शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

परवान्यानंतरच कर्जवाटप !

By admin | Updated: June 16, 2015 02:37 IST

नाबार्डने नागपूर जिल्हा बँकेचे आॅडिट अद्यापही न केल्यामुळे बँकेला जूनमध्ये मिळणाऱ्या आर्थिक परवान्यावर प्रश्नचिन्ह

शेतकरी संकटात : जिल्हा बँकेचे नाबार्डतर्फे आॅडिट नाहीनागपूर : नाबार्डने नागपूर जिल्हा बँकेचे आॅडिट अद्यापही न केल्यामुळे बँकेला जूनमध्ये मिळणाऱ्या आर्थिक परवान्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळेल वा नाही, यावर संभ्रम आहे. जिल्हा बँकेचे अंतर्गत आॅडिट एप्रिल महिन्यात झाले. नाबार्डतर्फे मे महिन्यात आॅडिट पूर्ण करून राज्य शासन आणि रिझर्व्ह बँकेला अहवाल सादर करायचा होता. त्यानंतरच्या प्रक्रियेनंतर (प्रशासकीय व न्यायालयीन) रिझर्व्ह बँकेतर्फे जूनच्या पहिल्या आठवड्यात आर्थिक परवाना मिळून बँकेचे कामकाज सुरू होणार होते. पर्यायी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा होणार होता. केवळ नाबार्डचे आॅडिट न झाल्याने पुढील प्रक्रिया थंडबस्त्यात आहे. (प्रतिनिधी)अतिरिक्त रक्कम राज्य शासन देणारकेंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नागपूर जिल्हा बँकेला १३१.७४ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. बँकेचा सीआरएआर सध्या ०.४५ टक्के असून ७ टक्के कायम ठेवण्यासाठी बँकेला १३१.७४ कोटींव्यतिरिक्त पुन्हा २२.५० कोटींची गरज भासणार आहे. राज्य सरकारने आधीच १६१ कोटी रुपये बँकेला मंजूर केले आहे. त्यामुळे शासनाकडून बँकेला हवे असलेले २२.५० कोटी रुपये मिळण्यास अडचण जाणार नाही. त्यामुळे बँकेचे ७ टक्के सीआरएआरचे लक्ष्य पूर्ण होईल. बँकेचे व्यवहार बंद असल्यामुळे ३१ मार्च २०१५ पर्यंत बँकेचा संचित तोटा २०८ कोटी रुपयांवर गेला आहे. सध्या बँकेकडे ४२५ कोटी रुपयांचा निधी आहे. त्यापैकी २०० कोटी रुपये सीआरआर आणि एसएलआरमध्ये राखीव आहेत. उर्वरित २२५ कोटी रुपयांमध्ये बँकेला व्यवहार करता येईल. त्यात शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यावरही विचार करता येईल. राज्य शासनाने बँकेला मदत स्वरूपात दिलेली रक्कम टप्प्याटप्प्याने होणाऱ्या कर्जवसुलीनंतर शासनाला परत करायची आहे. इमारत विक्रीचा विचार बँकेच्या विचाराधीन आहे. बँकेची कर्जवाटपाची तयारीयंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना कर्जवाटप करता येईल, अशी बँकेची आर्थिक स्थिती आहे. कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्ज देण्याचा विचार आहे. पण बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध असल्यामुळे सध्या शक्य नाही. नाबार्डने तातडीने आॅडिट करावे आणि अहवाल रिझर्व्ह बँकेला सादर करावा. त्यानंतरच्या प्रक्रियेनंतर व रिझर्व्ह बँकेकडून जिल्हा बँकेला आर्थिक परवाना मिळाल्यास यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना १०० कोटींचे कर्जवाटप करता येईल. एवढेच नव्हे तर जवळपास १५० कोटींचे कर्जही वसूल होऊ शकेल आणि बँकेची निश्चितच भरभराट होईल. - संजय कदम, मुख्य प्रशासकनागपूर जिल्हा बँक़१८ रोजी हायकोर्टात सुनावणीनाबार्डने आॅडिट तातडीने करावे म्हणून राज्य शासनाने सोमवार, १५ रोजी हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. जिल्हा बँक प्रकरणावर १८ जून रोजी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या प्रकरणाला गती मिळू शकेल. जिल्हा बँकेच्या आॅडिटसाठी नाबार्डला १० ते १२ दिवस लागणार आहे. सर्व प्रक्रिया वेळेत पार पडल्यास शेतकऱ्यांना १ जुलैपासून या हंगामासाठी कर्ज मिळणे शक्य आहे. त्यासाठी राज्य सरकारही प्रयत्नरत आहे.