शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

नागपूर जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:06 IST

मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देमाती परीक्षणात आढळली अन्नद्रव्याची कमतरता पारंपरिक खतांची उपयोगिता वाढविणे गरजेचे

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनुष्याच्या आरोग्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व जमिनीच्याही आरोग्याला आहे. अलीकडच्या काळात जमिनीच्या आरोग्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. रासायनिक खतांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीतील अन्नद्रव्याची कमतरता दिसून येत आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील शेतीच्या केलेल्या माती परीक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे. त्याचा परिणाम पिकांबरोबरच मानवाच्या आरोग्यावरही होत आहे.जमिनीची उत्पादकता ही १६ अन्नघटकांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. यात मुख्य अन्नघटक म्हणजे नत्र, स्फुरद व पलाश आहे. तर दुय्यम घटकामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा समावेश आहे.सूक्ष्म अन्नघटकांमध्ये लोह, मिनरल, तांबे, जस्त, मॉलिब्डेनम, बोरॉन, क्लोरिन यांचा समावेश आहे. जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी विभागाने जिल्ह्यातील केलेल्या माती परीक्षणातून महत्त्वाचे घटक असलेल्या नत्राची कमतरता प्रत्येक तालुक्यात आढळली आहे. तर स्फुरद या अन्नघटकाची नागपूर, रामटेक व कुही तालुक्यात कमतरता आढळली आहे. जमिनीतील या दोन्ही घटकाच्या कमतरतेमुळे झाडे ठेंगू राहून पाने पिवळी होणे, पाने वाळून गळणे, झाडांची वाढ खुंटणे, पानांचा रंग बदलणे आदी लक्षण झाडांवर दिसून येत आहे. त्याचबरोबर दुय्यम आणि सूक्ष्म घटकांमध्येही कमतरता आढळली आहे. झिंक अन्नघटकाची नागपूर सोडल्यास इतर सर्व तालुक्यात कमतरता आढळली आहे. लोहतत्त्वसुद्धा सर्वच तालुक्यात घटलेले आहे. लोहामुळे पानांत हरितद्रव्याचा अभाव दिसून येतो. झिंकमुळे झाडे लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात मोठ्या भाजीपाल्याचे उत्पादन होते. जमिनीत जर अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मानवी आरोग्यास आवश्यक असलेले पोषक घटक उपलब्ध होत नाही.

शरीरावर परिणाम होतोसेंद्रिय खतांचा वापर कमी झाल्यामुळे नत्राची कमतरता झाली आहे. त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम तर होतच आहे; सोबतच मानवी शरीराला आवश्यक जीवनसत्वाची कमतरता आढळल्याने शरीरावरही त्याचा परिणाम होत आहे.

नत्र वाढविण्यासाठी उपाययोजनाजमिनीतील सेंद्रिय कर्व्ह वाढविणे आवश्यक आहे. याकरिता शेतकºयांनी जास्तीत जास्त शेणखत, गांडुळखत, नॅपेड खत, सेंद्रिय खताचा वापर करणे गरजेचे आहे. हिरवळीचे खतसुद्धा वापरल्यास जमिनीतील नत्राची मात्रा वाढण्यास मदत होईल. त्याचबरोबर द्विदल पिके घेऊन पिकाचे रोटेशन करण्यात यावे.अर्चना कोसरे, जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती