शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

नागपुरात लॉकडाऊन लावायचे की नाही? वडेट्टीवार-राऊत आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 21:56 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे.

ठळक मुद्देराऊतांच्या भूमिकेशी वडेट्टीवार सहमत नाहीत निर्बंध लावण्याचा निर्णय कॅबिनेटच्या अखत्यारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागपुरात निर्बंध लावण्याचे संकेत देऊन २४ तासदेखील उलटले नसताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नेमकी विरुद्ध भूमिका मांडली आहे. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दोन दिवसात वाढली असली तरी सध्याच लॉकडाऊन लावण्याचे नियोजन नाही. निर्बंध लावणे अथवा वाढविणे ही जबाबदारी कॅबिनेटची असते. अद्याप तशी भूमिका राज्यात कुठेही घेतलेली नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. राज्यातील दोन मंत्र्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे निबंर्धांबाबतचा संभ्रम आणखी वाढीस लागला आहे. (Lockdown in Nagpur yes or not? Vadettiwar-Raut face to face)मंगळवारी नागपूर प्रेस क्लबच्यावतीने आयोजित मीट द प्रेस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, हे खरे असले तरी रुग्णसंख्येवर पुढील निर्णयाची परिस्थिती अवलंबून असेल. नागपूर संदर्भात पालकमंत्री नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली अथवा नाही, हे आपणास माहीत नाही, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने पूर्वतयारी केली आहे. रुग्णालय आणि ऑक्सिजनचेही नियोजन केले आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक निर्बंध करण्याचा विषय सध्या कॅबिनेट समोर नाही. मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत थोडी वाढ आहे, नागपुरात वाढीला सुरुवात झाली आहे. टास्क फोर्स आणि तज्ज्ञांसोबत चर्चा करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल. तिसरी लाट उंबरठ्यावर आहे. कधीही प्रवेश करू शकते, ती रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.महाज्योतीला बदनाम करू नकामहाज्योतीवरून होत असलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, महाज्योतीला कुणीही बदनाम करू नये. महाज्योती स्थापन होऊन जेमतेम दोनच वर्षे झाली, वर्षभर कोरोनामुळे काम करता आले नाही. हे समजून घ्यावे. महाज्योतीसाठी मार्च-२०२१ पर्यंत ३५ कोटी आणि सप्टेबर-२०२१ पर्यंत ४.५० कोटी असा ४९.५० कोटी रुपयांचा निधी आला. असे असताना १२५ कोटी निधी परत कुठून जाणार, असा प्रतिप्रश्न त्यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNitin Rautनितीन राऊत