शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
2
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
3
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
4
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
5
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
6
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
7
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
8
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
9
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
10
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
11
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
12
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
13
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
14
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
15
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
16
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
17
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
18
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
19
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
20
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ३१ जुलैला ठरणार लॉकडाऊन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:49 IST

जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्दे बैठकीत लोकप्रतिनिधींनी केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला. सहा दिवस नागरिकांच्या व्यवहार व नियमांचे पालन करण्याची पद्धत कशी राहिली याचा आढावा घेतल्यानंतरच कठोर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. तेव्हा कठोर लॉकडाऊन लावायचा की नाही हे आता नागरिकांच्या हाती आहे, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. तर नियमांचे काटेकोर पालन झाले तर लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. परंतु नियमांचे पालन झाले नाही तर मात्र नाईलाजाने १४ दिवसांचा लॉकडाऊ न लावावा लागेल, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी उपस्थित होते.महापौर जोशी म्हणाले, शहरात कोविड-१९ ज्या गतीने पसरत आहे, ते पाहता लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाऊन लावणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनी स्वत:च आपली जबाबदारी पाळली आणि नियमांचे पालन केले तर कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते २५ व २६ जुलै रोजी जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांच्या एकूणच वर्तनाचे आणि त्यांच्या विचारांचीही माहिती पडेल. जर हा जनता कर्फ्यू यशस्वी राहिला तर कोरोनाच्या संक्रमणावर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल.आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जनता कर्फ्यूदरम्यान केवळ वैद्यकीय सेवेसोबतच काही अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जनता कर्फ्यूसोबतच इतर दिवसातही नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे पालन झाले तरच कोरोनाला पळवता येऊ शकते. जनता कर्फ्यूदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहील. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.बैठकीत आ. विकास ठाकरे म्हणाले, १४ च्या ऐवजी २० दिवसाचा लॉकडाऊन करा, परंतु हे आधी निश्चित करा की त्या काळात कुणीही उपाशी राहू नये. तीन महिन्याच्या लॉकडाऊनने अगोदरच लोकांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांकडे पैसे नाहीत. जर लॉकडाऊन लागला तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आ. प्रवीण दटके यांनी जनता कर्फ्यू लावण्याचा पर्याय दिला. लॉकडाऊनचा विरोध केला.लोकप्रतिनिधी करतील जागृतबैठकीत असेही ठरले की, जनता कर्फ्यूनंतर २७ ते ३० जुलै दरम्यान लोकप्रतिनिधी आपापल्या भागात लोकांना जागृत करतील. नियमांचे पालन करण्याचे विनंती करतील. कोविड-१९ शी संबंधित नियमांचे पालन केल्यानेच कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा यासाठी जनजागृती केली जाईल. महापौर व आयुक्त हे अगोदरच पासूनच जनजागृती करीत आहेत.जनता कर्फ्यूच्या घोषणेनंतर वाढली गर्दीजनता कर्फ्यूची दुपारी घोषणा झाली. ही गोष्ट शहरातच पसरताच गोंधळ उडाला. सर्वत्र गर्दी झाली.पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.भाजी, किराणा दुकानांवर आवश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली.इतवारी, महाल येथील बाजारात ग्राहकांच्या गर्दीमुळे जाम लागला.दारूच्या दुकानांसमोरही गर्दी वाढली.नागपंचमीमुळे डेअरी दुकानांसमोरही गर्दी होती.लॉकडाऊनच्या भीतीमुळे लोक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू खरेदी करीत होते.