शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Lok Sabha Election 2019; सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 10:42 IST

सोशल मीडियावर तर खाली खुर्च्या दाखविण्याची होडच लागली आहे. पण या सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी? हा राजकीय विश्लेषकांसाठी चिंतनाचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देसभेच्या गर्दीवर कार्यकर्त्यांच्या फुशारक्यासभेत खुर्च्या रिकाम्या दाखविण्याची होड

मंगेश व्यवहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा रणसंग्राम सुरू झाला आहे. राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभेच्या फैरी झडत आहेत. पण या सभा खऱ्या अर्थाने गाजत आहेत, त्या गर्दीवरून. कुणाच्या सभेत किती खुर्च्या खाली, कुणाच्या सभेत किती गर्दी झाली यावर कार्यकर्त्यांच्या फुशारक्या मारणे सुरू आहे. सोशल मीडियावर तर खाली खुर्च्या दाखविण्याची होडच लागली आहे. पण या सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी? हा राजकीय विश्लेषकांसाठी चिंतनाचा विषय ठरत आहे.नुकतीच वर्धा जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा भरदुपारी झाली. सभेचे मैदान रिकामे असल्याचे फोटो व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेअर झाले. रिकाम्या खुर्च्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादीचे मोदी लाट ओसरल्याचा आव आणू लागले. दुसऱ्याच दिवशी भंडारा गोंदिया मतदारसंघात मोदींच्या झालेल्या सभेत भरभरून गर्दी झाली आणि सोशल मीडियावर परत भाजपा कार्यकर्त्यांनी ‘अबकी बार फीर मोदी सरकार...’ अशी बतावणी सुरू झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी नागपुरात सभा घेतली. संघाच्या भूमीत राहुल गांधीच्या सभेवर विशेष लक्ष लागले होते. नाही-नाही म्हणता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षेपेक्षा उत्स्फूर्त गर्दी जमवली. पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यातही रिकाम्या खुर्च्या शोधल्या. गडकरींच्या विधानसभानिहाय होत असलेल्या सभाही गाजत असल्या तरी काँग्रेस कार्यकर्ते त्यातूनही रिकाम्या खुर्च्या शोधून सोशल मीडियावर गडकरी संकटात असे भासवित आहेत.सोशल मीडियावर कार्यकर्त्यांच्या या फुशारक्या अ‍ॅन्टी प्रचाराचे एक माध्यम झाले आहे. भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळवून आपले नेते किती भारी याचा देखावा करीत आहेत.

मतदारांचा कौल निर्धारित करता येत नाहीटीव्ही आणि सोशल मीडियाच्या अतिरेकामुळे राष्ट्रीय नेत्यांचा क्रेझ जनतेमध्ये राहिला नाही. नेत्यांच्या प्रचार सभेत झालेली गर्दी अथवा राहिलेल्या रिकाम्या खुर्च्या याचा मतदानाशी काही संबंध नाही. शहरी आणि जागरुक मतदार सभेच्या भानगडीत पडतच नाही. गर्दी जमविणे ही राजकीय पक्षाची हातोटी असते. ऐनकेनप्रकारे नेत्यांच्या सभेला कशी गर्दी दिसेल हा त्यांचा प्रयत्न असतो. पण सभेच्या गर्दीवरून अथवा खाली खुर्च्यावरून मतदारांचा कौल निर्धारित करता येत नाही.-डॉ. मोहन काशीकर, विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019