शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अखेर चणा खरेदीचा मुहूर्त सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

नरखेड : नरखेड तालुक्यातील ४८० शेतकऱ्यांच्या चणा खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत वर्षीच्या ...

नरखेड : नरखेड तालुक्यातील ४८० शेतकऱ्यांच्या चणा खरेदीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गत वर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले होते. त्यानंतर रबी हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी गव्हाबरोबरच चण्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. पोषक वातावरणामुळे तालुक्यात चण्याचे उत्पादन चांगले झाले. त्यासाठी नाफेडने ५,१०० रुपये प्रती क्विंटल भाव जाहीर करून शेतकऱ्यांना चणा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे सांगितले होते. त्यानुसार ४८० शेतकऱ्यांनी ४०० मे. टन चणा विक्रीसाठी मार्च महिन्यात नोंदणी केली होती. मात्र नाफेडने तालुका खरेदी-विक्री संस्थेला कोणती सूचना न देता २२ मे रोजी चणा उत्पादकांना मोबाईलवर संदेश पाठवून चणा विक्रीसाठी आणावा, असे कळविले. यासाठी केवळ तीन दिवसाची मुदत देण्यात आली होती. या तीन दिवसात संपूर्ण तालुक्यातील चणा खरेदी करणे अशक्य होते. त्याकरिता मुदत वाढ द्यावी, बारदाना उपलब्ध करून द्यावा, अशा आशयाचे पत्र नाफेडच्या व्यवस्थापकांना सभापती लीलाधर ठाकरे यांनी दिले होते. मात्र पावसाळा सुरू झाला तरी चणा खरेदीची प्रक्रिया सुरू न झाल्याने शेतकरीही चिंतित होता. काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बी-बियाण्याचे नियोजन करण्यासाठी चणा विकण्याचे ठरविले होते. खाजगी व्यापारी ५४०० ते ५६०० रु. प्रती क्विंटल भाव देत चण्याची खरेदी करीत होते. मात्र काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेत व्यापाऱ्यांनी चण्याचे प्रती क्विंटल भाव ४७०० रुपयावर आणले. त्यामुळे नुकसान होण्यापेक्षा ५१०० रुपये क्विंटल दराने नाफेडलाच चणा विकू या आशेत शेतकरी होते. शेवटी तालुक्यात चणा खरेदीस सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी काटापूजन करून चणा खरेदीची सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, उपसभापती घनश्याम फुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष बबन लोहे, सदस्य अमोल आरघोडे, व्यवस्थापक हरिभाऊ ठाकरे, सचिव सतीश येवले, ग्रेडर विनोद भिसे याची उपस्थिती होती.