शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

लॉकडाऊनमुळे संगणक संस्थांचे गणित बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 19:26 IST

कोरोना लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्र आणि संस्थांना फटका बसला आहे. अनेक संस्थांचे वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचे गणित बिघडले आहे. यातच केवळ उन्हाळ्यात विद्यार्थी, महिला आणि पुरुषांना अल्प कालावधीचे प्रशिक्षण देणाऱ्या संगणक संस्थांचे यंदाच्या उन्हाळ्यात कोरोना लॉकडाऊनमुळे वर्ग न भरल्याने या व्यावसायिक संस्थांचे कंबरडे मोडले आहे. बँकांचे कर्ज फेडण्याची समस्या संचालकांसमोर उभी राहिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्र आणि संस्थांना फटका बसला आहे. अनेक संस्थांचे वर्षभराच्या आर्थिक नियोजनाचे गणित बिघडले आहे. यातच केवळ उन्हाळ्यात विद्यार्थी, महिला आणि पुरुषांना अल्प कालावधीचे प्रशिक्षण देणाऱ्या संगणक संस्थांचे यंदाच्या उन्हाळ्यात कोरोना लॉकडाऊनमुळे वर्ग न भरल्याने या व्यावसायिक संस्थांचे कंबरडे मोडले आहे. बँकांचे कर्ज फेडण्याची समस्या संचालकांसमोर उभी राहिली आहे.नागपूर जिल्ह्यात ५०० पेक्षा जास्त संगणक प्रशिक्षण संस्था आहेत. चार महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये या संस्थांतर्फे विविध अल्प कालावधीचे कोर्सेस राबविले जातात. चार महिन्यात येणाºया मिळकतीच्या भरोशावर वर्षभराचा खर्च संचालक चालवितात. पण यंदा उन्हाळी सुट्यांच्या वर्गांना झळ बसल्याने सर्व संंस्थांना कोट्यवधींचे नुकसान सोसावे लागले असून संगणक प्रशिक्षक संचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.जागनाथ बुधवारी येथील संस्थाचालक मिलिंद मानापुरे म्हणाले, उन्हाळ्याच्या सुटीत विविध प्रकारचे संगणकाचे अल्प कालावधीचे कोर्सेस संस्थातर्फे चालविले जातात. या कोर्र्सेसला विद्यार्थ्यांपासून महिला, पुरुष आणि वयस्क यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो. यामुळे संस्थाचालकांना वर्षभराची मिळकत होते. अनेक संस्था १५ ते २० वर्षांपासून कार्यरत आहेत. शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी कोर्र्सेसला हजेरी लावतात. पण यावर्षी कोरोनामुळे सर्वांना घराबाहेर पडण्यास मनाई केल्याने संस्थांमध्ये कुणाचेही प्रवेश झाले नाहीत. त्यामुळे या सर्व संस्थांचे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. या संस्थांना आर्थिक मदतीची गरज आहे.सर्व संस्था बँकांमधून कर्ज काढून उभ्या राहिल्या आहेत. पण आता हप्तेही भरणे कठीण झाले आहेत. संस्थांमधील कोर्सेसची फी तीन ते पाच हजार रुपये असते. त्या माध्यमातून या संस्थांचे वर्षभराचे गणित अवलंबून असते. मात्र लॉकडाऊनमुळे सगळे प्रशिक्षण बंद आहे. लाखो रुपये गुंतवणूक संस्था उभी करणाऱ्या संचालकांना केवळ उन्हाळी सुटीच्या बॅचेस वर्षभरासाठी उपयोगी ठरतात. पण कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले असून त्याचा फटका वर्षभरासाठी बसला आहे. त्यामुळे सर्व संगणक संस्थाचालक हतबल झाले आहेत.