शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अखंड भारताची ज्योत मनात पेटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:11 IST

नागपूर : इतिहासात आतापर्यंत भारतमातेला २४ वेळा खंडित करण्याचे पाप झाले आहे. हे देशवासीयांनी विसरून चालणार नाही; ज्या-ज्या वेळी ...

नागपूर : इतिहासात आतापर्यंत भारतमातेला २४ वेळा खंडित करण्याचे पाप झाले आहे. हे देशवासीयांनी विसरून चालणार नाही; ज्या-ज्या वेळी या देशावर आक्रमणे झालीत, त्या-त्या वेळी या देशातील युवकांनी प्राणपणाने या देशासाठी आपली आहुती दिल्याचा आपला तेजस्वी इतिहास आहे. त्यामुळेच आम्हा युवकांच्या धर्म निष्ठेने, ध्येयाने व प्रयत्नांतील सातत्याने अखंड भारताचे स्वप्न साकार होईल व ते केल्याशिवाय या देशातील युवक स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन युवा वक्ते ऋग्वेद मदन सेनाड यांनी केले आहे.

अखंड भारत संकल्प दिनाच्या पर्वावर आयोजित जाहीर सभेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

स्वतंत्रता अमृत महोत्सव समितीतर्फे झिंगाबाई टाकळी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शंकरराव वानखेडे, अल्केश येरखेडे व मनोज सिंह मंचावर उपस्थित होते.

सेनाड म्हणाले, अखंड भारत हे देशातील कोट्यवधी नागरिकांचे स्वप्न असून, ते साकार करण्यासाठी युवकांच्या मनात राष्ट्रभक्ती व धर्माभिमान जागवणे आवश्यक आहे. आजची भरकटत चाललेली युवा पिढी व आपल्या संस्कृतीशी होत चाललेली फारकत हे देशासमोरचे सगळ्यात मोठे आव्हान आहे. प्रास्ताविक मनोज सिंह यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन प्रणव मालवीय यांनी केले. सभेपूर्वी अखंड भारत युवक रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सभेनंतर अखंड भारत साकार करण्याचा संकल्प करण्यात आला व सामूहिक वंदेमातरम्‌ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी कमलेश डोंगरे, रूपेश सोनटक्के, पवन चरडे, रत्नाकर ठाकरे, अभिजित टेकाडे आदींनी परिश्रम केले.