शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

अखेर संघाच्या ५५ वर्षांच्या मागणीची पूर्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 10:23 AM

नागरिकांना घुसखोरांचा दर्जा न देता भारतात सन्मानपूर्वक वागणूक देण्यासंदर्भात भूमिका संघाने मांडली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर संघाच्या मागणीची पूर्तता झाली आहे.

ठळक मुद्देनागरिकत्व सुधारणा विधेयकाला संघाचे पाठबळ१९६४ मध्ये प्रतिनिधी सभेत व्यक्त केली होती चिंता

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला राज्यसभेतदेखील मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात आनंदाचे वातावरण होते. या विधेयकामागे संघाची मोठी भूमिका ठरली. १९६४ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सर्वात अगोदर संघाने पाकिस्तान, बांगलादेशमध्ये वास्तव्य करीत असलेल्या तेथील अल्पसंख्यांक नागरिकांबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच या नागरिकांना घुसखोरांचा दर्जा न देता भारतात सन्मानपूर्वक वागणूक देण्यासंदर्भात भूमिका मांडली होती. तब्बल ५५ वर्षांनंतर संघाच्या मागणीची पूर्तता झाली आहे.१९६४ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेमध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून होणाऱ्या हिंदू शरणार्थ्यांबाबत ठराव मांडण्यात आला होता.गोळवलकर गुरुजी त्यावेळी सरसंघचालक होते. पाकिस्तानात गैरमुस्लिम लोकांवर अन्याय होत असून त्यांची कुचंबणा होत आहे. अनेक जण भारतात येऊ इच्छित आहेत. तेथील शरणार्थ्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून वागणूक देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी यातून करण्यात आली होती. त्यानंतर पाचवेळा अखिल भारतीय प्रतिनिधी सभा किंवा अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत या विषयावर मंथन झाले व केंद्र शासनाकडे ठरावाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली होती.१९७८ साली अखिल भारतीय कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीतदेखील हा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी बांगलादेशची निर्मिती झाली होती. नेहरू-लियाकत कराराचे उल्लंघन होत असून, तेथील गैरमुस्लिम अजूनही संघर्ष करीत असल्याची भूमिका संघाने मांडली होती. तर १९९४ साली झालेल्या बैठकीत प्रामुख्याने बांगलादेशमध्ये हिंदू व बौद्धधर्मीय नागरिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत मंथन करण्यात आले होते.तत्कालीन केंद्र शासनाच्या धोरणांवरदेखील संघाने टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर १९९३ साली झालेल्या बैठकीतदेखील संघाने तीच भूमिका मांडली होती.२०१३ वर्ष ठरले ऐतिहासिक२०१३ साली झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत पाकिस्तान व बांगलादेशमध्ये गैरमुस्लिम नागरिकांवर होत असलेल्या अन्यायांबाबत ठराव मांडण्यात आला. दोन्ही देशांमध्ये अल्पसंख्यांकांवर अन्याय होत असल्याची बाब यात मांडण्यात आली होती. तेथील नागरिक मूळ भारताचेच होते व फाळणीमुळे तिकडे गेले. ते परत येऊ इच्छित असताना केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी व तेथून येणाºया शरणार्थ्यांसंदर्भात पुनर्विचार करावा. दोन्ही देशातील अल्पसंख्यांक नागरिकांप्रति सरकारने नवीन दृष्टिकोनातून पाहावे व राष्ट्रीय पुनर्वसन धोरण तयार करून भारतात त्यांना सन्मानजनक आयुष्य जगण्याची सुविधा द्यावी, अशी त्यात मागणी करण्यात आली होती.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक