शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वादग्रस्त पहेलवान शाह दर्गा पुलावर उत्तर देण्यास सरकारला शेवटची संधी

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 9, 2024 15:28 IST

हायकोर्टाचा दणका : गेल्या ७ फेब्रुवारी रोजी बजावली होती नोटीस

नागपूर : पहेलवान शाह दर्गा ते गुप्ता आटा चक्कीपर्यंत बांधण्यात येत असलेल्या उड्डानपुलावरील आक्षेपांवर उत्तर सादर करण्यास विलंब केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व इतर प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला. संबंधित प्रतिवादींना आता उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी म्हणून १९ जूनपर्यंत वेळ मंजूर केला गेला.

या उड्डानपुलाविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हिफजूर रेहमान व शकील अहमद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. शशिभूषण वाहाणे यांनी राज्य सरकारसह रेल्वे मंत्रालयाचे सचिव, परिवहन विभागाचे प्रधान सचिव व महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी अद्याप उत्तर सादर केले नाही, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायालयाने या प्रतिवादींना ७ फेब्रुवारी रोजी नोटीस बजावून २० मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे न्यायालयाने सर्व प्रतिवादींना फटकारून उत्तर सादर करण्यासाठी शेवटची संधी दिली.

महानगरपालिका पहेलवान शाह दर्गा ते मारवाडी चौकापर्यंतचा रोड १८ मिटरवरून २३ मीटर रुंद करणार आहे. भूसंपादनासाठी मोमीनपुरा व इतर भागातील जमीनधारकांना नोटीस जारी करण्यात आली आहे. हा रोड रुंद झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही. परिणामी, पहेलवान शाह दर्गा ते गुप्ता आटा चक्कीपर्यंतच्या उड्डानपुलाची गरज नाही. यासंदर्भात सरकारला अनेक तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. उलट महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने पुलाचे काम सुरू केले. या उड्डानपुलाच्या आजूबाजूला घनदाट लोकसंख्येच्या वस्त्या, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, दर्गा, कब्रस्तान आहे. त्यामुळे हा उड्डानपुल वाहतूक कोंडीला निमंत्रण देईल. रोडवरील अपघात वाढतील, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Governmentसरकारroad transportरस्ते वाहतूक