शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चक्र व्यूहात अडकले वैधानिक विकास मंडळ

By admin | Updated: October 18, 2014 02:54 IST

प्रादेशिक विकासाचा समतोल साधण्यासाठी गठित करण्यात आलेल्या राज्यातील तीन वैधानिक विकास मंडळांचे अस्तित्व पुन्हा एकदा जर-तर च्या चक्र व्यूहात अडकले आहे.

कमल शर्मा नागपूरप्रादेशिक विकासाचा समतोल साधण्यासाठी गठित करण्यात आलेल्या राज्यातील तीन वैधानिक विकास मंडळांचे अस्तित्व पुन्हा एकदा जर-तर च्या चक्र व्यूहात अडकले आहे. राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंंतर राज्यपाल मंडळांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. त्यानंतर मंडळांना मुदतवाढ द्यायची की नाही. याबाबतचा निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निर्देशावरून तीन मंडळांचे गठन करण्यात आले होते. परंतु २०१० मध्ये मंडळे गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या निर्णयाला विदर्भातून विरोध झाल्याने राष्ट्रपतींनी मंडळांना साडेचार वर्षांची मुदतवाढ दिली . त्यानुसार ३१ मार्च २०१५ ला या मंडळांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक निकालानंतर २ नोव्हेंबरला राज्यपाल विद्यासागर राव नागपुरात येत आहेत. ते मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतील त्यानंतर यावर निर्णय घेणार आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळाली नाही. परंतु नवीन सरकार सत्तारूढ होताच राज्यपालांचा नागपूर दौरा ठरणार आहे. याला विलंब झाल्यास विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे वैधानिक विकास मंडळाच्या बाजूने आहेत. मंडळामुळे मागास भागाचा अनुशेष दूर होण्याला मदत झाली. त्यामुळे मंडळे मोडीत काढली तर अन्यायाच्या विरोधात कुणीही आवाज उठवणार नाही. दरम्यान अनुशेष दूर व्हावा म्हणून प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या केळकर समितीची मंडळासंदर्भात सकारात्मक भूमिका आहे. या बाबतचा अहवाल शासनाने अद्याप जाहीर केलेला नाही. परंतु यात मंडळांना अधिक बळकट करण्याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच आधारावर यावर्षी प्रत्येक मंडळाला शासनाकडून प्रत्येकी १०० कोटंींचा निधी उपलब्ध क रण्यात आला . मंडळाचे कार्यालय असलेल्या जागेवर सामाजिक न्याय विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारत आहे. मंडळाच्या कार्यालयासाठी नवीन कार्यालय तयार करण्यात आले आहे.