शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नागपुरात विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज सोमवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:20 IST

येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.

ठळक मुद्देतयारी वेगात : संपूर्ण परिसर ‘रेनप्रुफ’ करण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या ४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशनला सुरुवात होत आहे. त्याची संपूर्ण तयारी सध्या जोमात सुरू आहे. विधिमंडळ सचिवालय येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.यंदाचे अधिवेशन हे पावसाळी असल्याने पावसापासून बचाव करण्याच्या दृष्टीनेच संपूर्ण तयारी सुरू आहे. विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांनी गेल्याच आठवड्यात तयारी संबंधात आढावा घेतला होता. त्यानुसार विधानभवन परिसर हा संपूर्णपणे ‘रेनप्रुफ’ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसारच तयारी सुरू आहे. यंदा रंगरंगोटीचे काम जास्त नाही. कारण हिवाळी अधिवेशनातच रंगरंगोटी झाली. देखभल दुरुस्ती व पावसापासून संरक्षण यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यासाठी विधानभवनाच्या मुख्य गेटपासून ते इमारतीपर्यंत शेड टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्री ज्या गेटने आपल्या कक्षात प्रवेश करतात त्या बाजूनेही टिनाचे शेड उभारले जात आहे. याशिवाय विधानभवन परिसरातील विविध राजकीय पक्षांची कार्यालये सुद्धा रेनप्रूफ केली जात आहेत. विधिमंडळ सचिवालयातील काही कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. कार्यालयांमध्ये फाईल लावणे व कॉम्प्युटर लवण्यात आले आहे. इतर कार्यालयांमध्येही कामे सुरू आहेत.रविभवन, नागभवन आमदार निवास रेनप्रूफअधिवेशनसाठी येणारे कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, आमदार आणि अधिकारी वर्गाच्या निवासस्थानाच्या ठिकाणी सुद्धा पावसापासून सुरक्षेची संपूर्ण तयारी केली जात आहे. रविभवन, नागभवनातील कॉटेजसमोर शेड उभारले जात आहेत. यासोबतच आमदार निवास परिसरातही जोरात तयारी सुरू आहे. आमदार निवासाच्या दोन्ही इमारतीमध्ये कायमस्वरूपी लोखंडी शेड उभारले जात आहे.सर्पमित्र तैनातपावसाचे दिवस पाहता विधानभवन परिसर, रविभवन, नागभवन, आमदार निवासासह अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या ठिकाणी साप निघण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सर्पमित्रांची मदत घेतली आहे. विधानभवन परिसरात तयारी करीत असताना साप निघण्याच्या घटना घडतही असतात. याही वेळी साप निघाला होता. त्यामुळे आवश्यक खबरदारी म्हणून सर्पमित्र तैनात करण्यात आल्याचे सांगितले जाते.‘देवगिरी’वर चंद्रकांत पाटलांचाच दावा?नागपुरात अधिवेशन असेल तेव्हा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरीनंतर सर्वाधिक आकर्षणाचा बंगला म्हणजे ‘देवगिरी’च असतो. आजवर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुक्काम देवगिरीवर राहिलेला आहे. देवगिरीवर मुक्काम म्हणजे मुख्यमंत्र्यांनंतरचे मंत्री अशी आजवरची ओळख राहिलेली आहे. त्यामुळे देवगिरीवर मुक्कामास राहणे हे एकप्रकारचे ‘स्टेटस’सुद्धा मानले जाते. महाराष्ट्रात सध्या उपमुख्यमंत्रिपद नाही. चंद्रकांतदादा पाटील हे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यामुळे देवगिरीवर त्यांचाच दावा केला जात आहे. सध्या मंत्र्यांना निवासस्थाने वितरित झालेली नाहीत. तरीही देवगिरी बंगल्यावर ज्या जोमाने तयारी सुरू आहे, त्यावरून हा बंगला कुणाला मिळतो, याची प्रतीक्षा आहे.    

 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनnagpurनागपूर