शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची ‘लेटलतिफी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST

नागपूर : ठरावीक दिवसात लोकांची काम व्हावीत याकरिता शासनाने ‘सेवा हमी कायदा’ केला आहे. त्यानंतरही एकाच कामासाठी लोकांना शासकीय ...

नागपूर : ठरावीक दिवसात लोकांची काम व्हावीत याकरिता शासनाने ‘सेवा हमी कायदा’ केला आहे. त्यानंतरही एकाच कामासाठी लोकांना शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्याचा लोकांना शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. कर्मचाऱ्यांच्या ‘लेटलतिफी’चा अनुभव सेतू कार्यालयात लोकांना विविध प्रमाणपत्रे बनविताना येत आहे.

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेग सर्वांनाच माहीत आहे. केवळ एक प्रमाणपत्र बनविण्यासाठी लोक आपली सर्व कामे सोडून संपूर्ण दिवस रांगेत उभे राहतात आणि आपला क्रमांक येण्याची वाट बघतात. समजा खिडकीजवळ पोहोचले आणि कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ झाली तर ते कामे सोडून खिडकी बंद करतात. कर्मचाऱ्यांच्या अशा मनमानी व्यवहारामुळे लोकांना संपूर्ण दिवस केवळ एकाच कामासाठी खर्ची घालावा लागतो. कागदपत्रांमध्ये थोडीही चूक असेल तर कर्मचारी त्यात सुधारणा करून आणण्यास सांगताे. त्यानंतर कागदपत्रांच्या तपासणीसाठी नव्याने रांगेत उभे राहावे लागते. त्यात पुन्हा चूक आढळली तर कर्मचारी दुसऱ्या दिवशी बोलवितात. असा अनुभव सर्वांना येत असल्याने ‘नको ते शासकीय कार्यालय आणि नको ते काम’ अशी म्हण आता प्रचलित होऊ लागली आहे.

एकावेळी बनते केवळ एकच प्रमाणपत्र

सेतू कार्यालयात एकावेळी एकच प्रमाणपत्र बनविले जाते. जर एकपेक्षा जास्त प्रमाणपत्र बनवायचे असेल तर दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत उभे राहावे लागते.

कागदपत्रांची तपासणी बनली डोकेदुखी

रहिवासी (डोमिसाईल) दाखला बनविण्यासाठी सेतू कार्यालयात दोन दिवसांपासून येणारी रवीना म्हणाली, सकाळपासून रांगेत उभी असून तीन तासानंतर क्रमांक आला आहे. एका कागदात त्रुटी आढळली तर पुढील कागद कर्मचारी तपासणार नाहीत. कर्मचाऱ्याने संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करून त्रुटी सांगाव्यात. पण सेतू कार्यालयातील कर्मचारी एकावेळी संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करीत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही कागदपत्रांची तपासणी करावीच लागते. लहान कामासाठी संपूर्ण दिवस वाया जातो आणि दुसरे काम होत नाही.

विद्यार्थी आणि पालक त्रस्त

शिवम बारावीचा विद्यार्थी आहे. त्याला कॉलेजमध्ये जमा करण्यासाठी उत्पन्नाचा दाखल आणि जात प्रमाणपत्राची गरज आहे. तो गेल्या चार दिवसांपासून सेतू कार्यालयात चकरा मारत आहे. कर्मचारी एकाचवेळी संपूर्ण माहिती देत नाही. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी वडिलांची गरज असते. या कामासाठी त्यांनाही काम सोडून यावे लागत आहे. शिवम म्हणाला, येथे विशिष्ट प्रमाणपत्र काढण्यासाठी शासनाने लोकांना विस्तृत माहिती देणारा सूचना फलक लावावा.

पार्किंगसाठी त्रास

सेतूमध्ये कार्यालयात जाण्यासाठी काही ठिकाणी पेड तर काही ठिकाणी फ्री पार्किंग आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र बनविण्यासाठी तीन ते चार दिवस सतत चकरा माराव्या लागतात. पेड पार्किंगमध्ये दुचाकी ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जातो. पार्किंगवरून अनेकदा वाद होत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत.

संपूर्ण परिसर अस्वच्छ

सेलू कार्यालय परिसरात नेहमीच अस्वच्छता असते. सफाई कर्मचारी परिसर साफ केल्यानंतर परिसरातच कचऱ्याचा ढीग लावतात. त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याची लोकांची मागणी आहे.