शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

लोकसभा नागपूर २००४; काँग्रेसची अनोखी ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:06 IST

एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले.

 योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकीत देशाचे वातावरण बदलायला लागले होते. ‘शायनिंग इंडिया’चे वारे देशभरात वाहत होते. शिवाय १९९६ ते १९९९ या काळातील राजकीय अस्थिरतादेखील संपली होती. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज राजकीय धुरिणांकडून वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले. विलास मुत्तेमवार यांनी सलग तिसऱ्यांदा नागपुरातून विजय मिळविला. अशा प्रकारची ‘हॅटट्रीक’ करणारे ते पहिलेच उमेदवार ठरले.१९९९ ते २००४ या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल भाजपाला प्रचंड विश्वास होता. देशात ‘इंडिया शायनिंग’ची मोहीम राबविण्यात आली होती. वाजपेयी सरकारने सात महिने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेचा कालावधी आॅक्टोबर २००४ पर्यंत असताना, मे महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. देशात ‘फील गुड फॅक्टर’चा फायदा घेण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले होते.नागपुरात काँग्रेसने परत एकदा विलास मुत्तेमवार यांनाच उमेदवारी दिली. मात्र खरी गोची झाली होती ती भाजपाची. विलास मुत्तेमवार यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत अनेक दिवस बैठकांचा जोर चालला. अखेर भाजपाचे साधे सदस्यही नसलेले माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंह यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी हा संघभूमीत एक नवा प्रयोगच होता. तर नागपुरातून तीनदा खासदार राहिलेले तसेच काँग्रेस व भाजपावासी राहिलेल्या बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील विदर्भ राज्य पार्टीतर्फे आव्हान उभे केले. त्यामुळे नागपुरात तिरंगी लढत असल्याचे मानण्यात येत होते. याशिवाय बसपातर्फे जयंत दळवी, अपक्ष म्हणून प्रकाश निमजे हेदेखील उभे झाले होते. नागपूर लोकसभेच्या रणधुमाळीत एकूण १४ उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.विलास मुत्तेमवार यांनी कार्गो हब, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिहान या मुद्यांवर प्रचार सुरू केला होता. विलास मुत्तेमवार यांना नेमकी यंत्रणा, जातीय समीकरणे यांची चांगलीच जाण होती. तर अटलबहादूर सिंह यांची प्रामाणिक छबी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचे काम या मुद्यांवर भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात उतरले. अटलबहादूर सिंह हे तीन दशकांपासून नागपूरच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे नाव सर्वांनाच परिचित होते. त्यांची हयात ही धर्मनिरपेक्ष संघटनांसाठी काम करण्यात गेली होती. मात्र ते मूळचे भाजप व संघाचे नसल्यामुळे पक्षातील ‘कमिटेड’ मतांची नाराजी कुठेतरी भोवेल का असा प्रश्नदेखील उपस्थित होत होता. एकेकाळी महानगरपालिकेत ‘किंगमेकर’ राहिलेले अटलबहादूर आता स्वत:च ‘किंग’ बनण्यासाठी सरसावले होते. बनवारीलाल पुरोहित यांनी विदर्भ हाच प्रचाराचा मुद्दा बनविला होता व विदर्भवादी त्यांच्या पाठीशी होते.लोकसभेचे निकाल जाहीर झाले तेव्हा विदर्भात सगळीकडे युतीचा झेंडा होता. मात्र नागपुरात परत एकदा भाजपा-शिवसेनेला अपयशाचा सामना करावा लागला. ४७.१६ टक्के मतांसह मुत्तेमवार यांनी परत एकदा विजय मिळविला. अटलबहादूर सिंह यांच्या वाट्याला ३४.६१ टक्के मतं आली. मुत्तेमवार यांचे मताधिक्य हे सुमारे एक लाखाचे होते. बनवारीलाल पुरोहित हे ३.५२ टक्के मतांसह थेट पाचव्या स्थानावर घसरले.

‘अटल’साठी ‘अटल’जींची सभा१६ मार्च २००४ रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वाजपेयी यांची कस्तूरचंद पार्कवर झालेली सभा ‘हाऊसफुल्ल’ ठरली होती. यावेळी त्यांनी अमेरिकेसह कुणासमोरही झुकणार नाही, असे म्हणत ‘न दैन्यम्, न पलायनम्’ या शब्दांत आपली भूमिका मांडली होती. अर्जुनासारखा मी मैदानात कायम राहील, कुणाच्या दबावाखाली येणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, असे म्हणत ‘पोखरण’ येथे केलेल्या अणूचाचण्यांवर भाष्य केले होते. या सभेत भाषण संपवून बसण्याअगोदर वाजपेयी यांनी अटलबहादूर सिंग यांना हात धरून समोर आणले. ‘मी समजत होतो केवळ अटल असणेच पुरेसे असते. पण येथे अटल बहादूर झाले आणि वरून सिंह’, अशी शाब्दिक कोटी करताच मैदानात खसखस पिकली होती. याच सभेत मी कधीही इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’ म्हटले नाही, अशी त्यांनी स्पष्टोक्ती केली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक