शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘पत्र’ कमी झाले,‘व्यवहार’ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:42 IST

‘हम ने सनम को खत लिखा...’ दूरवर कुठेतरी असलेल्या नात्याशी जुळून राहण्यासाठी पोस्टाची महती सांगणार हे गाणे.

ठळक मुद्देआंतरराष्टÑीय ट्रॅक पॅकेट सेवेची भर : पोस्टाच्या अनेक लोकाभिमुख सेवाराष्ट्रीय टपाल दिन विशेष

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हम ने सनम को खत लिखा...’ दूरवर कुठेतरी असलेल्या नात्याशी जुळून राहण्यासाठी पोस्टाची महती सांगणार हे गाणे. पूर्वी पोस्टमन म्हणजे असे भावनिक नाते जुळवून ठेवणारा माणूस. गाणे आणि नाती आजही तशीच आहेत, यातला पोस्टमन मात्र हरवलाय. दूरचा हालहवाल, भावनिक गुंतागुंत जाणण्यासाठी आज पोस्टकार्ड, आंतरदेशीचा वापर बंद झाला आहे. इंटरनेट, मोबाईलच्या एका क्लीकवर संपूर्ण जग जवळ आले असताना पत्राचा वापर कोण करणार? बदल मान्य करावाच लागतो. पत्राचे मुख्य काम कमी झाले म्हणून पोस्टाकडे काम नाही, असा गैरसमज मात्र कुणी करू नये. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी नवनवीन सेवा, योजना पोस्टाने सुरू केल्या आहेत. त्यामुळे पत्र कमी झाले, ‘व्यवहार’ नाही अशी भावना पोस्टात काम करणारा प्रत्येक माणूस व्यक्त करतो.जागतिक डाक दिनानिमित्त डाक विभागाने सोमवारी ‘इंटरनॅशनल ट्रॅक पॉकेट सेवा’ सुरू केली. जीपीओ नागपूरचे वरिष्ठ डाकपाल मोहन निकम यांनी माहिती देताना सांगितले, ही सेवा आॅस्ट्रेलिया, जापान, कंबोडिया, हाँगकाँग आदी आशिया पॅसिफिकमधल्या १२ देशांसाठी आहे. यामध्ये अत्यल्प दरात दोन किलो वजनापर्यंतची वस्तू या १२ देशात पाठविली जाऊ शकते. विशेष म्हणजे वस्तू पाठविणारी व्यक्ती घरबसल्या आपल्या वस्तूचे लोकेशन माहिती करू शक णार आहे. पोस्टाची ही सेवासुद्धा लोकप्रिय ठरेल असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला.बदलत्या काळानुसार बदल करून पोस्टाने अनेक सेवा वेळोवळी सुरू केल्या. स्पीड पोस्ट, ई-पोस्ट, फर्स्ट क्लास मेल, एक्स्प्रेस, पार्सल, कॅश आॅन डिलिव्हरी आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित व्यवहारांचाही विस्तार करण्यात आला आहे. शहरात ६६ पोस्ट आॅफिस व दोन मुख्य डाकघर आहेत. स्पीड पोस्टच्या माध्यमातून दर महिन्याला एक लाखाच्या वर ग्राहकांची नोंद होत असून २ लाख ३८ हजार पोस्ट डिलिव्हर केल्या जातात. याशिवाय शासकीय, अशासकीय, खासगी कंपन्या, संस्थांचा पत्रव्यवहार आणि मार्केटिंगचे कामही पोस्टाच्या माध्यमातून होत असून पोस्टमनचे काम दुपटीने वाढले आहे. मोबाईलवर दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा काळ असला तरी पोस्टाद्वारे ग्रिटिंग पाठविणेही पसंत केले जाते. ई-पोस्ट तशी शासकीय कामकाजात लोकप्रिय सेवा आहे. मात्र ई-पोस्टच्या माध्यमातून शुभेच्छा कार्ड पाठविणाºयांचीही संख्या कमी नसल्याचे निकम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.सव्वाशे वर्षांचा डाक विमाभारतात सर्वात आधी डाक विभागाने १८८४ साली विम्याची सेवा सुरू केली होती. सुरुवातीला ही सेवा मुख्यत: खडतर काम करणाºया पोस्टमन व इतर कर्मचाºयांसाठी होती. पुढे सेवेचा विस्तार करून सामान्य लोकांसाठीही सुरू करण्यात आली. सध्या नागपूर विभागातील १ लाख १६ हजार ४०४ शासकीय कर्मचारी या विम्याचे लाभधारक असून ग्रामीण भागातील ५ लाख ३८ हजार ८० सामान्य ग्राहक ही सुविधा घेत आहेत. विशेष बाब म्हणजे ही विमा सेवा महामहीम राष्टÑपतींच्याद्वारे काढली जाते.‘माय स्टॅम्प’चा विस्तारसामान्य माणूस स्वत:चा फोटो असलेला स्टॅम्प तयार करू शकेल अशी सुविधा डाक विभागाने ‘माय स्टॅम्प’च्या माध्यमातून तीन वर्षांपासून सुरू केली आहे. या सुविधेचा विस्तार करीत फिलाटेली विभागाने शाळा किंवा सामाजिक संस्थांची आठवण असलेला स्टॅम्प तयार करण्याची सुविधा सुरू केली आहे. तसे कुणीही याची मागणी करू शकतो, मात्र २५ वर्षे झालेल्या संस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन निकम यांनी केले. फिलाटेली डिपॉजिट अकाऊंट (पीडीए)द्वारे नवीन आलेले स्टॅम्प सर्व माहितीसह शाळांमध्ये पाठविण्याची सेवाही विभागाने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.आता रामायणचेही स्टॅम्पपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबर रोजी वाराणसी येथे रामायणातील काही प्रसंगांच्या पोस्टल स्टॅम्पचे लोकार्पण केले होते. यामध्ये सीता स्वयंवरपासून रावणाच्या वधापर्यंतचे प्रसंग असलेल्या ११ स्टॅम्पचा समावेश आहे. शीटलेट व मिनिएचर शीटमध्ये हे स्टॅम्प जीपीओच्या फिलाटेली विभागात उपलब्ध आहेत. हे स्टॅम्प फ्रेममध्ये उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे.