शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'कॉलरवाली' वाघिणीच्या हृदयात दडली होती ‘माय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 11:12 IST

या वाघिणीने उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना केवळ आनंदच दिला नाही, तर एका दशकाहून अधिक काळ मध्य भारतातील वाघांच्या संख्येतही मोठे योगदान दिले.

ठळक मुद्देकमालीचे संगोपन कौशल्य २९ बछड्यांच्या ‘सुपरमॉम’चा अनेकदा अनुभव

संजय रानडे

नागपूर : लगतच्या मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात असलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाली वाघिणीच्यामृत्यूने वन्यजीवांच्या इतिहासातील एक अध्याय संपला असला तरी ही ‘सुपरमॉम’ आज अस्तित्वात नाही यावर अद्यापही विश्वास बसत नाही. हिंस्र श्वापद असलेल्या या वाघिणीच्या हृदयातही एक ‘माय’ दडली होती. त्याचा प्रत्यय आलेल्या अनेकांना आता तिच्या आठवणी अस्वस्थ करीत आहेत.

कॉलरवाली वाघिणीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’जवळ तिच्या आठवणी काढताना पीटीआरचे माजी क्षेत्र संचालक विक्रम सिंह परिहार म्हणाले, २१ मे २०१८ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत पीटीआरचे क्षेत्र संचालक म्हणून काम करताना तिला जवळून पाहण्याची संधी मिळाली. ती एक अतिशय धाडसी, बछड्यांची काळजी घेणारी वाघीण होती. कर्मचाऱ्यांच्या जवळून जातानादेखील ती कधीच आक्रमकता दाखवत नसे.

२९ बछड्यांची आई

या वाघिणीने उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना केवळ आनंदच दिला नाही, तर एका दशकाहून अधिक काळ मध्य भारतातील वाघांच्या संख्येतही मोठे योगदान दिले. या वाघिणीने आठ वेळा एकूण २९ बछड्यांना जन्म दिला, त्यापैकी २५ पिल्लांचे यशस्वीपणे पालनपोषण केले.

एक अविस्मरणीय अनुभव

कॉलरवाली वाघिणीसंदर्भात २०२० मधील एक अविस्मरणीय अनुभव विक्रम सिंह परिहार यांनी सांगितला. १६ सप्टेंबरला आपल्या गस्तीदरम्यान, त्यांना ही वाघीण करमाझिरीतील मलकुंडम नाल्याजवळील जंगलाच्या रस्त्यावर तिच्या अर्धप्रौढ झालेल्या बछड्यासोबत बसलेली होती. २७ डिसेंबर २०१८ रोजी जन्म झालेला तो नर बछडा २३ महिन्यांचा होता. या पिल्लाला ती खोटे खोटे रागावून हाकलून देण्याचा प्रयत्न करीत होती. या नर बछड्याने दूर जाऊन आपला स्वतंत्र अधिवास तयार करावा आणि त्या क्षेत्रात प्रवेशलेल्या दुसऱ्या प्रौढ नर वाघापासून (त्याच्या वडिलांपासृून) त्याचा बचाव करणे हा यामागील तिचा उद्देश होता. आपल्या बछड्यांना सांभाळण्याची तिची ही पद्धत विलक्षणच म्हणावी!

व्याघ्र संवर्धनात अविस्मरणीय योगदान - भावनिक परिहार

भारतीय वन सेवेतून अलीकडेच निवृत्त झालेले भावनिक परिहार म्हणाले, कॉलरवाली वाघिणीने आठ वेळा २९ बछड्यांना जन्म दिला. २० पेक्षा अधिक बछड्यांचे संगोपन केले. हे तिचे व्याघ्र संवर्धनातील योगदान अविस्मरणीयच म्हटले पाहिजे.

टॅग्स :environmentपर्यावरणTigerवाघDeathमृत्यू