शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

यूपीएससीमध्ये बदलापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:52 IST

पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे. माय करिअर आणि स्वयम्तर्फे विदर्भामध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आलेला निष्कर्ष स्वयम्चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी पत्रपरिषदेत मांडला.

ठळक मुद्देस्वयम्च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष : विदर्भातील विद्यार्थ्यांनी नोंदविले मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार अग्रवाल समितीच्या शिफारशी लागू करून युपीएससीच्या परीक्षा स्वरुपात आमूलाग्र बदल करण्याचा निर्णय कें द्र शासनाने घेतला आहे. मात्र यूपीएससीच्या स्वरूपात बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचेही मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे. माय करिअर आणि स्वयम्तर्फे विदर्भामध्ये केलेल्या सर्वेक्षणानंतर समोर आलेला निष्कर्ष स्वयम्चे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी पत्रपरिषदेत मांडला.केंद्र शासनाने सुचविलेल्या बदलानुसार यूपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवारांना फाऊंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतरच प्रशासकीय सेवेत कॅडर मिळणार आहे. केंद्राने आणखीही बदल सुचविलेले आहेत. या निर्णयावर स्वयम्तर्फे संपूर्ण विदर्भात सर्वेक्षण करण्यात आल्याचे मुत्तेमवार यांनी सांगितले. या सर्वेक्षणानंतर आलेला निष्कर्ष त्यांनी मांडला. यानुसार ५५.४५ टक्के तरुणांनी यूपीएससीत बदल करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे मत जाणून घेणे आवश्यक असल्याचे तर २०.११ टक्के तरुणांनी एखाद्या समितीचे नेमणूक करण्याचे मत व्यक्त केले. ६८.५६ टक्के तरुणांना वाटते की, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच गुणांच्या आधारावर उमेदवारांना कॅडर मिळावे तर १८.७९ टक्के तरुणांनी ट्रेनिंगनंतर कॅडर मिळण्याचे मत व्यक्त केले आहे. फाऊंडेशन कोर्सनंतर कॅडर देण्याच्या प्रक्रियेमुळे परीक्षेत अव्वल गुण मिळविलेल्या उमेदवारांवर अन्याय होईल, असे ५३.६२ टक्के तरुणांना वाटते, मात्र २३.३९ टक्के तरुण या प्रक्रियेमुळे कौशल्यप्राप्त उमेदवारांची निवड होईल, असे मत व्यक्त करतात.ज्या अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार यूपीएससीत बदल करण्याची सुचना पंतप्रधान कार्यालयाने केली, त्या अग्रवाल समितीबाबत ६३.२१ टक्के तरुण अनभिज्ञ असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. केवळ १३.३१ टक्के तरुणांनी या समितीबाबत माहिती असल्याचे सांगितले. ३१.६० टक्के तरुणांना यूपीएससीच्या प्रचलित स्वरुपात बदल नकोय तर ४०.२२ टक्के तरुणांनी काही प्रमाणात बदल करण्याचे मत व्यक्त केले आहे. २०.४० टक्के तरुणांना बदल आवश्यक वाटतो. सर्व्हेनुसार नागरी सेवा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ८१.६० टक्के लोकांनी पुस्तकी व व्यावहारिक ज्ञानाला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग स्वतंत्र असावा असे ५०.४८ टक्के तरुणांना वाटते तर ३६.४९ टक्के तरुण केंद्राचे नियंत्रण व ९.४८ टक्के तरुण राज्य शासनाचे नियंत्रण ठेवण्याची सूचना करीत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येत असल्याचे विशाल मुत्तेमवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेत स्वयम्चे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगnagpurनागपूर