शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

लोकसभा नागपूर २००४; काँग्रेसची अनोखी ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 11:06 IST

एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले.

 योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: एकविसाव्या शतकातील पहिल्या लोकसभा निवडणुका २००४ साली झाल्या. या निवडणुकीत देशाचे वातावरण बदलायला लागले होते. ‘शायनिंग इंडिया’चे वारे देशभरात वाहत होते. शिवाय १९९६ ते १९९९ या काळातील राजकीय अस्थिरतादेखील संपली होती. या निवडणुकांत परत एकदा भाजपाचीच सत्ता येईल, असा अंदाज राजकीय धुरिणांकडून वर्तविण्यात येत होता. मात्र सर्व फासे उलटे पडले व देशासह नागपुरातदेखील काँग्रेसला यश मिळाले. विलास मुत्तेमवार यांनी सलग तिसऱ्यांदा नागपुरातून विजय मिळविला. अशा प्रकारची ‘हॅटट्रीक’ करणारे ते पहिलेच उमेदवार ठरले.१९९९ ते २००४ या कालावधीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कामगिरीबद्दल भाजपाला प्रचंड विश्वास होता. देशात ‘इंडिया शायनिंग’ची मोहीम राबविण्यात आली होती. वाजपेयी सरकारने सात महिने निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. लोकसभेचा कालावधी आॅक्टोबर २००४ पर्यंत असताना, मे महिन्यात लोकसभा निवडणुका घेण्यात आल्या. देशात ‘फील गुड फॅक्टर’चा फायदा घेण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आले होते.नागपुरात काँग्रेसने परत एकदा विलास मुत्तेमवार यांनाच उमेदवारी दिली. मात्र खरी गोची झाली होती ती भाजपाची. विलास मुत्तेमवार यांच्यासमोर कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत अनेक दिवस बैठकांचा जोर चालला. अखेर भाजपाचे साधे सदस्यही नसलेले माजी महापौर सरदार अटलबहादूर सिंह यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी हा संघभूमीत एक नवा प्रयोगच होता. तर नागपुरातून तीनदा खासदार राहिलेले तसेच काँग्रेस व भाजपावासी राहिलेल्या बनवारीलाल पुरोहित यांनीदेखील विदर्भ राज्य पार्टीतर्फे आव्हान उभे केले. त्यामुळे नागपुरात तिरंगी लढत असल्याचे मानण्यात येत होते. याशिवाय बसपातर्फे जयंत दळवी, अपक्ष म्हणून प्रकाश निमजे हेदेखील उभे झाले होते. नागपूर लोकसभेच्या रणधुमाळीत एकूण १४ उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते.विलास मुत्तेमवार यांनी कार्गो हब, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिहान या मुद्यांवर प्रचार सुरू केला होता. विलास मुत्तेमवार यांना नेमकी यंत्रणा, जातीय समीकरणे यांची चांगलीच जाण होती. तर अटलबहादूर सिंह यांची प्रामाणिक छबी, अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचे काम या मुद्यांवर भाजपाचे कार्यकर्ते प्रचारात उतरले. अटलबहादूर सिंह हे तीन दशकांपासून नागपूरच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात कार्यरत होते. त्यामुळे त्यांचे नाव सर्वांनाच परिचित होते. त्यांची हयात ही धर्मनिरपेक्ष संघटनांसाठी काम करण्यात गेली होती. मात्र ते मूळचे भाजप व संघाचे नसल्यामुळे पक्षातील ‘कमिटेड’ मतांची नाराजी कुठेतरी भोवेल का असा प्रश्नदेखील उपस्थित होत होता. एकेकाळी महानगरपालिकेत ‘किंगमेकर’ राहिलेले अटलबहादूर आता स्वत:च ‘किंग’ बनण्यासाठी सरसावले होते. बनवारीलाल पुरोहित यांनी विदर्भ हाच प्रचाराचा मुद्दा बनविला होता व विदर्भवादी त्यांच्या पाठीशी होते.लोकसभेचे निकाल जाहीर झाले तेव्हा विदर्भात सगळीकडे युतीचा झेंडा होता. मात्र नागपुरात परत एकदा भाजपा-शिवसेनेला अपयशाचा सामना करावा लागला. ४७.१६ टक्के मतांसह मुत्तेमवार यांनी परत एकदा विजय मिळविला. अटलबहादूर सिंह यांच्या वाट्याला ३४.६१ टक्के मतं आली. मुत्तेमवार यांचे मताधिक्य हे सुमारे एक लाखाचे होते. बनवारीलाल पुरोहित हे ३.५२ टक्के मतांसह थेट पाचव्या स्थानावर घसरले.

‘अटल’साठी ‘अटल’जींची सभा१६ मार्च २००४ रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वाजपेयी यांची कस्तूरचंद पार्कवर झालेली सभा ‘हाऊसफुल्ल’ ठरली होती. यावेळी त्यांनी अमेरिकेसह कुणासमोरही झुकणार नाही, असे म्हणत ‘न दैन्यम्, न पलायनम्’ या शब्दांत आपली भूमिका मांडली होती. अर्जुनासारखा मी मैदानात कायम राहील, कुणाच्या दबावाखाली येणार नाही, कुणासमोर झुकणार नाही, असे म्हणत ‘पोखरण’ येथे केलेल्या अणूचाचण्यांवर भाष्य केले होते. या सभेत भाषण संपवून बसण्याअगोदर वाजपेयी यांनी अटलबहादूर सिंग यांना हात धरून समोर आणले. ‘मी समजत होतो केवळ अटल असणेच पुरेसे असते. पण येथे अटल बहादूर झाले आणि वरून सिंह’, अशी शाब्दिक कोटी करताच मैदानात खसखस पिकली होती. याच सभेत मी कधीही इंदिरा गांधी यांना ‘दुर्गा’ म्हटले नाही, अशी त्यांनी स्पष्टोक्ती केली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक