविलेले संपूर्ण वर्षाचे राशीभविष्य यात समाविष्ट केले आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळी