शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चक्र व्यूहात अडकले वैधानिक विकास मंडळ

By admin | Updated: October 18, 2014 02:54 IST

प्रादेशिक विकासाचा समतोल साधण्यासाठी गठित करण्यात आलेल्या राज्यातील तीन वैधानिक विकास मंडळांचे अस्तित्व पुन्हा एकदा जर-तर च्या चक्र व्यूहात अडकले आहे.

कमल शर्मा नागपूरप्रादेशिक विकासाचा समतोल साधण्यासाठी गठित करण्यात आलेल्या राज्यातील तीन वैधानिक विकास मंडळांचे अस्तित्व पुन्हा एकदा जर-तर च्या चक्र व्यूहात अडकले आहे. राज्यात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंंतर राज्यपाल मंडळांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. त्यानंतर मंडळांना मुदतवाढ द्यायची की नाही. याबाबतचा निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निर्देशावरून तीन मंडळांचे गठन करण्यात आले होते. परंतु २०१० मध्ये मंडळे गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. सुरुवातीला ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या निर्णयाला विदर्भातून विरोध झाल्याने राष्ट्रपतींनी मंडळांना साडेचार वर्षांची मुदतवाढ दिली . त्यानुसार ३१ मार्च २०१५ ला या मंडळांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक निकालानंतर २ नोव्हेंबरला राज्यपाल विद्यासागर राव नागपुरात येत आहेत. ते मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतील त्यानंतर यावर निर्णय घेणार आहे. या संदर्भात अधिक माहिती मिळाली नाही. परंतु नवीन सरकार सत्तारूढ होताच राज्यपालांचा नागपूर दौरा ठरणार आहे. याला विलंब झाल्यास विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात यावर चर्चा होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे वैधानिक विकास मंडळाच्या बाजूने आहेत. मंडळामुळे मागास भागाचा अनुशेष दूर होण्याला मदत झाली. त्यामुळे मंडळे मोडीत काढली तर अन्यायाच्या विरोधात कुणीही आवाज उठवणार नाही. दरम्यान अनुशेष दूर व्हावा म्हणून प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या केळकर समितीची मंडळासंदर्भात सकारात्मक भूमिका आहे. या बाबतचा अहवाल शासनाने अद्याप जाहीर केलेला नाही. परंतु यात मंडळांना अधिक बळकट करण्याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच आधारावर यावर्षी प्रत्येक मंडळाला शासनाकडून प्रत्येकी १०० कोटंींचा निधी उपलब्ध क रण्यात आला . मंडळाचे कार्यालय असलेल्या जागेवर सामाजिक न्याय विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारत आहे. मंडळाच्या कार्यालयासाठी नवीन कार्यालय तयार करण्यात आले आहे.