शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर जिल्हा परिषदेतील १६३ शाळांच्या इमारती गळक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 11:01 IST

एकीकडे डिजिटलच्या नावावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. डिजिटल करीत असताना २५० वर शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. १६३ शाळांना गळकी लागल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचा दुरुस्तीसाठी ९२ लाखाचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेवर सातत्याने टीका होत आहे. आता पावसाळ्यात जि.प.च्या १६३ शाळांना गळकी लागली आहे. अशा वातावरणात विद्यार्थ्यांना अध्ययन करावे लागत आहे.जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. काही शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. एकीकडे डिजिटलच्या नावावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. डिजिटल करीत असताना २५० वर शाळांचा वीज पुरवठा खंडित आहे. १६३ शाळांना गळकी लागल्याची नोंद शिक्षण विभागाने घेतली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. यावर्षी झालेल्या पावसाने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती आणि छतांची पोलखोल केली. जिल्ह्यातील १६३ शाळांमधील छत गळत असल्याची नोंद आहे. यात सर्वाधिक शाळा रामटेक तालुक्यातील आहे. अतिवृष्टीमुळे नरखेड तालुक्यातील एका शाळेची सुरक्षा भिंत आणि उमरेडमधील एका शाळेचे स्वच्छतागृह पडले आहे. या शाळेतील छतांच्या तसेच स्वच्छतागृह आणि सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी ९३ लाख २२ हजारांचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून शासनाला पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :Schoolशाळा