शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:48 IST

१९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली. १९५२ साली पूर्व विदर्भ महिला परिषदेची स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावर जागा मिळवून दिली. आजवर या इमारतीच्या माध्यमातून हजारो महिलांना आसरा मिळाला आहे. अनसुयाबाई काळे यांनी आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यातून आदर्श निर्माण केला होता.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात लढलेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. १९५२ प्रमाणे १९५७ च्या या निवडणुकांतदेखील नागपूरने इतिहास घडविला. नागपूरच्या पहिल्यावहिल्या खासदार अनसूयाबाई काळे यांनी सातत्याने दुसऱ्यांदा विजय मिळवीत महिलाशक्तीचा परिचय करून दिला होता.मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने आठऐवजी विदर्भात नऊ मतदारसंघ तयार केले. यात नागपूरचे स्थान महत्त्वाचे होते. १९५२ ते १९५७ दरम्यानची कामगिरी लक्षात घेता, काँग्रेसने परत अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते. तर ‘आॅल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन’तर्फे हरिदास आवाडे हे कट्टर प्रतिस्पर्धी मानण्यात येत होते. याव्यतिरिक्त नरेंद्र देवघरे हे प्रजा सोशालिस्ट पक्ष तसेच के.डी. परांजपे हे अपक्ष म्हणून उभे होते. केवळ चारच उमेदवार रिंगणात होते व त्यामुळे सर्वांनी आपापल्यापरीने जोरदार प्रचार केला होता. १९५२ च्या तुलनेत या निवडणुकांत मतदान किंचित वाढले व मतदानाची टक्केवारी सुमारे ६० टक्के इतकी होती. अनसूयाबाई काळे यांच्या मतांमध्ये घट झाली, मात्र ४६.८३ टक्के मतं प्राप्त करीत त्यांनीच विजय मिळविला. दुसºया स्थानावर आवाडे राहिले.त्यांना २८.८६ टक्के मते मिळाली होती. तिसºया स्थानी आलेल्या प्रजा सोशालिस्ट पक्षाच्या उमेदवाराने सर्वांना अचंबित करीत २२.३८ टक्के मतं प्राप्त केली होती. परांजपे यांच्या वाट्याला मात्र केवळ १.९२ टक्के मते आली होती.

विदेशातदेखील दाखविले कर्तृत्वअनसूयाबाई या नागपूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात १९३० पासूनच कार्यरत होत्या. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा स्थापन केली होती. कॅनडातील अखिल विश्व महिला संमेलनात त्यांनी भारतीय महिलांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९२८ मध्ये त्या सी.पी.अ‍ॅन्ड बेरार लेजिल्सेटिव्ह कौन्सिलच्या प्रथम महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. १९३३ मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन दौरा काढला होता. त्यात अनसूयाबाईदेखील महात्मा गांधी यांच्यासोबत मध्य प्रांतात होत्या. १९३५ मध्ये त्या मध्य प्रांत विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणूनदेखील निवडून आल्या. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सरकारी पदाचा त्याग केला व तुरुंगवास देखील भोगला. १९४३ साली चिमूर आष्टी येथे दडपशाहीने हत्याकांड झाले व यात सात जणांना फाशीची शिक्षा झाली. या सात भारतीयांना वाचविण्यासाठी काळे यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक