शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आसामच्या धर्तीवर कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:24 IST

आसाम सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे जतन केले जाईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली.

ठळक मुद्देयोजनांचा लाभ मिळावा म्हणून वयाची अट ६५ वरून ६० करणारसामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा

आॅनलाईन लोकमतनागपूर : जी मुले आपल्या आईवडिलांचा सांभाळ करीत नाही व ती शासकीय सेवेत असतील तर त्यांची वेतनवाढ थांबविण्याचा कायदा आसाम सरकारने नुकताच केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे जतन केले जाईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली.ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी असलेली ६५ वर्षे वयाची अट शिथिल करून ती ६० वर्षे करावी, अशी मागणी संजय केळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडत केली. भारती लव्हेकर, समीर कुणावार, शशिकांत शिंदे, अमर काळे आदींनी ही मागणी लावून धरली. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, वयोवृद्ध व्यक्तीला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून ६५ वर्षे वयाची मर्यादा घालण्यात आली. मात्र, ही वयोमर्यादा ६० वर्षे करण्याबाबत महिनाभरात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.निराधार योजनेंतर्गत विधवा महिलेला मुलगा असेल तर तो २५ वर्षांचा होईपर्यंतच दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, बऱ्याच प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, लग्नानंतर मुलाकडून त्या आईचा सांभाळ केला जात नाही. त्यामुळे विधवा महिलेला मिळणारी ही मदत बंद न करता कायमस्वरूपी ठेवावी, अशी मागणी भारती लव्हेकर व समीर कुणावार यांनी केली. याची दखल घेत यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही बडोले यांनी सांगितले. मुलातर्फे आईवडिलांचा सांभाळ केला जात नसेल व तशी तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली तर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७