शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:06 IST

मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमाती परीक्षणात आढळली अन्नद्रव्याची कमतरता पारंपरिक खतांची उपयोगिता वाढविणे गरजेचे

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील शेतीच्या केलेल्या माती परीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्याचा परिणाम पिकांबरोबरच मानवाच्या आरोग्यावरही होत आहे.जमिनीची उत्पादकता ही १६ अन्नघटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यात मुख्य अन्नघटक म्हणजे नत्र, स्फुरद व पलाश आहे. तर दुय्यम घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा समावेश आहे.सूक्ष्म अन्नघटकांमध्ये लोह, मिनरल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरिन यांचा समावेश आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील केलेल्या माती परीक्षणातून महत्त्वाचे घटक असलेल्या नत्राची कमतरता प्रत्येक तालुक्यात आढळली आहे. तर स्फुरद या अन्नघटकाची नागपूर, रामटेक व कुही तालुक्यात कमतरता आढळली आहे. जमिनीतील या दोन्ही घटकाच्या कमतरतेमुळे झाडे ठेंगू राहून पाने पिवळी होणे, पाने वाळून गळणे, झाडांची वाढ खुंटणे, पानांचा रंग बदलणे आदी लक्षण झाडांवर दिसून येत आहे. त्याचबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म घटकांमध्येही कमतरता आढळली आहे. झिंक अन्नघटकाची नागपूर सोडल्यास इतर सर्व तालुक्यात कमतरता आढळली आहे. लोहतत्त्वसुद्धा सर्वच तालुक्यात घटलेले आहे. लोहामुळे पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो. झिंकमुळे झाडे लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात मोठ्या भाजीपाल्याचे उत्पादन होते. जमिनीत जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मानवी आरोग्यास आवश्यक असलेले पोषक घटक उपलब्ध होत नाही.

शरीरावर परिणाम होतोसेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्यामुळे नत्राची कमतरता झाली आहे. त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम तर होतच आहे; सोबतच मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वाची कमतरता आढळल्याने शरीरावरही त्याचा परिणाम होत आहे.

नत्र वाढविण्यासाठी उपाययोजनाजमिनीतील सेंद्रिय कर्व्ह वाढविणे आवश्यक आहे. याकरिता शेतकºयांनी जास्तीत जास्त शेणखत, गांडुळखत, नॅपेड खत, सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे. हिरवळीचे खतसुद्धा वापरल्यास जमिनीतील नत्राची मात्रा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर द्विदल पिके घेऊन पिकाचे रोटेशन करण्यात यावे.अर्चना कोसरे, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती