शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी आसामच्या धर्तीवर कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:24 IST

आसाम सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे जतन केले जाईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली.

ठळक मुद्देयोजनांचा लाभ मिळावा म्हणून वयाची अट ६५ वरून ६० करणारसामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा

आॅनलाईन लोकमतनागपूर : जी मुले आपल्या आईवडिलांचा सांभाळ करीत नाही व ती शासकीय सेवेत असतील तर त्यांची वेतनवाढ थांबविण्याचा कायदा आसाम सरकारने नुकताच केला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे जतन केले जाईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली.ज्येष्ठ नागरिकांच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी असलेली ६५ वर्षे वयाची अट शिथिल करून ती ६० वर्षे करावी, अशी मागणी संजय केळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडत केली. भारती लव्हेकर, समीर कुणावार, शशिकांत शिंदे, अमर काळे आदींनी ही मागणी लावून धरली. यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, वयोवृद्ध व्यक्तीला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून ६५ वर्षे वयाची मर्यादा घालण्यात आली. मात्र, ही वयोमर्यादा ६० वर्षे करण्याबाबत महिनाभरात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.निराधार योजनेंतर्गत विधवा महिलेला मुलगा असेल तर तो २५ वर्षांचा होईपर्यंतच दरमहा ६०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, बऱ्याच प्रकरणांमध्ये असे आढळून आले आहे की, लग्नानंतर मुलाकडून त्या आईचा सांभाळ केला जात नाही. त्यामुळे विधवा महिलेला मिळणारी ही मदत बंद न करता कायमस्वरूपी ठेवावी, अशी मागणी भारती लव्हेकर व समीर कुणावार यांनी केली. याची दखल घेत यासंबंधी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही बडोले यांनी सांगितले. मुलातर्फे आईवडिलांचा सांभाळ केला जात नसेल व तशी तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली तर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७