शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:06 IST

मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमाती परीक्षणात आढळली अन्नद्रव्याची कमतरता पारंपरिक खतांची उपयोगिता वाढविणे गरजेचे

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील शेतीच्या केलेल्या माती परीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्याचा परिणाम पिकांबरोबरच मानवाच्या आरोग्यावरही होत आहे.जमिनीची उत्पादकता ही १६ अन्नघटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यात मुख्य अन्नघटक म्हणजे नत्र, स्फुरद व पलाश आहे. तर दुय्यम घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा समावेश आहे.सूक्ष्म अन्नघटकांमध्ये लोह, मिनरल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरिन यांचा समावेश आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील केलेल्या माती परीक्षणातून महत्त्वाचे घटक असलेल्या नत्राची कमतरता प्रत्येक तालुक्यात आढळली आहे. तर स्फुरद या अन्नघटकाची नागपूर, रामटेक व कुही तालुक्यात कमतरता आढळली आहे. जमिनीतील या दोन्ही घटकाच्या कमतरतेमुळे झाडे ठेंगू राहून पाने पिवळी होणे, पाने वाळून गळणे, झाडांची वाढ खुंटणे, पानांचा रंग बदलणे आदी लक्षण झाडांवर दिसून येत आहे. त्याचबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म घटकांमध्येही कमतरता आढळली आहे. झिंक अन्नघटकाची नागपूर सोडल्यास इतर सर्व तालुक्यात कमतरता आढळली आहे. लोहतत्त्वसुद्धा सर्वच तालुक्यात घटलेले आहे. लोहामुळे पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो. झिंकमुळे झाडे लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात मोठ्या भाजीपाल्याचे उत्पादन होते. जमिनीत जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मानवी आरोग्यास आवश्यक असलेले पोषक घटक उपलब्ध होत नाही.

शरीरावर परिणाम होतोसेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्यामुळे नत्राची कमतरता झाली आहे. त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम तर होतच आहे; सोबतच मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वाची कमतरता आढळल्याने शरीरावरही त्याचा परिणाम होत आहे.

नत्र वाढविण्यासाठी उपाययोजनाजमिनीतील सेंद्रिय कर्व्ह वाढविणे आवश्यक आहे. याकरिता शेतकºयांनी जास्तीत जास्त शेणखत, गांडुळखत, नॅपेड खत, सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे. हिरवळीचे खतसुद्धा वापरल्यास जमिनीतील नत्राची मात्रा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर द्विदल पिके घेऊन पिकाचे रोटेशन करण्यात यावे.अर्चना कोसरे, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती