शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Lok Sabha Election 2019; नागपूर जिल्ह्यातील काटोलात कोण लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 10:30 IST

भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. मात्र साडेतीन महिन्यासाठी काटोलचा आमदार कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेने दंड थोपटलेकाँग्रेसला राष्ट्रवादीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या काटोल विधानसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होऊ घातली आहे. मात्र साडेतीन महिन्यासाठी काटोलचा आमदार कोण होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळी युती आणि आघाडी नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप, सेनेने ही निवडणूक स्वतंत्र लढविली होती. मात्र आता युती आणि आघाडी झाल्याने या जागेवर कोण लढणार यासाठी राजकीय मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे. युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाते. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या जागेवर विजय मिळविल्याने ही जागा भाजपने लढवावी असा काटोल मतदारसंघातील भाजप नेत्यांचा आग्रह आहे. भाजपकडून येथे विधानसभा प्रभारी अविनाश ठाकरे, काटोल नगर परिषदेचे सत्तापक्षनेते चरणसिंग ठाकूर आणि काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी बाशिंग बांधले आहे. इकडे हा मतदारसंघ युतीत सेनेच्या वाट्याला येत असल्याने शिवसनेने काटोलसाठी कंबर कसली आहे. गतवेळी येथे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र हरणे यांनी निवडणूक लढविली होती.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मतदारसंघात आघाडी धर्म पाळण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात आघाडी असल्याने राष्ट्रवादीकडून जिल्हा काँग्रेसला काटोलसाठी प्रस्ताव आल्यास यावर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका जिल्हा काँग्रेसने व्यक्त केली आहे. २०१४ मध्ये येथे राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख यांनी तर काँग्रेसकडून दिनेश ठाकरे यांनी निवडणूक लढविली होती. यात दोघांनाही मतविभाजनाचा फटका बसला होता. २०१४ मध्ये येथे २१ उमेदवार रिंगणात होते.

२०१४ मध्ये काटोलमध्ये भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे पोटनिवडणूकही भाजपच लढविणार आहे. काटोल मतदारसंघातील भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी १९ ते २० मार्चला बैठक बोलविली आहे. यासोबत पक्षाकडून येथे सर्वेक्षण केले जाणार आहे. मात्र काटोलची जागा भाजप लढवेल हे निश्चित.- डॉ.राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष, भाजप

भाजप-सेनेची राज्यात युती झाली आहे. युतीत ही जागा सेनेच्या वाट्याला येते. काटोलसाठी सेनेचे दावा आहे. यासंदर्भात मंगळवारी मातोश्रीवर बैठक आहे.- राजेंद्र हरणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

काटोलबाबत जिल्हा राष्ट्रवादीकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आहे. काटोलसाठी राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यानंतर जिल्हा काँग्रेसमध्ये सकारात्मक चर्चा होईल. काटोलच्या स्थानिक नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांनी मते जाणून घेतली जातील. या बैठकीचा निर्णय प्रदेश काँग्रेसला कळविला जाईल.- राजेंद्र मुळक, अध्यक्ष, नागपूर जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटी.

आघाडीत काटोलची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. काटोलची पोटनिवडणूक लढण्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेऊ.- अनिल देशमुख, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९