शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

लॉकडाऊनमुळे तापमानात २ अंशाचा फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:23 IST

रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे.

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. यामुळे सध्याच्या तापमानात वाहन आणि कारखान्यांच्या उष्णतेचा समावेश नाही. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे.पर्यावरणाशी संबंधित अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या उष्णतामानामध्ये कसलीही सरमिसळ नाही. स्वच्छ नैसर्गिक वातावरणातील खऱ्या तापमानाचा अनुभव घेण्याचे हे दिवस आहेत. निसर्गाला जणूकाही आराम करण्याची संधीच मिळाली आहे. यामुळे निसर्गाच्या क्षमतेमध्ये विकास होत आहे. यासंदर्भात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान(नीरी)चे मुख्य वैज्ञानिक डॉ. जयशंकर पांडेय म्हणाले, माणसाला आपल्या आजारपणाविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जेवढी पोषक आहाराची गरज असते, तेवढीच विश्रांतीचीही असते. वीकेंडची संकल्पनाही यातूनच उदयास आली आहे. औद्योगिकीकरणातसुद्धा असा ‘पॉज’ निश्चित करायला हवा. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण राखण्यासाठी सरकारने कुटुंब कल्याण योजना अस्तित्वात आणली. त्याचप्रमाणे औद्योगिक नियोजनही आखायला हवे. निसर्गाने कुठे हिरवळ तर कुठे खडकाळ जमीन दिली आहे. हे असे का, याची माणसाला कल्पना नाही. परिणामत: पृथ्वी आणि निसर्गाची स्थिती समजून न घेता माणसाने मनास येईल तिथे शहरीकरण आणि वाट्टेल तिथे कारखाने उभारले आहेत. त्यामुळेच तापमानामध्ये विसंगती दिसत आहे.

प्रत्येक मजूर, कामगार कमाईसाठी दिल्ली, मुंबईसारखी शहरे गाठतो. यामुळे पलायनाची समस्या निर्माण होते. महात्मा गांधींनी ग्राम व्यवस्थापन आणि स्थानिक स्वयं सरकारची संकल्पना मांडली होती. प्रत्येक जिल्हे दिल्ली, मुंबई होऊ शकणार नाहीत, मात्र सक्षम नक्कीच बनतील. या सोशियो इकॉनॉमिक मॉडेलचा पर्यावरण संतुलनाशी थेट संपर्क आहे. देशातील औद्यागिकीकरण वाढविण्यासाठी कृषी व त्याच्याशी संबंधित उत्पादन वाढीवर अधिक भर असावा, असे आपले मत आहे.-डॉ. जयशंकर पाण्डेय, मुख्य वैज्ञानिक, नीरीवातावरणातील तापमानातील चढ-उतारामागे आर्द्रता, ढगांची निर्मिती प्रक्रिया हे मुख्य कारण असते. मात्र, वाहतूक आणि औद्योगीकरण सुरू असलेल्या दिवसात, उन्हाळ्यामध्ये सरासरी २ अंशाने तापमान वाढू शकते. या वर्षी एप्रिल महिन्यातील कमाल तापमान मागील पाच वर्षात प्रथमच ४०.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.-एम.एल. साहू, डीडीजीएम, नागपूर हवामान केंद्र 

 

टॅग्स :TemperatureतापमानCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या