शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

२५ कृषि सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, कृषि विभागाचा दणका

By गणेश हुड | Updated: June 5, 2023 15:44 IST

मान्यता नसलेल्या २९ कृषि सेवा केंद्रांना विक्रीबंद आदेश

नागपूर : कृषि विभागाच्या जिल्ह्यातील भरारी पथकांनी ३ बियाणे उत्पादक आणि ४३४ कृषि सेवा केंद्रांची आकस्मिक तपासणी केली. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी १४३ बियाणे, १३७ रासायनिक खते आणि २५ किटकनाशके नुमने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेले आहेत. या पैकी आतापर्यंत १३ रासायनिक खते, १ बियाणे आणि १ किटकनाशके नमुने अप्रमाणित असल्याने तसेच गुणवत्ता नियंत्रण मानकांची पूर्तता नसल्याने  २५ कृषि सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. तसेच २९ कृषि सेवा केंद्राना  विक्री बंद आदेश जारी करण्यात आले आहेत. 

नागपूर जिल्हा कृषि विभाग आणि जिल्हा परिषद अधिनस्त जिल्ह्यातील एकूण ४० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते आणि किटकनाशके या प्रमाणित कृषि निविष्ठा गुणवत्तापूर्ण आणि एमआरपी मध्ये उपलब्ध होण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांचे नेतृत्वात  तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी  जिल्हास्तरावर एक  आणि तालुका स्तरावरील १३ असे एकूण १४ भरारी पथकांचे गठन करण्यात आले आहेत. या मोहिमेत जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले कृषि विकास अधिकारी संजय पिंगट, मोहीम अधिकारी जयंत कौटकर, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषि अधिकारी,  तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी आणि तालुका कार्यालयात कृषि अधिकारी हे सर्व अधिकारी भरारी पथकात सहभागी आहेत.

नागपूर जिल्ह्यात खरीप हंगामात ४ लाख ७७ हजार हेक्टर वर पेरणी अपेक्षित असून त्यापैकी कापूस २ लाख २५ हजार हेक्टर, भात ९५ हजार हेक्टर, सोयाबीन ९० हजार हेक्टर आणि तूर ७० हजार हेक्टर वर पेरणी अपेक्षित आहे. या करिता कापूस बियाणेचे ११ लाख २५ हजार पाकिटे,, भात २३ हजार क्विंटल, सोयाबीन २७ हजार क्विंटल आणि तूर ३ हजार सातशे क्विंटल आवश्यक आहे. योग्य वाणाचे बियाणे तसेच विविध प्रकारचे १ लाख ६१ मेट्रिक टन रासायनिक खतांची आवश्यकता असल्याने कोणताही तुटवडा न पडू देता सर्व निविष्ठा शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहचविण्याकरिता कृषि विभाग कटिबद्ध असल्याचे मनोहरे यांनी सांगितले.

अवैध खत-बियाणे साठ्याची तक्रार करा

 जिल्ह्यातील एकूण २ हजार पेक्षा जास्त परवानाधारक कृषि सेवा केंद्राची तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अवैध साठा करणा-या, जादा दराने विक्री करणा-या, बोगस निविष्ठा विक्री करणा-या कृषि सेवा केंद्रावर कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात शेतकरी बांधवांची काही तक्रार असल्यास लेखी जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्ष, अथवा अथवा निनावी स्वरुपात जिल्हा आणि तालुका कार्यालयात तक्रार दाखल करावी, असे आवाहन विंद्र मनोहरे यांनी केले आहे. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी