शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा नागपूर १९५७; नागपूरकरांनी परत टाकला महिलाशक्तीवर विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:48 IST

१९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: १९५२ नंतर १९५७ च्या निवडणुकीतदेखील अनसुयाबाई काळे यांच्या गळ््यात विजयश्रीची माळ पडली. १९५२ साली पूर्व विदर्भ महिला परिषदेची स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी उत्तर अंबाझरी मार्गावर जागा मिळवून दिली. आजवर या इमारतीच्या माध्यमातून हजारो महिलांना आसरा मिळाला आहे. अनसुयाबाई काळे यांनी आपल्या कार्यकाळात महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यातून आदर्श निर्माण केला होता.पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात लढलेल्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकांत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली होती. १९५२ प्रमाणे १९५७ च्या या निवडणुकांतदेखील नागपूरने इतिहास घडविला. नागपूरच्या पहिल्यावहिल्या खासदार अनसूयाबाई काळे यांनी सातत्याने दुसऱ्यांदा विजय मिळवीत महिलाशक्तीचा परिचय करून दिला होता.मतदारसंघ पुनर्रचना आयोगाने आठऐवजी विदर्भात नऊ मतदारसंघ तयार केले. यात नागपूरचे स्थान महत्त्वाचे होते. १९५२ ते १९५७ दरम्यानची कामगिरी लक्षात घेता, काँग्रेसने परत अनसूयाबाई काळे यांनाच तिकीट दिले होते. तर ‘आॅल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशन’तर्फे हरिदास आवाडे हे कट्टर प्रतिस्पर्धी मानण्यात येत होते. याव्यतिरिक्त नरेंद्र देवघरे हे प्रजा सोशालिस्ट पक्ष तसेच के.डी. परांजपे हे अपक्ष म्हणून उभे होते. केवळ चारच उमेदवार रिंगणात होते व त्यामुळे सर्वांनी आपापल्यापरीने जोरदार प्रचार केला होता. १९५२ च्या तुलनेत या निवडणुकांत मतदान किंचित वाढले व मतदानाची टक्केवारी सुमारे ६० टक्के इतकी होती. अनसूयाबाई काळे यांच्या मतांमध्ये घट झाली, मात्र ४६.८३ टक्के मतं प्राप्त करीत त्यांनीच विजय मिळविला. दुसºया स्थानावर आवाडे राहिले.त्यांना २८.८६ टक्के मते मिळाली होती. तिसºया स्थानी आलेल्या प्रजा सोशालिस्ट पक्षाच्या उमेदवाराने सर्वांना अचंबित करीत २२.३८ टक्के मतं प्राप्त केली होती. परांजपे यांच्या वाट्याला मात्र केवळ १.९२ टक्के मते आली होती.

विदेशातदेखील दाखविले कर्तृत्वअनसूयाबाई या नागपूरच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात १९३० पासूनच कार्यरत होत्या. त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा स्थापन केली होती. कॅनडातील अखिल विश्व महिला संमेलनात त्यांनी भारतीय महिलांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. १९२८ मध्ये त्या सी.पी.अ‍ॅन्ड बेरार लेजिल्सेटिव्ह कौन्सिलच्या प्रथम महिला सदस्य म्हणून निवडून आल्या. १९३३ मध्ये महात्मा गांधी यांनी हरिजन दौरा काढला होता. त्यात अनसूयाबाईदेखील महात्मा गांधी यांच्यासोबत मध्य प्रांतात होत्या. १९३५ मध्ये त्या मध्य प्रांत विधानसभेच्या उपाध्यक्ष म्हणूनदेखील निवडून आल्या. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी सरकारी पदाचा त्याग केला व तुरुंगवास देखील भोगला. १९४३ साली चिमूर आष्टी येथे दडपशाहीने हत्याकांड झाले व यात सात जणांना फाशीची शिक्षा झाली. या सात भारतीयांना वाचविण्यासाठी काळे यांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक