शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

ठाकरे महाराज पंढरपूरला यावेत, ही जणू विठ्ठलाचीच इच्छा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 10:25 IST

Nagpur News परंपरेप्रमाणे दरवर्षी देवशयनी एकादशीच्या पंधरा दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी आळंदी येथे पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी तेथून पंढरपुराकडे पायी वारी सुरू होते. यंदा २ जुलै रोजी वारकऱ्यांची पालखी आळंदीला पोहोचली आणि ३ जुलै रोजी तेथून आळंदीकडे पायी वारी रवाना झाली.

ठळक मुद्देसंचारबंदीचे अनेक अडथळे पार करीत नागपूरची दिंडी पांडुरंगाच्या भेटीला

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भक्ताच्या भावनेपुढे देवही हतबल असतो आणि त्याला जो हवा त्याला तो बोलावतोच. किंबहुना, त्याला साक्षात्कार देण्यासाठी अडथळे पार करण्याची प्रेरणा व सामर्थ्यही देतो. देव भक्ताचा भुकेला असतो, हे उदाहरण द्यायचे झाले तर नागपूरचे फेटरी येथील ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांचे द्यावे लागेल. वर्तमानातील परिस्थितीनुरूप आलेले अनेक अडथळे पार करीत ठाकरे महाराज पंढरपुरात दाखल झाले आहेत. जणू ठाकरे महाराज पंढरपुरी यावेत ही विठ्ठलाचीची इच्छा होय.

परंपरेप्रमाणे दरवर्षी देवशयनी एकादशीच्या पंधरा दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी आळंदी येथे पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी तेथून पंढरपुराकडे पायी वारी सुरू होते. यंदा २ जुलै रोजी वारकऱ्यांची पालखी आळंदीला पोहोचली आणि ३ जुलै रोजी तेथून आळंदीकडे पायी वारी रवाना झाली. त्यात विश्व वारकरी सेवा संस्थान, नागपूरच्या वतीने ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांच्या नेतृत्वात विदर्भातील पालखी, दिंडींचा सहभाग होता.

मात्र, १६ जुलैपासून पंढरपुरात संचारबंदीची घोषणा झाली आणि वारीला पोलिसी अटकाव झाला. वारीचे नेतृत्व करणारे बंडातात्या कराडकर यांना अटक झाली आणि त्यांना त्यांच्या गृहनगरी साताऱ्याला पाठविण्यात आले. यंदा विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन होणार नाही म्हणून अनेकांनी परतीचा निर्णय घेतला. मात्र, ठाकरे महाराज मागे वळण्यास तयार नव्हते. अडथळे मोठे की भक्ती मोठी, हाच त्यांचा भाव होता. एकटेच ते काही मोजक्या वारकऱ्यांसोबत बसने वाकरीपर्यंत पोहोचले आहेत.

त्यानंतर शासनाने केवळ दहा मानाच्या पालखींनाच पंढरपुरात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आणि अखेरपर्यंत तग धरून ठेवलेल्या भक्तांच्या भक्तीला यश आले. मानाच्या प्रत्येक पालखी-दिंडीत केवळ ४० वारकरी असे एकूण ४०० वारकरी देवशयनी एकादशीला पंढरपुरात प्रवेश करीत आहेत आणि त्यात भरतवाडा, काटोल येथील सद्गुरू जोध महाराज दिंडीचे ते एकट्यानेच नेतृत्व करीत आहेत. १६-१७ दिवसांतील विठ्ठल भेटीचा हा त्यांचा प्रवास ग.दी. माडगूळकरांच्या ‘परब्रह्म हे भक्तासाठी, उभे ठाकले भीमेकाठी, उभा राहिला भाव सावयव, जणु कि पुंडलिकाचा’ या ओळींचा साक्षात्कार देतो.

हा प्रवासच माझ्या विठ्ठलाचा साक्षात्कार

पंढरपुरीची वारी म्हणजे केवळ विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन नव्हे, तर येथे जमणाऱ्या वारकऱ्यांच्या तना-मनात वास करणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाचा सोहळा असतो. वृद्धही तरुण होतो, आंधळाही डोळस होतो... याची साक्षात प्रचीती या वारीत असते. यंदा तो सोहळा नाही; पण देहभान विसरण्याचा भाव कुणाचाच कमी झालेला नाही. निर्बंधांचे अनेक अडथळे पार करीत पंढरपुरात पोहोचणारा प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाचा साक्षात्कारच आहे.

- ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे

आमच्या निमंत्रणाला मान मिळाला

पंढरपुरातील संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळ्याचा मानकरी म्हणून इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखी-दिंडीला निमंत्रण देण्याची आमची परंपरा आहे. नामदेव महाराजांचे वंशज ही परंपरा आजही पाळत आहेत. इतके अडथळे पार करीत ठाकरे महाराज आणि इतर पंढरपूरला आले, ही आमचा मान वाढविणारी घटना आहे.

- ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, मानकरी

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी