शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

जगण्याच्या समृद्धतेसाठी संगीत शिकावे

By admin | Updated: April 29, 2015 02:46 IST

अनेकांना गायक किंवा वादक कलावंत व्हायचे नसते. या क्षेत्रात त्यांना भविष्य घडवायचे नसल्याने ते संगीत शिकण्याकडे वळतच नाही. पण येथेच चूक होते.

नागपूर : अनेकांना गायक किंवा वादक कलावंत व्हायचे नसते. या क्षेत्रात त्यांना भविष्य घडवायचे नसल्याने ते संगीत शिकण्याकडे वळतच नाही. पण येथेच चूक होते. केवळ कलावंत होण्यासाठी संगीत शिकणे आवश्यक नाही. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी संगीताच्या शिक्षणामुळे ते काम अधिक चांगल्या पद्धतीने करता येते. त्यामुळे सादरीकरणासाठी संगीत शिकायचे नसले तरी स्वत:च्या जगण्याच्या समृद्धतेसाठी संगीत शिकायलाच हवे. आपले मन, बुद्धी आणि शांततेसाठी संगीत आवश्यक आहे, असे मत सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित यांनी मंगळवारी व्यक्त केले. रायसोनी शिक्षण समूहाचे संस्थापक जी. एच. रायसोनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धा हाऊस, किंग्जवे येथे त्यांच्या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यशाळेत जुन्या - नव्या गायक-वादकांना मार्गदर्शन करतानाच त्यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिलीत आणि प्रात्यक्षिकही सादर केले. विशेषत: या कार्यशाळेत पाच वर्षाच्या बालिकेपासून ७२ वर्षाच्या ज्येष्ठ कलावंतांनीही सहभाग घेतला. देवकी पंडित यांनी शास्त्रीयच संगीत कसे महत्त्वाचे आहे ते सांगितले. मुळात अनेकांना सुगम गायनासाठी शास्त्रीय संगीत शिकण्याची गरज नाही, असे वाटते. पण सुगम गाण्यासाठीही शास्त्रीय संगीताची तयारी असावीच लागते त्याशिवाय गाणे रंगत नाही. संगीतात रियाज अतिशय महत्त्वाचा आहे. रियाज कशा पद्धतीने करावा आणि श्वासांवर कसे नियंत्रण ठेवावे, याबाबतही त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले. गायनासाठी प्राणायाम गरजेचा आहे. कारण गायन करताना आपला आवाज हेच एक साधन असते. आपला रियाज आणि प्राणायामाची सवय आपल्या दीर्घ ताना आलापींना उपयोगी पडते. त्यासाठी श्वासावरचे नियंत्रण प्राणायामानेच शक्य होते. रियाजानंतर आपले संगीत आणि प्राणायाम याचे अद्वैत साधते आणि संगीतच आपला प्राणायाम होतो. तेच ‘मेडिटेशन’ होते. संगीत शिक ल्यावर प्रत्येकच माणूस कलावंत होऊ शकत नाही पण किमान तो चांगला रसिक होतो. रसिकांना संगीत समजले तर त्यांना संगीताचा अधिक आनंद घेता येतो. हा आनंद आयुष्य व्यापून उरणारा आहे. आपल्या मनाच्या शांततेसाठी, बुद्धीच्या प्रगल्भतेसाठी आणि कुठल्याही क्षेत्रातील क्रिएटिव्ह काम करण्यासाठी संगीताचा उपयोग होतो. चांगले श्रोते यातून तयार होतात. गायक योग्य गातो आहे वा नाही हे कळण्यासाठी रसिकांना संगीत शिकायला हवे. संगीत शिकताना गुरूअत्यंत महत्त्वाचा असतो, कारण गुरू आपल्याला नेमका मार्ग दाखवीत असतो. सुप्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीत शिकले. त्यांनी सांगितलेल्या जागा मला जमत नव्हत्या तेव्हा त्यांनी मला १००८ वेळा तालीम कर, असे रागाने मला म्हटले. गुरूने सांगितले म्हणून खरेच घरी त्याची १००८ वेळा तालीम केली आणि तो स्वर मला नेमकेपणाने सापडला. आपली उणीव गुरूशिवाय निघत नाही आणि आपल्या चुका गुरूंनाच कळत असतात. त्यामुळे संगीतात गुरूचे महत्त्व वेगळे आहे. याप्रसंगी त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. या कार्यशाळेचे संयोजन मृणाल नाईक यांनी केले. या शिबिरासाठी संस्कार भारतीचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सर्वांच्या आग्रहाखातर देवकीतार्इंनी काही सुगम गीते सादर केली. सुरेश भटांच्या ‘रंगुनी रंगात साऱ्या...’ या गझलने त्यांनी समारोप केला. (प्रतिनिधी)