शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

'चलो गाव की ओर' हाच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 23:56 IST

आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देस्वदेशीचे महत्त्व समजण्याची गरज

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : जल, जमीन आणि जंगल हे या देशाची संपत्ती आहे. हीच संपत्ती देशाच्या आर्थिक विकासाचा आधार होऊ शकते. त्यामुळे स्वदेशीचे महत्त्व जाणून ग्रामीण, कृषी व वनवासी भागात जास्तीत जास्त विकास झाला पाहिजे. आज परत एकदा महात्मा गांधी यांनी मांडलेला ‘चलो गाव की ओर’ या विचारावर चालण्याची गरज असून, हाच विचार देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचे मत केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतच्या वतीने दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘दत्तोपंताचे अर्थचिंतन’ या विषयावर नितीन गडकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात करण्यात आले होते. या व्याख्यानातून नितीन गडकरी यांनी दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक विचार सभागृहात मांडले. गडकरी म्हणाले की, दत्तोपंत ठेंगडी यांनी जे अर्थचिंतन केले त्यात गाव समृद्ध झाले पाहिजे. गावातील नैसिर्गक स्रोतावर संशोधन करून गावाचे आर्थिक परिवर्तन झाल्यास, शहराच्या समस्या सुटू शकतात. स्वदेशीचे तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रविज्ञान या दोघांच्या आधारावर भविष्याचा समाज उभा करण्याचे विचार ठेंगडी यांनी मांडले होते. त्यामुळे ठेंगडी यांच्या सामाजिक आणि आर्थिक विचाराचे संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले.यावेळी त्यांनी टेक्नॉलॉजीचे महत्त्व पटवून सांगत, जी टेक्नॉलॉजी लोकांना बेरोजगार करीत असेल ती टेक्नॉलॉजी मला मान्य नाही. जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन झाले पाहिजे. हीच गोष्ट दत्तोपंत ठेंगडी यांनी सांगितली. यावेळी गडकरी यांच्या हस्ते अ.भा. ग्राहक पंचायतचे शिल्पकार बापू महाशब्दे यांच्या जीवनावर आधारित स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंचालक श्रीराम हरकरे, अ.भा. ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनकर सबनीस, ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अशोक त्रिवेदी, विदर्भ प्रांतच्या अध्यक्ष स्मिता देशपाडे, अमर महाशब्दे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पांडे यांनी केले. संचालन नीता खोत यांनी केले. आभार अनिरुद्ध गुप्ते यांनी मानले. कार्यक्रमाला नैना देशपांडे, उदय दिवे, दत्तात्रय कठाळे, नरेंद्र कुळकर्णी, गणेश शिरोळे, श्रुती शिरोळे आदींचे सहकार्य लाभले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर