शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

नागपुरात ३१ जुलैला ठरणार लॉकडाऊन ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 22:49 IST

जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला.

ठळक मुद्दे बैठकीत लोकप्रतिनिधींनी केला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतरही शहरवासीयांवरील कठोर लॉकडाऊनचे संकट कायम आहे. महापौर संदीप जोशी यांनी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनचा विरोध केला. सोबतच जनता कर्फ्यूनंतर ३१ तारखेला पुन्हा बैठक बोलावण्यात यावी, असा निर्णयही घेण्यात आला. सहा दिवस नागरिकांच्या व्यवहार व नियमांचे पालन करण्याची पद्धत कशी राहिली याचा आढावा घेतल्यानंतरच कठोर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. तेव्हा कठोर लॉकडाऊन लावायचा की नाही हे आता नागरिकांच्या हाती आहे, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले. तर नियमांचे काटेकोर पालन झाले तर लॉकडाऊनची गरजच पडणार नाही. परंतु नियमांचे पालन झाले नाही तर मात्र नाईलाजाने १४ दिवसांचा लॉकडाऊ न लावावा लागेल, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.लॉकडाऊनबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीत खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. विकास कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास ठाकरे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी उपस्थित होते.महापौर जोशी म्हणाले, शहरात कोविड-१९ ज्या गतीने पसरत आहे, ते पाहता लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाऊन लावणे हा काही पर्याय नाही. नागरिकांनी स्वत:च आपली जबाबदारी पाळली आणि नियमांचे पालन केले तर कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते २५ व २६ जुलै रोजी जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांच्या एकूणच वर्तनाचे आणि त्यांच्या विचारांचीही माहिती पडेल. जर हा जनता कर्फ्यू यशस्वी राहिला तर कोरोनाच्या संक्रमणावर निश्चितच नियंत्रण मिळवता येईल.आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, जनता कर्फ्यूदरम्यान केवळ वैद्यकीय सेवेसोबतच काही अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. जनता कर्फ्यूसोबतच इतर दिवसातही नियमांचे काटेकोर पालन करावे. नियमांचे पालन झाले तरच कोरोनाला पळवता येऊ शकते. जनता कर्फ्यूदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहील. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.बैठकीत आ. विकास ठाकरे म्हणाले, १४ च्या ऐवजी २० दिवसाचा लॉकडाऊन करा, परंतु हे आधी निश्चित करा की त्या काळात कुणीही उपाशी राहू नये. तीन महिन्याच्या लॉकडाऊनने अगोदरच लोकांचे कंबरडे मोडले आहे. नागरिकांकडे पैसे नाहीत. जर लॉकडाऊन लागला तर परिस्थिती आणखी बिकट होईल. आ. प्रवीण दटके यांनी जनता कर्फ्यू लावण्याचा पर्याय दिला. लॉकडाऊनचा विरोध केला.लोकप्रतिनिधी करतील जागृतबैठकीत असेही ठरले की, जनता कर्फ्यूनंतर २७ ते ३० जुलै दरम्यान लोकप्रतिनिधी आपापल्या भागात लोकांना जागृत करतील. नियमांचे पालन करण्याचे विनंती करतील. कोविड-१९ शी संबंधित नियमांचे पालन केल्यानेच कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर राखा यासाठी जनजागृती केली जाईल. महापौर व आयुक्त हे अगोदरच पासूनच जनजागृती करीत आहेत.जनता कर्फ्यूच्या घोषणेनंतर वाढली गर्दीजनता कर्फ्यूची दुपारी घोषणा झाली. ही गोष्ट शहरातच पसरताच गोंधळ उडाला. सर्वत्र गर्दी झाली.पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.भाजी, किराणा दुकानांवर आवश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी झाली.इतवारी, महाल येथील बाजारात ग्राहकांच्या गर्दीमुळे जाम लागला.दारूच्या दुकानांसमोरही गर्दी वाढली.नागपंचमीमुळे डेअरी दुकानांसमोरही गर्दी होती.लॉकडाऊनच्या भीतीमुळे लोक आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू खरेदी करीत होते.