शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जमीन खचली,चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:34 IST

भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच जण विहिरीत पडले: चार बचावले : मानकापुरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भुसभुशीत झालेल्या अंगणातील विहिरीजवळची जमीन अचानक खाली गेल्यामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्यासोबत एकाच कुटुंबातील तिघे विहिरीत पडले. त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आणखी दोघे विहिरीत अडकले. बचाव कार्य करणाºयांनी विहिरीतून चौघांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आज सकाळी ११ च्या सुमारास मानकापूरच्या गायत्रीनगरात ही घटना घडली. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली.गायत्रीनगर झिंगाबाई टाकळी परिसरातील सचिन ले-आऊटमध्ये राजेश कुंभारे यांचे घर आहे. तेथे दीड वर्षांपासून यादवराव चौधरी (वय ७०) यांचा परिवार भाड्याने राहतो. यादवराव चौधरी राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून, ते त्यांचा मुलगा सुधीर (वय ३७), सून सुरेखा (वय ३५) आणि वेदांत (वय ५) तसेच अंकुश (वय २ वर्षे) तेथे राहतात.विहीर खचली, चिमुकल्याचा अंतसुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले. चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.दुर्घटनेचे संकेत मिळाले होतेचौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.सुधीर टॉवर फिटींगचे काम करतात.चौधरी यांच्या दारासमोरच विहीर आहे. समोर रिकामा भूखंड आहे. खोलगट भागामुळे या भूखंडात पाणी साचल्याने त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. सुरेखा यांच्या मावशी मंदाताई महाजन (वय ६०) पाहुण्या म्हणून त्यांच्याकडे आल्या आहेत. सकाळी १० वाजतापासून सुरेखा आणि त्यांची मावशी दारासमोरच्या उंचवट्यावर बसून घरगुती काम करीत होत्या. दोन वर्षांचा चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. अचानक वॉल कंपाऊंडचे पिल्लर वाकले. सुरेखा, त्यांचा कडेवर असलेला अंकुश तसेच मंदाताई ज्या ठिकाणी उभ्या होत्या. ती जमीन खचली अन् हे तिघेही बाजूच्या विहिरीत पडले. त्यावेळी यादवराव आणि सुधीर समोरच्याच खोलीत बसून होते. हे दृश्य पाहून सुधीर आणि त्यांचे वडील यादवराव यांनी धाव घेत गटांगळ्या खात असलेल्या सुरेखा आणि मंदाताईला विहिरीतून बाहेर काढले. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी धावले. बाजूलाच स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव राहतात. त्यांनीही धाव घेतली. त्यांचे सहकारी मुरलीधर पाटील आणि अन्य शेजारी धावले. त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली. काही वेळेतच पोलीस अन् अग्निशमन दलाचे पथक तेथे पोहचले.तोपर्यंत घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती. या भागातील नगरसेवक अर्चना पाठक, भूषण शिंगणे, दीपक गिरे घटनास्थळी धावले. आमदार सुधाकर देशमुख हेदेखील पोहचले. सुरेखाच्या कडेवरील चिमुकला अंकुश पाण्यात पडला होता. त्याला शोधण्यासाठी यादवराव आणि सुधीर हे बापलेक इकडे तिकडे शोधाशोध करीत असल्याने तेसुद्धा दलदलीसारख्या भागात फसले. मात्र, नागरिक, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी या दोघांना सुखरूप बाहेर काढले.चिमुकला अंकुश मात्र त्यांच्या हाती लागला नाही. तब्बल तीन तास शोधाशोध करण्यात आली. चिमुकल्या अंकुशला बाहेर काढण्यासाठी मोठमोठे पंप लावून संपूर्ण पाणी बाहेर फेकण्यात आले. मात्र, तो गाळात फसल्यामुळे दिसत नव्हता. त्यामुळे जेसीबीच्या मदतीने मलबाही उपसण्यात आला. दुपारी २ च्या सुमारास अंकुश दिसला. त्याला बाहेर काढून तातडीने बाजूच्या खासगी इस्पितळात आणि नंतर मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.दुर्घटनेचे संकेत मिळाले होतेचौधरी कुटुंबीयांना दुर्घटनेचे संकेत मिळाले होते, अशी माहिती यादवराव चौधरी यांनी घटनास्थळी लोकमतशी बोलताना दिली. ते म्हणाले, बुधवारी सायंकाळपासूनच आजूबाजूची जमीन खचत असल्याचे आम्हाला दिसत होते. त्यामुळे गुरुवारी दुसरीकडे जाण्याचा आमचा विचार होता. बुधवारी सायंकाळी आम्ही प्रसाद घ्यायला नातेवाईकांकडे गेलो. तिकडेच मुक्काम केला. घरी कपडे असल्यामुळे ते काढण्यासाठी सकाळी परत आलो. दुपारी जेवण झाल्यानंतर तेथून निघण्याचा आमचा विचार होता. सकाळी वेदांत (नातू) याला शाळेत पाठविले आणि चिमुकला अंकुश सुरेखाच्या कडेवर होता. सुरेखा आणि तिची मावशी दारासमोरच उंचवट्यासारख्या भागात होती. असे काही एवढ्या लवकर घडेल, याची आम्ही कल्पनाही केली नव्हती,असेही यादवराव चौधरी म्हणाले.