शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

'चलो गाव की ओर' हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:56 IST

आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देस्वदेशीचे महत्त्व समजण्याची गरज

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : जल, जमीन आणि जंगल हे या देशाची संपत्ती आहे. हीच संपत्ती देशाच्या आर्थिक विकासाचा आधार होऊ शकते. त्यामुळे स्वदेशीचे महत्त्व जाणून ग्रामीण, कृषी व वनवासी भागात जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतच्या वतीने दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘दत्तोपंताचे अर्थचिंतन’ या विषयावर नितीन गडकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. या व्याख्यानातून नितीन गडकरी यांनी दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक विचार सभागृहात मांडले. गडकरी म्हणाले की, दत्तोपंत ठेंगडी यांनी जे अर्थचिंतन केले त्यात गाव समृद्ध झाले पाहिजे. गावातील नैसिर्गक स्रोतावर संशोधन करून गावाचे आर्थिक परिवर्तन झाल्यास, शहराच्या समस्या सुटू शकतात. स्वदेशीचे तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रविज्ञान या दोघांच्या आधारावर भविष्याचा समाज उभा करण्याचे विचार ठेंगडी यांनी मांडले होते. त्यामुळे ठेंगडी यांच्या सामाजिक आणि आर्थिक विचाराचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी टेक्नॉलॉजीचे महत्त्व पटवून सांगत, जी टेक्नॉलॉजी लोकांना बेरोजगार करीत असेल ती टेक्नॉलॉजी मला मान्य नाही. जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन झाले पाहिजे. हीच गोष्ट दत्तोपंत ठेंगडी यांनी सांगितली. यावेळी गडकरी यांच्या हस्ते अ.भा. ग्राहक पंचायतचे शिल्पकार बापू महाशब्दे यांच्या जीवनावर आधारित स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक श्रीराम हरकरे, अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस, ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक त्रिवेदी, विदर्भ प्रांतच्या अध्यक्ष स्मिता देशपाडे, अमर महाशब्दे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पांडे यांनी केले. संचालन नीता खोत यांनी केले. आभार अनिरुद्ध गुप्ते यांनी मानले. कार्यक्रमाला नैना देशपांडे, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, नरेंद्र कुळकर्णी, गणेश शिरोळे, श्रुती शिरोळे आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर