शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर्वे अन् डीपीआरमध्ये गेली चार वर्षे, प्रकल्प कधी होणार? एसटीपीचा पुन्हा डीपीआर!

By गणेश हुड | Updated: July 9, 2024 00:02 IST

शासनाकडे करणार निधीची मागणी

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीपी) निर्देश दिले असतानाही जिल्ह्यातील चिचोली व चनकापूर येथील सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प (एसटीपी) अद्याप रखडला आहे. या प्रकल्पासाठी वेळोवेळी सर्व्हे व आराखडा (डीपीआर) तयार करण्यात आला. मात्र अद्याप कामाला सुरुवातच झाली नाही. आता पुन्हा या प्रकल्पासाठी सुधारित डीपीआर तयार करून जिल्हा परिषद शासनाला निधी मागणार आहे.

चिचोली व चनकापूर या गावांतील लाखो लिटर सांडपाणी लगतच्या कोलार नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित होत आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रीया करण्याचे आदेश जून २०२० मध्ये एनजीपीने जिल्हा परिषदेला दिले होते. परंतु चार वर्षानंतरही हा प्रकल्प मार्गी लागला नाही. कधी जागेचा अभाव तर कधी निधी नसल्याने हा प्रकल्प रखडला.

सुरुवातीला जिल्हा परिषदेने प्रकल्प आराखडा तयार करून ३.५६ कोटींचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविला होता. परंतु यासाठी निधी मिळाला नाही. एमपीसीबीकडून निधी उपलब्ध न झाल्यावर जि.प.कडील पाणी व स्वच्छता विभागाने उपलब्ध निधीतून ‘लो कॉस्ट’ ट्रिटमेंट प्लांटसाठीही प्रयत्न केले. याकरिता नीरीची मदत घेण्यात आली. मात्र, या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध होता. यावर तोडगा काढण्यासाठी व निधीसाठी प्रयत्नही केले. परंतु यातून मार्ग निघाला नाही. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेत नांदेडच्या धर्तीवर सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प उभारण्याची सूचना केली. त्यानुसार एका एजन्सीने चिचोली येथील जागेचा सर्व्हे केला. मात्र त्यानंतर प्रक्रीया पुढे सरकली नाही. आता पुन्हा एकदा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (युईवआय)संस्थेच्या माध्यमातून डीपीआर तयार केला जाणार आहे.

दंड आकारण्याचा दिला होता इशारा

प्रकल्पासाठी चिचोली येथील ०.९९ हेक्टर आर जागा निश्चित केली आहे. मार्च २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण न केल्यास जि.प.ला महिन्याला ५ लाखांचा दंड भरण्याची तयारी ठेवा असा इशारा एनजीपीने दिला होता. परंतु त्यानंतरही हा प्रकल्प मार्गी लागला नाही. सोबतच नदीचे प्रदूषणही थांबलेले नाही.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणnagpurनागपूर