शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नागपुरात चार जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने ७० टँकरचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 20:05 IST

नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.

ठळक मुद्देवांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभाची किरकोळ कामे शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी जेएनएनयूआरएम व अमृत योजनेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची कामे हाती घेण्यात आली. नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे.शहराला पाणीपुरठा होणाऱ्या पेंच प्रकल्पात पुरेसा जलसाठा असला तरी शहराच्या सर्व भागात नळाचे नेटवर्क नसल्याने मोठ्या प्रमाणात टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागतो. यात वाठोडा, दाभा, भरतवाडा, हुडकेश्वर नरसाळा, टेका नाका, इंदोरा, पारडी, दिघोरी, पिपळा, पारडी आदी वस्त्यांचा समावेश आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना जलकुंभाचे हस्तांतरण रखडल्याने महापालिकेला हकनाक ६० ते ७० टँकरवर खर्च करावा लागत आहे.१५ ऑगस्टपर्यंत जलकुंभांचे हस्तांतरणवांजरा, कळमना, नारा व चिंचभवन आदी भागातील पाणीटंचाई विचारात घेता या चार जलकुंभांचे शिल्लक असलेले बांधकाम पूर्ण करून १५ ऑगस्टपर्यंत जलकुंभ मनपाला हस्तांतरित करण्याचे निर्देश नासुप्रला दिले आहेत. या संदर्भात शुक्रवारी नासुप्र व मनपाच्या जलप्रदाय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू झाला तर ६० ते ७०टँकर कमी होतील. यामुळे मनपाची आर्थिक बचत होइल.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती ,मनपाअमृत योजनेतून ४५ जलकुंभांचे कामशहरालगतच्या पाणीपुरवठा होत नसलेल्या भागासाठी केंद्र सरकार पुरस्कृत २७३ कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेची २०१६ मध्ये घोषणा झाली. २७३.७८ कोटी कोटींच्या या योजनेतून शहराच्या विविध भागात जलवाहिन्यांटचे जाळे निर्माण करणे व जलकुंभ निर्माण आदी कामांचा समावेश होता. यातील ४५ जलकुंभांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका