शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

जमीन खचली,चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:34 IST

भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच जण विहिरीत पडले: चार बचावले : मानकापुरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकले. बचाव कार्य करणाºयांनी विहिरीतून चौघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.गायत्रीनगर झिंगाबाई टाकळी परिसरातील सचिन ले-आऊटमध्ये राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून यादवराव चौधरी (वय ७०) यांचा परिवार भाड्याने राहतो. यादवराव चौधरी राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, ते त्यांचा मुलगा सुधीर (वय ३७), सून सुरेखा (वय ३५) आणि वेदांत (वय ५) तसेच अंकुश (वय २ वर्षे) तेथे राहतात.विहीर खचली, चिमुकल्याचा अंतसुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले. चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.दुर्घटनेचे संकेत मिळाले होतेचौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.सुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले.चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.दुर्घटनेचे संकेत मिळाले होतेचौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.