शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

लोकसभा नागपूर १९७१; विदर्भवाद्यांच्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:01 IST

देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता. तर १९७१ सालीदेखील विदर्भवादी नेत्यासमोरच कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला. विशेष विशेष म्हणजे दोन्ही वेळेला कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा हेच उमेदवार होते. विदर्भवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव धोटे हे संसदेत पोहोचले.१९७१ ची निवडणूक ही खरे तर मध्यावधी निवडणूक ठरली. त्या निवडणुकांमध्ये नागपुरातून पाच उमेदवार मैदानात होते. यात कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा, फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबुवंतराव धोटे, खोरिपाचे काट्टी अप्पा, भाकपाचे ए.बी.बर्धन, व अपक्ष उमेदवार वहाब होते. विशेष म्हणजे जनसंघाने या निवडणुकांत उमेदवार उभा केला नव्हता. १९६९ साली कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेस पक्ष दुभंगला होता. इंदिरा गांधी यांचे समर्थन करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांचा जास्त कल होता. विदर्भात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची लाटच दिसून येत होती. त्यामुळेच नागपूरची जागादेखील कॉंग्रेसला सहज मिळेल असा कयास वर्तविण्यात येत होता.विदर्भाच्या आंदोलनामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले जांबुवंतराव धोटे हे यवतमाळ तसेच नागपूर अशा दोन्ही जागांवर उभे होते. धोटे हे १९६७ साली यवतमाळ येथून निवडणूक लढले होते, मात्र त्यावेळी त्यांच्या पदरी अपयश आले होते. परंतु त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा अनुभव मिळाला होता. विधिमंडळात १९६२ आणि १९६७ या दोन्ही निवडणुकांत जिंकून ते गेले होते व विदर्भवीर म्हणून त्यांची ओळख होती. स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन जोरात सुरू होते. धोटे यांच्याकडे विदर्भात अपेक्षेने पाहिले जायचे. त्यामुळे विदर्भवादी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे होते. ए.बी.बर्धन हेदेखील मोठे नाव होते व मागील निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर त्यांना यंदा यश मिळेल अशी आशा कामगार वर्गाला होती. त्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही १० टक्क्यांच्या जवळपास घटली व त्यामुळे प्रत्येकच पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.मतगणना होत असताना प्रत्येक क्षण उत्कंठावर्धक होता. कधी शर्मा तरी कधी धोटे समोर होते. प्रत्येक फेरीनंतर कल इकडेतिकडे होत होता. अखेर जांबुवंतराव धोटे यांना १ लाख २५ हजार ५५२ मतं (३७.०९ टक्के) मिळाली तर रिखबचंद शर्मा यांना १ लाख २३ हजार ४९६ मतं (३६.४८ टक्के) प्राप्त झाली. अखेरपर्यंत रंगलेल्या लढतीत धोटे यांनी २ हजार ५६ मतांनी बाजी मारली होती. कट्टी अप्पा यांना १६.२६ टक्के मतं मिळाली. तर ए.बी.बर्धन यांना केवळ ९.९७ टक्के मतं मिळाली व ते चौथ्या स्थानी राहिले. अपक्ष उमेदवाराला केवळ ६५१ मतं मिळाली व त्यांची जमानत जप्त झाली होती.शर्मांनी निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले. मात्र हा खटला धोटे यांनीच जिंकला.-योगेश पांडे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक