शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

By निशांत वानखेडे | Updated: September 22, 2024 16:25 IST

रामदास आठवले यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान

नागपूर : चाैथ्यांदा आमचे सरकार येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. आमची सत्ता येईल की नाही माहिती नाही, पण सत्ता कुणाचीही आली तर आठवले यांची जागा पक्की आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज एका कार्यक्रमात व्यक्त केले.

नितीन गडकरी यांच्याहस्ते मारवाडी फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा २०२४ चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना प्रदान करण्यात आला. चिटणवीस सेंटर येथे आयाेजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी खासदार प्रदीन गांधी, मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, अतुल काेटेचा, श्रीकृष्ण चांडक, सुधीर बाहेती आदी मान्यवर उपस्थित हाेते. गडकरी म्हणाले, दलित शोषित समाजाला न्याय देण्याचं काम रामदास आठवले यांनी केले असून दलित चळवळीच रूपांतर आर्थिक विकासाच्या चळवळीत होण्यासाठी आठवलेंनी पुढाकार घेतल्याचे गाैरवाेद्गार काढले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर, दिल्ली येथील स्मारक आणि मुंबईच्या इंदू मिलच्या जागेवरील स्मारकासाठी रामदास आठवले यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांचे सामाजिक आणि राजनीती कार्य हे मोठे आहे असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे संचालन शुभदा फडणवीस यांनी केले.

माेदींकडे आहे सत्तेत येण्याचे तंत्र : आठवलेसत्काराला उत्तर देताना रामदास आठवले यांनी, नरेंद्र माेदी यांच्याकडे सत्तेत येण्याचे तंत्र माहिती असल्याने आम्ही चाैथ्यांदा सरकार बनवू, असा दावा केला. मी चळवळीतून तयार झालेला कार्यकर्ता असून त्याच शैलीत बाेलायलाही आवडते. हीच शैली लाेकांनाही आवडत असल्याने माझे सर्व समाजाच्या नेत्यांशी नाते आहे. केवळ आपला समाज नाही तर सगळा समाज, देश जाेडला पाहिजे, ही बाबासाहेबांची भावना हाेती व त्यानुसारच मी काम करीत असल्याचे ते म्हणाले. डाॅ. बाबासाहेबांच्या अथक संघर्षातून आम्ही माेठ्या पदावर जावू शकलाे. आरक्षणाने समाजाचा फायदा झाला, मराठा समाजालाही आरक्षणाचे समर्थन करीत असल्याचे ते म्हणाले. बाैद्ध समाजात सर्वांना प्रमुख नेता व्हायचे आहे, कार्यकर्ता हाेणे कुणालाही आवडत नाही, त्यामुळे एकत्रिकरण करण्याच्या नावाने रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात आजही एकत्र येण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRamdas Athawaleरामदास आठवले