शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन : विरोधकांवरच ‘हल्लाबोल’, पहिल्या दिवशी सत्ताधारीच आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 05:55 IST

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले.

- कमलेश वानखेडेनागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर ‘हल्लाबोल’ केला. शेतक-यांच्या कर्जमाफीवरून गोंधळ घालणा-या विरोधकांना ठणकावताना, शेतक-यांच्या आत्महत्या हे तुमचे पाप आहे, असे त्यांनी सुनावले. विरोधकांकडे दुर्लक्ष करीत सरकारने संपूर्ण कामकाजही उरकले.विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्जमाफीचा लाभ शेतकºयांना मिळाला नसल्याचे सांगत चर्चेची मागणी केली. ती नाकारून विधानसभाध्यक्षांनी कामकाज पुकारताच विरोधकांनी घोषणा सुरू केल्या. त्यांनी कर्जमाफी फसवी असून दीड हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीमुख्यमंत्र्यांनी तुमच्या सरकारने कर्जमाफीत संपूर्ण विदर्भाला जेवढी रक्कम दिली नाही तेवढी आम्ही एकट्या बुलडाणा जिल्ह्याला दिली आहे. तुम्ही सिंचन व कर्जाची व्यवस्था केली नाही म्हणून आज शेतकºयांवर ही वेळ आली आहे, असे सुनावले.शेवटच्या पात्र शेतकºयाला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची योजना सुरू राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तरीही विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती.‘नौटंकी’वरून ‘ड्रामा’विधान परिषदेत हिवाळी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शेतकºयांच्या बाबतीत ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला. याला सत्ताधाºयांनी आक्रमक स्वरूपात प्रत्युत्तर दिले. त्यामुळे अगोदर चार वेळा व नंतर दिवसभरासाठी सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नौटंकी’ या शब्दावर आक्षेप घेतल्याने गोंधळ उडाला. विरोधकांच्या राजकारणाची पातळी खालावली आहे, असा आरोप पाटील यांनी केला. त्यामुळे विरोधक संतप्त झाले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चार वेळेला तहकूब करावे लागले. सदर शब्द तपासून घेऊ, असे आश्वासन सभापतींनी दिले.बोंडअळी नुकसानीची मदत देणारराष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना बोंडअळीमुळे नुकसान झालेले कापसाचे बोंड भेट म्हणून दिले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असून, नुकसानग्रस्तांना विम्याद्वारे, केंद्राच्या ‘एनडीआरएफ’ निधीतून मदत केली जाईल.स्टॅम्प पेपरवर लिहून देतो !विखे पाटील यांनी १०० रुपयांचा कोरा स्टॅम्प पेपर दाखवीत यावर ४१ लाख शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाल्याचे लिहून देण्याचे आव्हान दिले. यावर मुख्यमंत्री म्हणाले की एक हजारांच्या स्टॅम्प पेपरवर ४१ लाख शेतकºयांना कर्जमाफी दिल्याचे लिहून देण्यास तयार आहोत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७