शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासोबत जगायचे, लसीकरण धोक्याचे, हे सोशल माध्यमांचे खूळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST

- भ्रामक संवादांचे षडयंत्र : प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होणे महत्त्वाचे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मानवी आरोग्यासाठी व्यस्तता ...

- भ्रामक संवादांचे षडयंत्र : प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मानवी आरोग्यासाठी व्यस्तता ही कायम चांगली बाब असून, त्यात स्वत:साठीची उसंत असते. मात्र, सोशल मीडियाने त्या उसंतीवरही घाला घातला आणि व्यक्ती व्यावहारिक आयुष्यातील व्यस्ततेतही रिकामटेकडा असल्यासारखेच वागायला लागला आहे. त्याचे पर्यवसान नको त्या तणावाला बळी पडण्यावर झाले आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात तर माध्यमांवर किंतु-परंतुच्या विश्लेषणांचा भडिमार झाल्याने, प्रत्येक व्यक्ती स्वत:कडे संशयाच्या नजरेने बघायला लागला आहे. जणू प्रत्येकच जण आजारी असल्याचा भास निर्माण झाला आहे. कोरोना कधीच संपणार नाही, संक्रमणासोबतच जगण्याची सवय पाडावी लागेल, भारतीय उपचार बिनकामाचे, लसीकरण धोक्याचे आदी अशा संदेशांनी सुशिक्षितही हैराण झाले आहेत. अशा संदेशांचा वापर जगपातळीवर भारतीय मानसशास्त्राला नामोहरम करण्यासाठीचे षडयंत्र म्हणून केला जात असल्याचे मत सोशल माध्यमांचे विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच माध्यम साक्षरतेबाबत जागरूक होण्याचे आवाहन तज्ज्ञ विश्लेषकांनी केले आहे.

---------------------

माध्यमांतून मानसशास्त्राशी होत असलेला खेळ

* सोशल मीडिया हा एक मोठा उद्योग आहे. दररोज वेगवेगळ्या माध्यमांतून दररोज ५०० कोटी संदेश प्रसारित केले जातात.

* संदेशनिर्मिती करण्यासाठी आणि ते प्रसारित करण्यासाठी गलेलठ्ठ पगार दिला जातो.

* टार्गेटेट एरियावर जसे भारत, हा पगार आणखी भक्कम असतो.

* उपभोक्ता जितका भ्रमित होईल तितकाच लाभ माध्यमांना होतो.

* उपभोक्त्याचा इंटरेस्ट तसा, तसे पोस्ट क्रिएट केले जातात. उदा. धार्मिक, सेक्स, जातीय तेढ, कोरोना संक्रमण आदी.

* संदेशांचा भडिमार होत असल्याने खोट्या गोष्टी खऱ्या आणि खऱ्या गोष्टी खोट्या समजावण्याचा प्रयत्न केला जातो.

* वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रॉडक्ट, कंपन्यांना उपभोक्त्याच्या भ्रामकतेचा लाभ होतो.

------------------

सोशल माध्यमांच्या अराजकतेपासून वाचण्याचे उपाय

* सोशल मीडिया एज्युकेशनची गरज. अनोळखी व्यक्तीच्या संदेशावर प्रतिसाद का द्यावा, हा प्रश्न निर्माण होणे गरजेचे.

* शालेय जीवनातच इतर विषयांसोबतच सोशल मीडिया एज्युकेशनचा विषय अभ्यासात येणे गरजेचे.

* नो डिलिट, नो रिस्पॉन्सची सवय महत्त्वाची.

* पारंपरिक माध्यमांवरच जसे वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि तज्ज्ञांवरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे.

* फॉरेन फोबिया अर्थात जागतिक लोकांवरच विश्वास ठेवणे चुकीचे. तुमच्या देशाची मानसिकता, आरोग्याची स्थिती त्यांना नाही, ही बाब समजून घ्यावी.

* सत्य ओळखण्याची क्षमता निर्माण करणे, प्रश्न उपस्थित होण्याची सवय लावणे महत्त्वाचे.

----------------------

पारंपरिक ते न्यू मीडिया ट्रान्झेक्शन अचानक झालेले आहे. त्यामुळे सोशल मीडियापासून नागरिकांना वाचविण्याची सर्वात मोठी जबाबदारी पारंपरिक माध्यमांचीच आहे. नैराश्य हा आजार नाही तर ते एक सिम्प्टम हे समजून घेणे महत्त्वाचे. त्यासाठी माध्यम साक्षरतेची जाणीव शिक्षणाच्या पातळीवरच विकसित करावी लागणार आहे.

- डॉ. मोईज हक, विभाग प्रमुख, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय

----------------

सोशल मीडिया म्हणजे प्रोटोगोनिस्ट अर्थात सकारात्मक व ॲण्टोगोनिस्ट अर्थात नकारात्मकतेचे द्वंद्व आहे. ऐकिवात गोष्टींवर विश्वास ठेवण्याचे प्रमाण मोठे आहे. युरोप, अमेरिकेत सोशल माध्यमांवरील अवाजवी संदेशांना नाही म्हणण्याची प्रक्रिया मोठी आहे. त्या तुलनेत भारतात ही प्रक्रिया अजून रूढ व्हायची आहे. या संदेशांचे सत्यापित स्रोत शोधण्याची वृत्ती वाढीस जेव्हा लागेल, तेव्हा भारतीय माणूस सोशल माध्यमांना बळी पडणार नाही.

- डॉ. धर्मेश धवणकर, प्राध्यापक, जनसंवाद विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय

.....................