शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पोलीस पाटलाच्या खुनात आरोपीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 23:03 IST

जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत घडली होती.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : ५० हजार रुपये दंडही ठोठावलानागपूर ग्रामीण तहसील कार्यालय आवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या भांडणावरून चुलत भावाचा खून करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, अशी कठोर शिक्षा सुनावली. न्यायाधीश ए. एस. काझी यांनी हा निर्णय दिला. ही घटना १६ आॅगस्ट २०१४ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीत घडली होती.गौतम मोतीराम भांगे (५९) असे आरोपीचे नाव असून, तो वलनी (खंडाळा) येथील रहिवासी आहे. मयताचे नाव शांताराम उकनराव भांगे (४७) होते. शांताराम पोलीसपाटील होते. त्यांचे आरोपीसोबत पटत नव्हते. गावामध्ये त्यांची अनेकदा भांडणे झाली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. घटनेच्या दिवशी शांताराम रेशन दुकानाचा परवाना व पोलीस पाटीलपदाच्या नूतनीकरणासाठी ग्रामीण तहसील कार्यालयात आले होते. आरोपीही त्यांचा पाठलाग करीत कार्यालयात गेला होता. त्याच्याजवळ कुऱ्हाड होती. दरम्यान, आरोपीने संधी मिळताच शांतारामवर हल्ला केला. शांताराम यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे शांताराम गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. शांताराम यांचे मित्र राजेंद्र नवघरे (२८) यांनी पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली. सत्र न्यायालयात सरकार पक्षाने आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी १७ साक्षीदार तपासले. सरकारतर्फे अ‍ॅड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयLife Imprisonmentजन्मठेप