लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : महामार्ग पाेलीस केंद्र पाटणसावंगी येथे ‘हायवे मृत्यूंजय दूत’ या अभियानाचा साेमवारी (दि.१) प्रारंभ करण्यात आला. यावेळी अपघातातील जखमींना तातडीने मदत व प्रथमाेपचाराबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावनेर आराेग्य केंद्राचे डाॅ. पवन मेश्राम हाेते. प्रमुख अतिथी म्हणून बॅँक ऑफ इंडिया सावनेर शाखा व्यवस्थापक प्रवीण ठाकरे, लाेकमतचे तालुका प्रतिनिधी प्रा. बाबा टेकाडे, पाेलीस उपनिरीक्षक स्नेहल राऊत, अनंतकुमार खंडारे आदींची उपस्थिती हाेती. पाेलीस उपनिरीक्षक स्नेहल राऊत यांनी प्रास्ताविकात महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळाल्यास त्यांचा जीव वाचू शकताे, यासाठी गाेल्डन अवर खूप महत्त्वाचे असते. यामध्ये दुताने भूमिका बजवायची आहे. पुढे त्यांनी हायवे मृत्यूंजय दूत अभियानाचा उद्देश सांगून गाेल्डन अवरचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी डाॅ. पवन मेश्राम म्हणाले, एखादा अपघातात झाल्यास महामार्गावरील ढाबावाले, वाटसरू किंवा दूताने प्रथम अपघातातील जखमींना नेमके काय झाले, हे तपासावे. रक्त वाहत असल्यास ते थांबवावे. अधिक रक्त वाहिल्यास पाय वर करून हृदयाला योग्य रक्तपुरवठा हाेऊ द्यावा, फ्रॅक्चर असल्यास त्यास सपाेर्ट द्यावा तसेच अधिक वेळ न घालविता जखमींना जवळच्या रुग्णालयात न्यावे, यामुळे त्यांचा जीव वाचविण्यासाठी मदत हाेईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन पाेलीस उपनिरीक्षक अनंतकुमार खंडारे यांनी केले. सहायक फाैजदार राजेश तिवारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पाेलीस कर्मचारी मुकेश ठाकरे, देविदास हर्षे, शरद चाैधरी, चंद्रकांत टेकाडे, शिवशंकर राठाेड, नीलेश अंबर्ते, मंगेश भालेराव, घनश्याम तुर्के आदींसह नागरिक उपस्थित हाेते.