शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

रेती घाटाच्या काळाबाजारात लिप्त आहेत नेते व अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2022 20:07 IST

Nagpur News अनेक नेते आणि अधिकारी रेती घाटाच्या काळाबाजारात लिप्त आहेत. अशा कामात लिप्त असणाऱ्यांना थेट तुरुंगातच टाकू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

ठळक मुद्दे भ्रष्टचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा

नागपूर : सरकार पर्यावरण आणि नद्यांची जैवविविधता नष्ट होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेणार नाही. अनेक नेते आणि अधिकारी रेती घाटाच्या काळाबाजारात लिप्त आहेत. अशा कामात लिप्त असणाऱ्यांना थेट तुरुंगातच टाकू. तसेच उद्योगात देण्यात येणाऱ्या वीज सबसिडीमध्ये घोटाळा करणाऱ्यांनाही सोडण्यात येणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, वेद आणि एमएम ॲक्टिव्हच्या वतीने आयोजित तीन दिवसीय मिनकॉन-२०२२ संमेलन आणि प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी खाण आणि खनिज क्षेत्रातील उद्योजकांना मार्गदर्शन केले. संमेलनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यासपीठावरून नेते आणि अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली होती. दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला.

व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष आ. आशिष जयस्वाल, डॉ. परिणय फुके, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चंद्रन, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, माजी अध्यक्ष शिवकुमार राव, एमएम ॲक्टिव्हचे रवी बोरटकर उपस्थित होते.

फडणवीस यांनी व्यासपीठावरून आशिष जायस्वाल यांना महामंडळाला रेती घाटाचे वितरण झाले वा नाही, असा प्रश्न विचारला. त्यावर जयस्वाल यांनी नाही म्हणताना दोन वर्षांपासून टीपी मिळाली नसल्याचे सांगितले. त्यावर फडणवीस यांनीही अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. या संदर्भात जीआर निघाला आहे आणि अधिकारी त्याची अंमलबजावणी करीत नसेल तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून तुरुंगात टाकण्याचा थेट इशारा दिला. महामंडळाला रेती घाट न मिळणे, ही बाब चिंताजनक आहे. सरकार बदलली आहे, हे अधिकाऱ्यांनी आता ध्यानात ठेवावे. नद्यांना खोदून पैसे कमविला जात आहेत. पूर्ण पैसा जनतेचा आहे. तो सरकारच्या तिजोरीत जमा व्हावा.

राज्याचे खाण धोरण २६ जानेवारीआधी येणार

फडणवीस म्हणाले, राज्याच्या नवीन खाण धोरणाची घोषणा २६ जानेवारीआधी करण्यात येईल. तीन वर्षांपूर्वी झालेल्या मिनकॉनमध्ये धोरणावर मंथन झाले होते. याचा मसुदा तयार आहे. मागील सरकारने तो लागू केला नाही. आता नवीन सरकार आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ अशी कल्पना कदाचित धोरणाही असेल. आता नवीन धोरण लागू होईल. तीन वर्षांत झालेल्या बदलानुसार मसुद्यात संशोधन करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले. प्रारंभी आशिष जयस्वाल यांनी प्रास्ताविकेत स्थानिक उद्योगांना कोळसा मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावर फडणवीस यांनी स्थानिक छोट्या उद्योगांना ४ हजार रुपये टन दराने कोळसा देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यांनी खाण विकास फंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

सूरजागडमध्ये स्टील प्रकल्प; ॲडव्हान्टेज विदर्भसुद्धा होणार

विदर्भातील खनिज संपदेचा योग्य उपयोग झाला पाहिजे. गडचिरोली येथील सूरजागड येथे स्टील प्रकल्प सुरू व्हावा, या अटीवर सूरजागड खाण देण्यात आली आहे. स्थानिक लोकांना रोजगार देण्याची अट ठेवण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ॲडव्हान्टेज विदर्भचे आयोजन करण्यात येईल.

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करणार नरेंद्र मोदी

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंत भागात काही लहानमोठी कामे लवकरच पूर्ण करण्यात येत आहेत. या मार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकार दिला आहे. एका महिन्यातच लोकार्पण करण्यात येणार आहे. या महामार्गामुळे खनिज आधारित उद्योगाला बळ मिळेल आणि लॉजिस्टिक वाढेल. पुढील तीन वर्षांत विदर्भात लॉजिस्टिक हब सुरू होईल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस