शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

नागपुरात ३१ जुलैला ठरणार लॉकडाऊन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:49 IST

जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्दे बैठकीत लोकप्रतिनिधींनी केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला. सहा दिवस नागरिकांच्या व्यवहार व नियमांचे पालन करण्याची पद्धत कशी राहिली याचा आढावा घेतल्यानंतरच कठोर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. तेव्हा कठोर लॉकडाऊन लावायचा की नाही हे आता नागरिकांच्या हाती आहे, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. तर नियमांचे काटेकोर पालन झाले तर लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. परंतु नियमांचे पालन झाले नाही तर मात्र नाईलाजाने १४ दिवसांचा लॉकडाऊ न लावावा लागेल, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी उपस्थित होते.महापौर जोशी म्हणाले, शहरात कोविड-१९ ज्या गतीने पसरत आहे, ते पाहता लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाऊन लावणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनी स्वत:च आपली जबाबदारी पाळली आणि नियमांचे पालन केले तर कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते २५ व २६ जुलै रोजी जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांच्या एकूणच वर्तनाचे आणि त्यांच्या विचारांचीही माहिती पडेल. जर हा जनता कर्फ्यू यशस्वी राहिला तर कोरोनाच्या संक्रमणावर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल.आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जनता कर्फ्यूदरम्यान केवळ वैद्यकीय सेवेसोबतच काही अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जनता कर्फ्यूसोबतच इतर दिवसातही नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे पालन झाले तरच कोरोनाला पळवता येऊ शकते. जनता कर्फ्यूदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहील. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.बैठकीत आ. विकास ठाकरे म्हणाले, १४ च्या ऐवजी २० दिवसाचा लॉकडाऊन करा, परंतु हे आधी निश्चित करा की त्या काळात कुणीही उपाशी राहू नये. तीन महिन्याच्या लॉकडाऊनने अगोदरच लोकांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांकडे पैसे नाहीत. जर लॉकडाऊन लागला तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आ. प्रवीण दटके यांनी जनता कर्फ्यू लावण्याचा पर्याय दिला. लॉकडाऊनचा विरोध केला.लोकप्रतिनिधी करतील जागृतबैठकीत असेही ठरले की, जनता कर्फ्यूनंतर २७ ते ३० जुलै दरम्यान लोकप्रतिनिधी आपापल्या भागात लोकांना जागृत करतील. नियमांचे पालन करण्याचे विनंती करतील. कोविड-१९ शी संबंधित नियमांचे पालन केल्यानेच कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा यासाठी जनजागृती केली जाईल. महापौर व आयुक्त हे अगोदरच पासूनच जनजागृती करीत आहेत.जनता कर्फ्यूच्या घोषणेनंतर वाढली गर्दीजनता कर्फ्यूची दुपारी घोषणा झाली. ही गोष्ट शहरातच पसरताच गोंधळ उडाला. सर्वत्र गर्दी झाली.पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.भाजी, किराणा दुकानांवर आवश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली.इतवारी, महाल येथील बाजारात ग्राहकांच्या गर्दीमुळे जाम लागला.दारूच्या दुकानांसमोरही गर्दी वाढली.नागपंचमीमुळे डेअरी दुकानांसमोरही गर्दी होती.लॉकडाऊनच्या भीतीमुळे लोक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू खरेदी करीत होते.