शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नॉमिनेशनसाठी होणार धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 12:11 IST

रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देधुलिवंदन व शनिवार-रविवारची सुटी१९, २०, २२ व २५ असे चारच दिवस शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेक आणि नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. सोमवारपासून नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. २५ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. परंतु यादरम्यान तीन दिवस शासकीय सुटी असल्याने अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवस मिळत आहेत. तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना धावाधाव करावी लागणार आहे.राज्यात चार टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानुसार पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघासाठी सोमवारपासून उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. २१, २३ व २४ मार्चची सुटी आल्याने उमेदवारांना १९, २०, २२ व २५ मार्च असे चारच दिवस मिळणार आहेत. नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख २५ मार्च असून, उमेदवारांच्या अर्जाची छाननी २६ मार्च रोजी करण्यात येईल. २८ मार्चपर्यंत उमेदवाराला अर्ज मागे घेता येणार आहे.४अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराने नामनिर्देशनपत्र नमुना २ अ, नमुना २६ (नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे शपथपत्र), शपथेचा किंवा दृढकथनाचा नमुना, छायाचित्राबाबतचे शपथपत्र, स्वाक्षरीचा नमुना आणि मतपत्रिकेतील नावाबाबत पत्र सादर करावयाचे आहे.या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून उमेदवाराची अपराधिक माहिती, उमेदवारांकडून कायद्याचे झालेले उल्लंघन, दोष सिद्ध ठरवले किंवा नाही याचा तपशील, मागील पाच वर्षांत आयकर विवरण पत्रात दर्शविलेले एकूण उत्पन्न, पॅन क्रमांक, आयकर विवरण पत्र भरल्याची स्थिती, फौजदारी खटले, खटल्याचा तपशील, आदी माहिती सादर करावयाची आहे.राज्य व देशातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी अर्ज सादर करताना प्रस्तावक (सूचक) म्हणून एक व्यक्ती ग्राह्य धरला जाईल, तर स्वतंत्र (अपक्ष) उमेदवारास १० व्यक्ती प्रस्तावक म्हणून आवश्यक राहतील. तेही ज्या लोकसभा मतदार संघासाठी ते अर्ज करणार आहेत त्याच मतदार संघातील प्रस्तावक असणे गरजेचे असल्याचेही मुदगल यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूक