शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

हुई शाम उनका खयाल आ गया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 12:36 IST

निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला. टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत..

श्रेया अभिजीत सरनाईकनागपूर दिवेलागणीची कातरवेळ. अस्तांचलाला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी जाता जाता रांगोळी सांडवलेली.. बहुतेक त्याच्या सप्त घोड्याच्य खुरांनी हा गोंधळ घातला असावा. त्याच्या रंगडबीतले जादुई केशरी, गुलाबी रंग असे आकाशाच्या लांबलचक फलाटावर उधळले गेले की थोडावेळ मस्त वाटते.पुढच्या नीरव शांततेच्या आधीची ही रंगपंचमीच जणू. मग दिवसभर काम करून थकलेला हा कुटुंबप्रमुख लगबगीने आपले सगळे आटोपून घराकडे जायला निघतो. सगळी किरणेही आपले क्षितिज विस्तारणारे पंख आवरून गाढ झोपी जातात. अगदी छोट्या बाळासारखी पाय मुडपून झोपतात.निळसर चक्रदळ अदृष्य होताना मन उगाच काहुरते. चांदण्यांना पारपत्र मिळते मग आकाशाच्या फलाटावर यायला.टिमटिमत्या प्रकाशाला घेऊन त्या लाजत मुरडत येतात. काही मात्र अजिबात लाजत नाहीत.. पूर्ण चमचमणारं सौंदर्य घेऊन कॅटवॉक करत येतात आणि मिरवतात.अशी एखादी दूरस्थ चांदणी एखाद्याचे देवालय असू शकते.या संधाकाळच्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये उदासीनताही सोबत येते. पाखरथवे अंधार व्हायच्या आधीच परतू लागली असतात. या पाखरथव्यांना कधी बेपत्ता दिशांचे धोके होत नसतील का... चोचीत दाणे घेऊन ही पाखरे दुसºया दिवशीची स्वप्न पंखांमध्ये भरून घरट्याकडे परततात. एक संध्याछाया गडद दाटून येते. एखाद्या काळ््या शाईची दौत अलगद कलंडावी असा अंधार हळूहळू पसरत जातो. काजव्यांचे झाड भरत जाते. आकाशातले तुटलेले तारे पुन्हा जन्म घेत असावेत का काजवा होऊन?काजवा क्षणभर चमकावा तशी एखादी आठवण चमकून जाते. या आठवणी हत्तींच्या पायासारख्या असतात. खोलवर रुतून बसणाºया, न बोलताच हटकून येणाºया.आयुष्यातून निघून गेलेले क्षण, माणसे मग या क्षणांची दावेदार असतात. जळण्यासाठी दिव्यांची गरजच ती काय..शाम होते ही चिरागों को बुझा देता हूँ.एक दिल ही काफी है तेरी याद में जलाने के लियेकायमचे मुक्कामाला निघून गेलेले क्षण, आठवणी. त्या आठवणींनी धरून ठेवलेली माणसं पुन्हा वर्तमााच्या चिमटीत धरता येत नाहीत.मग वाटतं,हुई शाम उनका खयाल आ गयावही जिंदगी का सवाल आ गया..वाºयाच्या मंद झुळुकीसोबत दूर कुठेतरी गाण्याचे सूर ऐकू येत आहेत..वो दिल कहाँ से लाऊं.. तेरी याद जो भुला दे..खरंच असं काळीज कुठून आणायचं असतं.

 

 

टॅग्स :Natureनिसर्ग