शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

लोकसभा नागपूर १९७१; विदर्भवाद्यांच्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 14:01 IST

देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशातील पाचवी लोकसभा निवडणूक ही दुसऱ्यांदा कॉंग्रेसला धक्का देणारी ठरली. १९६२ साली कॉंग्रेसच्या उमेदवाराचा विदर्भवादी बापूजी अणे यांनी पराभव केला होता. तर १९७१ सालीदेखील विदर्भवादी नेत्यासमोरच कॉंग्रेसला पराभव पत्करावा लागला. विशेष विशेष म्हणजे दोन्ही वेळेला कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा हेच उमेदवार होते. विदर्भवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या ऊर्जेमुळे जांबुवंतराव धोटे हे संसदेत पोहोचले.१९७१ ची निवडणूक ही खरे तर मध्यावधी निवडणूक ठरली. त्या निवडणुकांमध्ये नागपुरातून पाच उमेदवार मैदानात होते. यात कॉंग्रेसकडून रिखबचंद शर्मा, फॉरवर्ड ब्लॉकतर्फे जांबुवंतराव धोटे, खोरिपाचे काट्टी अप्पा, भाकपाचे ए.बी.बर्धन, व अपक्ष उमेदवार वहाब होते. विशेष म्हणजे जनसंघाने या निवडणुकांत उमेदवार उभा केला नव्हता. १९६९ साली कॉंग्रेसचे दोन तुकडे झाले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच कॉंग्रेस पक्ष दुभंगला होता. इंदिरा गांधी यांचे समर्थन करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसकडे कार्यकर्त्यांचा जास्त कल होता. विदर्भात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाची लाटच दिसून येत होती. त्यामुळेच नागपूरची जागादेखील कॉंग्रेसला सहज मिळेल असा कयास वर्तविण्यात येत होता.विदर्भाच्या आंदोलनामुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले जांबुवंतराव धोटे हे यवतमाळ तसेच नागपूर अशा दोन्ही जागांवर उभे होते. धोटे हे १९६७ साली यवतमाळ येथून निवडणूक लढले होते, मात्र त्यावेळी त्यांच्या पदरी अपयश आले होते. परंतु त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याचा अनुभव मिळाला होता. विधिमंडळात १९६२ आणि १९६७ या दोन्ही निवडणुकांत जिंकून ते गेले होते व विदर्भवीर म्हणून त्यांची ओळख होती. स्वतंत्र विदर्भासाठीचे आंदोलन जोरात सुरू होते. धोटे यांच्याकडे विदर्भात अपेक्षेने पाहिले जायचे. त्यामुळे विदर्भवादी मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे होते. ए.बी.बर्धन हेदेखील मोठे नाव होते व मागील निवडणुकांत झालेल्या पराभवानंतर त्यांना यंदा यश मिळेल अशी आशा कामगार वर्गाला होती. त्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही १० टक्क्यांच्या जवळपास घटली व त्यामुळे प्रत्येकच पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.मतगणना होत असताना प्रत्येक क्षण उत्कंठावर्धक होता. कधी शर्मा तरी कधी धोटे समोर होते. प्रत्येक फेरीनंतर कल इकडेतिकडे होत होता. अखेर जांबुवंतराव धोटे यांना १ लाख २५ हजार ५५२ मतं (३७.०९ टक्के) मिळाली तर रिखबचंद शर्मा यांना १ लाख २३ हजार ४९६ मतं (३६.४८ टक्के) प्राप्त झाली. अखेरपर्यंत रंगलेल्या लढतीत धोटे यांनी २ हजार ५६ मतांनी बाजी मारली होती. कट्टी अप्पा यांना १६.२६ टक्के मतं मिळाली. तर ए.बी.बर्धन यांना केवळ ९.९७ टक्के मतं मिळाली व ते चौथ्या स्थानी राहिले. अपक्ष उमेदवाराला केवळ ६५१ मतं मिळाली व त्यांची जमानत जप्त झाली होती.शर्मांनी निवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले. मात्र हा खटला धोटे यांनीच जिंकला.-योगेश पांडे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक