शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

यूपीएससीमध्ये बदलापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:52 IST

पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे. माय करिअर आणि स्वयम्तर्फे विदर्भामध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आलेला निष्कर्ष स्वयम्चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी पत्रपरिषदेत मांडला.

ठळक मुद्देस्वयम्च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष : विदर्भातील विद्यार्थ्यांनी नोंदविले मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे. माय करिअर आणि स्वयम्तर्फे विदर्भामध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आलेला निष्कर्ष स्वयम्चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी पत्रपरिषदेत मांडला.केंद्र शासनाने सुचविलेल्या बदलानुसार यूपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवारांना फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतरच प्रशासकीय सेवेत कॅडर मिळणार आहे. केंद्राने आणखीही बदल सुचविलेले आहेत. या निर्णयावर स्वयम्तर्फे संपूर्ण विदर्भात सर्वेक्षण करण्यात आल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले. या सर्वेक्षणानंतर आलेला निष्कर्ष त्यांनी मांडला. यानुसार ५५.४५ टक्के तरुणांनी यूपीएससीत बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे तर २०.११ टक्के तरुणांनी एखाद्या समितीचे नेमणूक करण्याचे मत व्यक्त केले. ६८.५६ टक्के तरुणांना वाटते की, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच गुणांच्या आधारावर उमेदवारांना कॅडर मिळावे तर १८.७९ टक्के तरुणांनी ट्रेनिंगनंतर कॅडर मिळण्याचे मत व्यक्त केले आहे. फाऊंडेशन कोर्सनंतर कॅडर देण्याच्या प्रक्रियेमुळे परीक्षेत अव्वल गुण मिळविलेल्या उमेदवारांवर अन्याय होईल, असे ५३.६२ टक्के तरुणांना वाटते, मात्र २३.३९ टक्के तरुण या प्रक्रियेमुळे कौशल्यप्राप्त उमेदवारांची निवड होईल, असे मत व्यक्त करतात.ज्या अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार यूपीएससीत बदल करण्याची सुचना पंतप्रधान कार्यालयाने केली, त्या अग्रवाल समितीबाबत ६३.२१ टक्के तरुण अनभिज्ञ असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. केवळ १३.३१ टक्के तरुणांनी या समितीबाबत माहिती असल्याचे सांगितले. ३१.६० टक्के तरुणांना यूपीएससीच्या प्रचलित स्वरुपात बदल नकोय तर ४०.२२ टक्के तरुणांनी काही प्रमाणात बदल करण्याचे मत व्यक्त केले आहे. २०.४० टक्के तरुणांना बदल आवश्यक वाटतो. सर्व्हेनुसार नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ८१.६० टक्के लोकांनी पुस्तकी व व्यावहारिक ज्ञानाला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग स्वतंत्र असावा असे ५०.४८ टक्के तरुणांना वाटते तर ३६.४९ टक्के तरुण केंद्राचे नियंत्रण व ९.४८ टक्के तरुण राज्य शासनाचे नियंत्रण ठेवण्याची सूचना करीत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत असल्याचे विशाल मुत्तेमवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेत स्वयम्चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगnagpurनागपूर