शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

ठाकरे महाराज पंढरपूरला यावेत, ही जणू विठ्ठलाचीच इच्छा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 10:25 IST

Nagpur News परंपरेप्रमाणे दरवर्षी देवशयनी एकादशीच्या पंधरा दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी आळंदी येथे पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी तेथून पंढरपुराकडे पायी वारी सुरू होते. यंदा २ जुलै रोजी वारकऱ्यांची पालखी आळंदीला पोहोचली आणि ३ जुलै रोजी तेथून आळंदीकडे पायी वारी रवाना झाली.

ठळक मुद्देसंचारबंदीचे अनेक अडथळे पार करीत नागपूरची दिंडी पांडुरंगाच्या भेटीला

प्रवीण खापरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भक्ताच्या भावनेपुढे देवही हतबल असतो आणि त्याला जो हवा त्याला तो बोलावतोच. किंबहुना, त्याला साक्षात्कार देण्यासाठी अडथळे पार करण्याची प्रेरणा व सामर्थ्यही देतो. देव भक्ताचा भुकेला असतो, हे उदाहरण द्यायचे झाले तर नागपूरचे फेटरी येथील ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांचे द्यावे लागेल. वर्तमानातील परिस्थितीनुरूप आलेले अनेक अडथळे पार करीत ठाकरे महाराज पंढरपुरात दाखल झाले आहेत. जणू ठाकरे महाराज पंढरपुरी यावेत ही विठ्ठलाचीची इच्छा होय.

परंपरेप्रमाणे दरवर्षी देवशयनी एकादशीच्या पंधरा दिवस आधी वेगवेगळ्या ठिकाणच्या पालखी आळंदी येथे पोहोचतात आणि दुसऱ्या दिवशी तेथून पंढरपुराकडे पायी वारी सुरू होते. यंदा २ जुलै रोजी वारकऱ्यांची पालखी आळंदीला पोहोचली आणि ३ जुलै रोजी तेथून आळंदीकडे पायी वारी रवाना झाली. त्यात विश्व वारकरी सेवा संस्थान, नागपूरच्या वतीने ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे यांच्या नेतृत्वात विदर्भातील पालखी, दिंडींचा सहभाग होता.

मात्र, १६ जुलैपासून पंढरपुरात संचारबंदीची घोषणा झाली आणि वारीला पोलिसी अटकाव झाला. वारीचे नेतृत्व करणारे बंडातात्या कराडकर यांना अटक झाली आणि त्यांना त्यांच्या गृहनगरी साताऱ्याला पाठविण्यात आले. यंदा विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन होणार नाही म्हणून अनेकांनी परतीचा निर्णय घेतला. मात्र, ठाकरे महाराज मागे वळण्यास तयार नव्हते. अडथळे मोठे की भक्ती मोठी, हाच त्यांचा भाव होता. एकटेच ते काही मोजक्या वारकऱ्यांसोबत बसने वाकरीपर्यंत पोहोचले आहेत.

त्यानंतर शासनाने केवळ दहा मानाच्या पालखींनाच पंढरपुरात प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला आणि अखेरपर्यंत तग धरून ठेवलेल्या भक्तांच्या भक्तीला यश आले. मानाच्या प्रत्येक पालखी-दिंडीत केवळ ४० वारकरी असे एकूण ४०० वारकरी देवशयनी एकादशीला पंढरपुरात प्रवेश करीत आहेत आणि त्यात भरतवाडा, काटोल येथील सद्गुरू जोध महाराज दिंडीचे ते एकट्यानेच नेतृत्व करीत आहेत. १६-१७ दिवसांतील विठ्ठल भेटीचा हा त्यांचा प्रवास ग.दी. माडगूळकरांच्या ‘परब्रह्म हे भक्तासाठी, उभे ठाकले भीमेकाठी, उभा राहिला भाव सावयव, जणु कि पुंडलिकाचा’ या ओळींचा साक्षात्कार देतो.

हा प्रवासच माझ्या विठ्ठलाचा साक्षात्कार

पंढरपुरीची वारी म्हणजे केवळ विठ्ठलाच्या चरणाचे दर्शन नव्हे, तर येथे जमणाऱ्या वारकऱ्यांच्या तना-मनात वास करणाऱ्या पांडुरंगाच्या दर्शनाचा सोहळा असतो. वृद्धही तरुण होतो, आंधळाही डोळस होतो... याची साक्षात प्रचीती या वारीत असते. यंदा तो सोहळा नाही; पण देहभान विसरण्याचा भाव कुणाचाच कमी झालेला नाही. निर्बंधांचे अनेक अडथळे पार करीत पंढरपुरात पोहोचणारा प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाचा साक्षात्कारच आहे.

- ह.भ.प. प्रमोद महाराज ठाकरे

आमच्या निमंत्रणाला मान मिळाला

पंढरपुरातील संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळ्याचा मानकरी म्हणून इतर जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पालखी-दिंडीला निमंत्रण देण्याची आमची परंपरा आहे. नामदेव महाराजांचे वंशज ही परंपरा आजही पाळत आहेत. इतके अडथळे पार करीत ठाकरे महाराज आणि इतर पंढरपूरला आले, ही आमचा मान वाढविणारी घटना आहे.

- ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के, मानकरी

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारी