शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : विरोधकांवरच ‘हल्लाबोल’, पहिल्या दिवशी सत्ताधारीच आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 05:55 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले.

- कमलेश वानखेडेनागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले.विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत चर्चेची मागणी केली. ती नाकारून विधानसभाध्यक्षांनी कामकाज पुकारताच विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. त्यांनी कर्जमाफी फसवी असून दीड हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीमुख्यमंत्र्यांनी तुमच्या सरकारने कर्जमाफीत संपूर्ण विदर्भाला जेवढी रक्कम दिली नाही तेवढी आम्ही एकट्या बुलडाणा जिल्ह्याला दिली आहे. तुम्ही सिंचन व कर्जाची व्यवस्था केली नाही म्हणून आज शेतकºयांवर ही वेळ आली आहे, असे सुनावले.शेवटच्या पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना सुरू राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तरीही विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती.‘नौटंकी’वरून ‘ड्रामा’विधान परिषदेत हिवाळी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शेतकºयांच्या बाबतीत ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. याला सत्ताधाºयांनी आक्रमक स्वरूपात प्रत्युत्तर दिले. त्यामुळे अगोदर चार वेळा व नंतर दिवसभरासाठी सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नौटंकी’ या शब्दावर आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला. विरोधकांच्या राजकारणाची पातळी खालावली आहे, असा आरोप पाटील यांनी केला. त्यामुळे विरोधक संतप्त झाले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चार वेळेला तहकूब करावे लागले. सदर शब्द तपासून घेऊ, असे आश्वासन सभापतींनी दिले.बोंडअळी नुकसानीची मदत देणारराष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोंडअळीमुळे नुकसान झालेले कापसाचे बोंड भेट म्हणून दिले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असून, नुकसानग्रस्तांना विम्याद्वारे, केंद्राच्या ‘एनडीआरएफ’ निधीतून मदत केली जाईल.स्टॅम्प पेपरवर लिहून देतो !विखे पाटील यांनी १०० रुपयांचा कोरा स्टॅम्प पेपर दाखवीत यावर ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचे लिहून देण्याचे आव्हान दिले. यावर मुख्यमंत्री म्हणाले की एक हजारांच्या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिल्याचे लिहून देण्यास तयार आहोत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७