शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

'चलो गाव की ओर' हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:56 IST

आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देस्वदेशीचे महत्त्व समजण्याची गरज

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : जल, जमीन आणि जंगल हे या देशाची संपत्ती आहे. हीच संपत्ती देशाच्या आर्थिक विकासाचा आधार होऊ शकते. त्यामुळे स्वदेशीचे महत्त्व जाणून ग्रामीण, कृषी व वनवासी भागात जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतच्या वतीने दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘दत्तोपंताचे अर्थचिंतन’ या विषयावर नितीन गडकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. या व्याख्यानातून नितीन गडकरी यांनी दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक विचार सभागृहात मांडले. गडकरी म्हणाले की, दत्तोपंत ठेंगडी यांनी जे अर्थचिंतन केले त्यात गाव समृद्ध झाले पाहिजे. गावातील नैसिर्गक स्रोतावर संशोधन करून गावाचे आर्थिक परिवर्तन झाल्यास, शहराच्या समस्या सुटू शकतात. स्वदेशीचे तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रविज्ञान या दोघांच्या आधारावर भविष्याचा समाज उभा करण्याचे विचार ठेंगडी यांनी मांडले होते. त्यामुळे ठेंगडी यांच्या सामाजिक आणि आर्थिक विचाराचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी टेक्नॉलॉजीचे महत्त्व पटवून सांगत, जी टेक्नॉलॉजी लोकांना बेरोजगार करीत असेल ती टेक्नॉलॉजी मला मान्य नाही. जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन झाले पाहिजे. हीच गोष्ट दत्तोपंत ठेंगडी यांनी सांगितली. यावेळी गडकरी यांच्या हस्ते अ.भा. ग्राहक पंचायतचे शिल्पकार बापू महाशब्दे यांच्या जीवनावर आधारित स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक श्रीराम हरकरे, अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस, ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक त्रिवेदी, विदर्भ प्रांतच्या अध्यक्ष स्मिता देशपाडे, अमर महाशब्दे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पांडे यांनी केले. संचालन नीता खोत यांनी केले. आभार अनिरुद्ध गुप्ते यांनी मानले. कार्यक्रमाला नैना देशपांडे, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, नरेंद्र कुळकर्णी, गणेश शिरोळे, श्रुती शिरोळे आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर