शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
2
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
3
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
4
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ
5
समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले...
6
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
7
८ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! RBI च्या घोषणेनंतर बाजारात जोरदार उसळी! टॉप गेनर्स-लूजर्स पाहा
8
भारतावर टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पवर काय वेळ आली, कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत; शटडाऊनची नामुष्की
9
जिंकलंस मित्रा! कॉन्स्टेबलने IPS बनून घेतला अपमानाचा बदला; बॅक टू बॅक क्रॅक केली UPSC
10
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
11
मोठ्या पडद्यावर फ्लॉप पण बिझनेसमध्ये केली कमाल, चालवतोय १०००० कोटींची कंपनी; कमाईच्या बाबतीत अनेकांना टाकलं मागे
12
ट्रम्पसमोर नेतन्याहूंनी फोनवर कुणाची माफी मागितली? इस्रायल-गाझा युद्ध थांबवण्यात महत्वाची भूमिका
13
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
14
सारा तेंडुलकर जेव्हा पापाराझी समोर मराठीत बोलते...; Viral Video पाहून नेटकरीही पडले प्रेमात
15
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
16
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
18
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
19
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
20
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर

लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:48 IST

१९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली. १९५२ साली पूर्व विदर्भ महिला परिषदेची स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावर जागा मिळवून दिली. आजवर या इमारतीच्या माध्यमातून हजारो महिलांना आसरा मिळाला आहे. अनसुयाबाई काळे यांनी आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यातून आदर्श निर्माण केला होता.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात लढलेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. १९५२ प्रमाणे १९५७ च्या या निवडणुकांतदेखील नागपूरने इतिहास घडविला. नागपूरच्या पहिल्यावहिल्या खासदार अनसूयाबाई काळे यांनी सातत्याने दुसऱ्यांदा विजय मिळवीत महिलाशक्तीचा परिचय करून दिला होता.मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने आठऐवजी विदर्भात नऊ मतदारसंघ तयार केले. यात नागपूरचे स्थान महत्त्वाचे होते. १९५२ ते १९५७ दरम्यानची कामगिरी लक्षात घेता, काँग्रेसने परत अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते. तर ‘आॅल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन’तर्फे हरिदास आवाडे हे कट्टर प्रतिस्पर्धी मानण्यात येत होते. याव्यतिरिक्त नरेंद्र देवघरे हे प्रजा सोशालिस्ट पक्ष तसेच के.डी. परांजपे हे अपक्ष म्हणून उभे होते. केवळ चारच उमेदवार रिंगणात होते व त्यामुळे सर्वांनी आपापल्यापरीने जोरदार प्रचार केला होता. १९५२ च्या तुलनेत या निवडणुकांत मतदान किंचित वाढले व मतदानाची टक्केवारी सुमारे ६० टक्के इतकी होती. अनसूयाबाई काळे यांच्या मतांमध्ये घट झाली, मात्र ४६.८३ टक्के मतं प्राप्त करीत त्यांनीच विजय मिळविला. दुसºया स्थानावर आवाडे राहिले.त्यांना २८.८६ टक्के मते मिळाली होती. तिसºया स्थानी आलेल्या प्रजा सोशालिस्ट पक्षाच्या उमेदवाराने सर्वांना अचंबित करीत २२.३८ टक्के मतं प्राप्त केली होती. परांजपे यांच्या वाट्याला मात्र केवळ १.९२ टक्के मते आली होती.

विदेशातदेखील दाखविले कर्तृत्वअनसूयाबाई या नागपूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात १९३० पासूनच कार्यरत होत्या. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा स्थापन केली होती. कॅनडातील अखिल विश्व महिला संमेलनात त्यांनी भारतीय महिलांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९२८ मध्ये त्या सी.पी.अ‍ॅन्ड बेरार लेजिल्सेटिव्ह कौन्सिलच्या प्रथम महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. १९३३ मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन दौरा काढला होता. त्यात अनसूयाबाईदेखील महात्मा गांधी यांच्यासोबत मध्य प्रांतात होत्या. १९३५ मध्ये त्या मध्य प्रांत विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणूनदेखील निवडून आल्या. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सरकारी पदाचा त्याग केला व तुरुंगवास देखील भोगला. १९४३ साली चिमूर आष्टी येथे दडपशाहीने हत्याकांड झाले व यात सात जणांना फाशीची शिक्षा झाली. या सात भारतीयांना वाचविण्यासाठी काळे यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक