शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे तापमानात २ अंशाचा फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:23 IST

रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे.

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. यामुळे सध्याच्या तापमानात वाहन आणि कारखान्यांच्या उष्णतेचा समावेश नाही. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे.पर्यावरणाशी संबंधित अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या उष्णतामानामध्ये कसलीही सरमिसळ नाही. स्वच्छ नैसर्गिक वातावरणातील खऱ्या तापमानाचा अनुभव घेण्याचे हे दिवस आहेत. निसर्गाला जणूकाही आराम करण्याची संधीच मिळाली आहे. यामुळे निसर्गाच्या क्षमतेमध्ये विकास होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान(नीरी)चे मुख्य वैज्ञानिक डॉ. जयशंकर पांडेय म्हणाले, माणसाला आपल्या आजारपणाविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जेवढी पोषक आहाराची गरज असते, तेवढीच विश्रांतीचीही असते. वीकेंडची संकल्पनाही यातूनच उदयास आली आहे. औद्योगिकीकरणातसुद्धा असा ‘पॉज’ निश्चित करायला हवा. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखण्यासाठी सरकारने कुटुंब कल्याण योजना अस्तित्वात आणली. त्याचप्रमाणे औद्योगिक नियोजनही आखायला हवे. निसर्गाने कुठे हिरवळ तर कुठे खडकाळ जमीन दिली आहे. हे असे का, याची माणसाला कल्पना नाही. परिणामत: पृथ्वी आणि निसर्गाची स्थिती समजून न घेता माणसाने मनास येईल तिथे शहरीकरण आणि वाट्टेल तिथे कारखाने उभारले आहेत. त्यामुळेच तापमानामध्ये विसंगती दिसत आहे.

प्रत्येक मजूर, कामगार कमाईसाठी दिल्ली, मुंबईसारखी शहरे गाठतो. यामुळे पलायनाची समस्या निर्माण होते. महात्मा गांधींनी ग्राम व्यवस्थापन आणि स्थानिक स्वयं सरकारची संकल्पना मांडली होती. प्रत्येक जिल्हे दिल्ली, मुंबई होऊ शकणार नाहीत, मात्र सक्षम नक्कीच बनतील. या सोशियो इकॉनॉमिक मॉडेलचा पर्यावरण संतुलनाशी थेट संपर्क आहे. देशातील औद्यागिकीकरण वाढविण्यासाठी कृषी व त्याच्याशी संबंधित उत्पादन वाढीवर अधिक भर असावा, असे आपले मत आहे.-डॉ. जयशंकर पाण्डेय, मुख्य वैज्ञानिक, नीरीवातावरणातील तापमानातील चढ-उतारामागे आर्द्रता, ढगांची निर्मिती प्रक्रिया हे मुख्य कारण असते. मात्र, वाहतूक आणि औद्योगीकरण सुरू असलेल्या दिवसात, उन्हाळ्यामध्ये सरासरी २ अंशाने तापमान वाढू शकते. या वर्षी एप्रिल महिन्यातील कमाल तापमान मागील पाच वर्षात प्रथमच ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.-एम.एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्र 

 

टॅग्स :TemperatureतापमानCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या