शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नागपुरात चिनी वस्तूंच्या बहिष्काराच्या राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 23:50 IST

चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस मास्क आणि रेल्वेत चहा ग्लासचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्दे‘कॅट’तर्फे आयात कमी करण्याचे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनचे भारतविरोधी धोरण पाहता देशातील ७.५० कोटी रिटेल व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारपासून ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ या नावाने एक राष्ट्रीय अभियान संपूर्ण देशात सुरू केले आहे. या अंतर्गत स्वदेशीचा संदेश देणारे फेस मास्क आणि रेल्वेत चहा ग्लासचे वाटप करण्यात आले.डिसेंबर २०२१ पर्यंत चीनमध्ये निर्मित वस्तूंची भारतात आयात १ लाख कोटींनी कमी करण्याचे ‘कॅट’चे लक्ष्य आहे. ‘कॅट’चे अभियान पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या आवाहनाला यशस्वी करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात पूर्वीपासून उत्पादन होणाऱ्या ३ हजार वस्तूंची यादी कॅटने तयार केली असून या वस्तूंची आयात चीनमधून कशी थांबेल, यावर जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत देशातील व्यापारी आणि लोकांना जागरूक करून भारतीय उत्पादनांची खरेदी-विक्री करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले. चीनमधून भारतात चार प्रकारच्या वस्तू आयात होतात. त्यामध्ये तयार माल, कच्चा माल, स्पेअर पार्ट आणि तांत्रिकी उत्पादने आहेत. या वस्तूंची विक्री कमी कशी होईल, यावर भर राहणार आहे. देशातील व्यापारी स्वदेशीचा संदेश देणारे मास्क घालून अभियानाचा प्रसार करणार आहेत तर दुसरीकडे डिसेंबरपर्यंत सर्व राजधानी आणि शताब्दी रेल्वेत जवळपास ५ कोटी ग्लास कॅटरिंगमध्ये वितरित करण्यात येणार आहे. या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात कॅटचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये देशातील विविध संघटना आणि संस्थांना जोडण्यात येणार आहे.कॅट गेल्या चार वर्षांपासून चिनी उत्पादनांच्या बहिष्कारासाठी वेळोवेळी आंदोलन करीत आहे. त्याच कारणाने आणि सरकारच्या मेक इन इंडिया कार्यक्रमामुळे वर्ष २०१८ ते आतापर्यंत चीनच्या आयातीत ६ अब्ज डॉलरची घट झाली आहे. चिनी वस्तूंच्या बहिष्कारावर भारतीय नेहमीच शंका उपस्थित करतात, पण भारतीय लोकांसोबतच हा संकल्प तडीस नेण्याचा कॅटचा प्रयत्न असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :chinaचीनnagpurनागपूर