शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वादग्रस्त पहेलवान शाह दर्गा पुलावर उत्तर देण्यास सरकारला शेवटची संधी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 9, 2024 15:28 IST

हायकोर्टाचा दणका : गेल्या ७ फेब्रुवारी रोजी बजावली होती नोटीस

नागपूर : पहेलवान शाह दर्गा ते गुप्ता आटा चक्कीपर्यंत बांधण्यात येत असलेल्या उड्डानपुलावरील आक्षेपांवर उत्तर सादर करण्यास विलंब केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व इतर प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. संबंधित प्रतिवादींना आता उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून १९ जूनपर्यंत वेळ मंजूर केला गेला.

या उड्डानपुलाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हिफजूर रेहमान व शकील अहमद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. शशिभूषण वाहाणे यांनी राज्य सरकारसह रेल्वे मंत्रालयाचे सचिव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव व महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी अद्याप उत्तर सादर केले नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने या प्रतिवादींना ७ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावून २० मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने सर्व प्रतिवादींना फटकारून उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी दिली.

महानगरपालिका पहेलवान शाह दर्गा ते मारवाडी चौकापर्यंतचा रोड १८ मिटरवरून २३ मीटर रुंद करणार आहे. भूसंपादनासाठी मोमीनपुरा व इतर भागातील जमीनधारकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. हा रोड रुंद झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही. परिणामी, पहेलवान शाह दर्गा ते गुप्ता आटा चक्कीपर्यंतच्या उड्डानपुलाची गरज नाही. यासंदर्भात सरकारला अनेक तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पुलाचे काम सुरू केले. या उड्डानपुलाच्या आजूबाजूला घनदाट लोकसंख्येच्या वस्त्या, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, दर्गा, कब्रस्तान आहे. त्यामुळे हा उड्डानपुल वाहतूक कोंडीला निमंत्रण देईल. रोडवरील अपघात वाढतील, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Governmentसरकारroad transportरस्ते वाहतूक