शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

अखंड भारताची ज्योत मनात पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST

नागपूर : इतिहासात आतापर्यंत भारतमातेला २४ वेळा खंडित करण्याचे पाप झाले आहे. हे देशवासीयांनी विसरून चालणार नाही; ज्या-ज्या वेळी ...

नागपूर : इतिहासात आतापर्यंत भारतमातेला २४ वेळा खंडित करण्याचे पाप झाले आहे. हे देशवासीयांनी विसरून चालणार नाही; ज्या-ज्या वेळी या देशावर आक्रमणे झालीत, त्या-त्या वेळी या देशातील युवकांनी प्राणपणाने या देशासाठी आपली आहुती दिल्याचा आपला तेजस्वी इतिहास आहे. त्यामुळेच आम्हा युवकांच्या धर्म निष्ठेने, ध्येयाने व प्रयत्नांतील सातत्याने अखंड भारताचे स्वप्न साकार होईल व ते केल्याशिवाय या देशातील युवक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन युवा वक्ते ऋग्वेद मदन सेनाड यांनी केले आहे.

अखंड भारत संकल्प दिनाच्या पर्वावर आयोजित जाहीर सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

स्वतंत्रता अमृत महोत्सव समितीतर्फे झिंगाबाई टाकळी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकरराव वानखेडे, अल्केश येरखेडे व मनोज सिंह मंचावर उपस्थित होते.

सेनाड म्हणाले, अखंड भारत हे देशातील कोट्यवधी नागरिकांचे स्वप्न असून, ते साकार करण्यासाठी युवकांच्या मनात राष्ट्रभक्ती व धर्माभिमान जागवणे आवश्यक आहे. आजची भरकटत चाललेली युवा पिढी व आपल्या संस्कृतीशी होत चाललेली फारकत हे देशासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. प्रास्ताविक मनोज सिंह यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन प्रणव मालवीय यांनी केले. सभेपूर्वी अखंड भारत युवक रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर अखंड भारत साकार करण्याचा संकल्प करण्यात आला व सामूहिक वंदेमातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी कमलेश डोंगरे, रूपेश सोनटक्के, पवन चरडे, रत्नाकर ठाकरे, अभिजित टेकाडे आदींनी परिश्रम केले.