शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

आम्ही आदराने केव्हा ओळखले जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:59 IST

समाजाच्या आरंभापासूनच तृतीयपंथीयांचे अस्तित्व आहे, तरीदेखील आजही ते समाजबाह्यच आहेत अशी खंत सारथी व हमसफर या दोन संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देएलजीबीटी समुदायाचा सामान्य नागरिकांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: आम्हाला छक्का, मामू, लुक्खा या शब्दांसोबत केव्हापर्यंत आयुष्य काढावे लागणार आहे? आमची ओळख करून देताना हे समलैंगिक असून किंवा ते तृतीयपंथी असून त्यांचे नाव अमूक अमूक आहे असे म्हटले जाते. पण एखाद्या सामान्य स्त्री किंवा पुरुषाची ओळख करून देताना, हे हेट्रोसेक्शुअल आहेत, असे कधीच म्हटले जात नाही. तिथे त्यांचे स्त्री किंवा पुरुष असणे हे समाजमान्य व आदरयुक्तच असते. आमच्या बाबतीत मात्र समाज आमच्या लैंगिक आकर्षणाच्या प्राधान्यक्रमानुसार आम्हाला ओळखतो. वास्तविक समाजाच्या आरंभापासूनच तृतीयपंथीयांचे अस्तित्व आहे, तरीदेखील आजही ते समाजबाह्यच आहेत अशी खंत सारथी व हमसफर या दोन संस्थांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली.एलजीबीटी या अल्पाक्षरी संज्ञेने ओळखल्या जाणाऱ्या समलैंगिक समाजाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या सारथी ट्रस्टचे अध्यक्ष आनंद चंद्राणी, सीईओ निकुंज जोशी व तृतीय पंथियांच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या विद्या कांबळे यांनी या विषयावर परखड मते मांडली.निकुंज जोशी यांनी, सेक्स आणि जेंडर यातला फरक विशद केला. यात जीवशास्त्रीय व समाजशास्त्रीय व्याख्यांमुळे उडणारा गोंधळ व त्याचा होणारा मनस्ताप कसा असतो यावर भाष्य केले. स्त्री पुरुष आणि इतर या तीन लिंगभेदांपैकी इतर या वर्गवारीत ५० हून अधिक उपवर्ग मोडतात. यात ट्रान्सजेंडर्स, ट्रान्ससेक्शुअल्स, क्वेश्चनिंग, इंटरसेक्स, ए सेक्शुअल असे अनेक उपवर्ग आहेत. या इतरांना निसर्गानेच तसे घडवले असते. तसे असण्यात या इतरांची स्वत:ची काहीच भूमिका वा इच्छा नसते. आपण वेगळे आहोत म्हणजे नेमके काय आहोत हे समजण्याचा त्यांचा संघर्ष फार मोठा असतो आणि त्याचसोबत त्यांना समाज व कुटुंबासोबतही संघर्ष करावा लागत असतो या वस्तुस्थितीची जाणीव निकुंज यांनी करून दिली.यासंदर्भात सरकारच्या ठोस योजना असाव्यात, शिक्षण क्षेत्रात योग्य ते अभ्यासक्रम असावेत व सामाजिक रचनेत या इतरांना सामावून घेण्याच्या वाटा प्रशस्त असाव्यात अशी मांडणी केली. या सर्व वाटचालीत प्रसिद्धीमाध्यमांची भूमिका मोठी व मोलाची असते त्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांतील प्रतिनिधींनीही आमच्या समुदायाबाबत नीट वास्तववादी माहिती जाणून घ्यावी असे आवाहन सारथी ट्रस्टचे संस्थापक आनंद चंद्राणी यावेळी केले.विद्या कांबळे यांनी, अन्य राज्यांमध्ये तृतीयपंथी समाजासाठी अनेक चांगल्या योजना असून, त्याद्वारे त्यांची प्रगती होत असल्याची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारनेही तृतीयपंथियांसाठी योजना आखाव्यात व राबवाव्यात असे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रसिद्धीमाध्यमांतील अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.

 

टॅग्स :Socialसामाजिक