शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर जिल्ह्यात तीन लाख रोपटी लावून वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 14:37 IST

राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर येथे वन व अन्य विभागाच्या सहकार्याने ५६ स्थानावर एकाच दिवशी तीन लक्ष रोपट्याचे रोपण करून वृक्षलागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोरेवाडा रोपवाटिका येथे ‘बेहडा’ जातीचे रोपटे लावून जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ केला.

ठळक मुद्दे‘वनमहोत्सव २०१८’ वृक्ष लागवड कार्यक्रमगोरेवाडा येथे पालकमंत्र्यांनी केले वृक्षारोपण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील १३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत नागपूर येथे वन व अन्य विभागाच्या सहकार्याने ५६ स्थानावर एकाच दिवशी तीन लक्ष रोपट्याचे रोपण करून वृक्षलागवड मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोरेवाडा रोपवाटिका येथे वनऔषधी गुणधर्म असलेले ‘बेहडा’ जातीचे रोपटे लावून जिल्ह्यात वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ केला.नवीन काटोल नाका मानकापूर बायपास रिंगरोड गोरेवाडा रोपवाटिका येथे आज वनमहोत्सवांतर्गत महाराष्ट्र वनविकास महामंडळ व वन विभागाच्यावतीने वृक्षलागवड अभियानाचे उद् घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे अध्यक्षस्थानी होते.आ. सुधाकर देशमुख, नगरसेविका संगीता गिरे, अर्चना पाठक, भूषण शिंगणे, जगदीश ग्वालवंशी, हरीश ग्वालवंशी, उत्पादन व व्यवस्थापन विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक शेषराव पाटील, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक रामजी यादव, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. रामबाबू, मुख्य वन संरक्षक संजीव गौड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, वनसंरक्षक गिºहेपुंजे आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, की येणाऱ्या काळात महाजनकोच्या मदतीने महिला बचत गटांना १० एकर जमिनीवर ४ हजार रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. याशिवाय २० सदस्यीय महिला बचत गटाच्या प्रत्येक महिलेला या उपक्रमाद्वारे प्रत्येकी ५ हजार रुपये प्रति महिना उत्पन्न मिळेल असा प्रयत्न देखील केला जाणार आहे.या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात कोराडी परिसरातील २०० महिलांना जमीन वाटपाने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बेल, मोहा, आंबा व त्रिफळा वनाची निर्मितीवनमहोत्सवांतर्गत रविवारी आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेहडाचे रोपण केले. याशिवाय आमदार सुधाकर देशमुख यांनी बेल तसेच वन अधिकारी शेषराव पाटील यांनी आंब्याचे रोपटे लावले. गोरेवाडा रोपवाटिका परिसरात यावर्षी बेलवन, मोहा वन, गावठी आंबा वन तसेच त्रिफळा वनाची निर्मिती करण्यात आली आहे. या चारही वनात ४०० हून अधिक रोपटे लावण्यात येणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार