शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपुरात चार जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने ७० टँकरचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 20:05 IST

नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.

ठळक मुद्देवांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभाची किरकोळ कामे शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जेएनएनयूआरएम व अमृत योजनेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची कामे हाती घेण्यात आली. नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.शहराला पाणीपुरठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा असला तरी शहराच्या सर्व भागात नळाचे नेटवर्क नसल्याने मोठ्या प्रमाणात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यात वाठोडा, दाभा, भरतवाडा, हुडकेश्वर नरसाळा, टेका नाका, इंदोरा, पारडी, दिघोरी, पिपळा, पारडी आदी वस्त्यांचा समावेश आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने महापालिकेला हकनाक ६० ते ७० टँकरवर खर्च करावा लागत आहे.१५ ऑगस्टपर्यंत जलकुंभांचे हस्तांतरणवांजरा, कळमना, नारा व चिंचभवन आदी भागातील पाणीटंचाई विचारात घेता या चार जलकुंभांचे शिल्लक असलेले बांधकाम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत जलकुंभ मनपाला हस्तांतरित करण्याचे निर्देश नासुप्रला दिले आहेत. या संदर्भात शुक्रवारी नासुप्र व मनपाच्या जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू झाला तर ६० ते ७०टँकर कमी होतील. यामुळे मनपाची आर्थिक बचत होइल.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती ,मनपाअमृत योजनेतून ४५ जलकुंभांचे कामशहरालगतच्या पाणीपुरवठा होत नसलेल्या भागासाठी केंद्र सरकार पुरस्कृत २७३ कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेची २०१६ मध्ये घोषणा झाली. २७३.७८ कोटी कोटींच्या या योजनेतून शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांटचे जाळे निर्माण करणे व जलकुंभ निर्माण आदी कामांचा समावेश होता. यातील ४५ जलकुंभांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका