शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

नागपुरात लॉकडाऊन लावायचे की नाही? वडेट्टीवार-राऊत आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 21:56 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे.

ठळक मुद्देराऊतांच्या भूमिकेशी वडेट्टीवार सहमत नाहीत निर्बंध लावण्याचा निर्णय कॅबिनेटच्या अखत्यारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसात वाढली असली तरी सध्याच लॉकडाऊन लावण्याचे नियोजन नाही. निर्बंध लावणे अथवा वाढविणे ही जबाबदारी कॅबिनेटची असते. अद्याप तशी भूमिका राज्यात कुठेही घेतलेली नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील दोन मंत्र्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे निबंर्धांबाबतचा संभ्रम आणखी वाढीस लागला आहे. (Lockdown in Nagpur yes or not? Vadettiwar-Raut face to face)मंगळवारी नागपूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, हे खरे असले तरी रुग्णसंख्येवर पुढील निर्णयाची परिस्थिती अवलंबून असेल. नागपूर संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली अथवा नाही, हे आपणास माहीत नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्वतयारी केली आहे. रुग्णालय आणि ऑक्सिजनचेही नियोजन केले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध करण्याचा विषय सध्या कॅबिनेट समोर नाही. मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत थोडी वाढ आहे, नागपुरात वाढीला सुरुवात झाली आहे. टास्क फोर्स आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल. तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. कधीही प्रवेश करू शकते, ती रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.महाज्योतीला बदनाम करू नकामहाज्योतीवरून होत असलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, महाज्योतीला कुणीही बदनाम करू नये. महाज्योती स्थापन होऊन जेमतेम दोनच वर्षे झाली, वर्षभर कोरोनामुळे काम करता आले नाही. हे समजून घ्यावे. महाज्योतीसाठी मार्च-२०२१ पर्यंत ३५ कोटी आणि सप्टेबर-२०२१ पर्यंत ४.५० कोटी असा ४९.५० कोटी रुपयांचा निधी आला. असे असताना १२५ कोटी निधी परत कुठून जाणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Rautनितीन राऊत