शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बोगस कागदपत्रांद्वारे जमिनीचा फेरफार

By admin | Updated: January 12, 2015 01:03 IST

तालुक्यातील बारई (बरेजा) समाजबांधवांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश राजवटीत १८९२-९५ च्या काळात २३६ एकर जमिनीची पारशिवनी बरेजा प्रगणे भिवगड नावाने शासन दप्तरी नोंद आहे.

बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप चंद्रशेखर गिरडकर - पारशिवनी तालुक्यातील बारई (बरेजा) समाजबांधवांच्या उदरनिर्वाहासाठी ब्रिटिश राजवटीत १८९२-९५ च्या काळात २३६ एकर जमिनीची पारशिवनी बरेजा प्रगणे भिवगड नावाने शासन दप्तरी नोंद आहे. ही जमीन बरेजा समाजबांधवांना नाममात्र भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. स्थानिक तहसील कार्यालयात बोगस कागदपत्र सादर करून या जमिनीचा फेरफार करण्यात आल्याचा आरोप बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.बारई (बारी) समाजबांधवांनी १८९२ ते ९५ च्या काळात ‘वाजीब-उल-अर्ज’च्या घटनेनुसार सर्वानुमते बरेजा पंच कमिटी या नावाने संचालक मंडळ नेमले. ‘वाजीब-उल-अर्ज’नुसार २८३ पट्टेदार सभासदांमधून नंबरदार निवडून त्यांच्याकडे संस्थेच्या चल-अचल संपत्तीची देखरेख असायची. यात मालगुजार, पाटील, वहिवाटदार व आता येथे अध्यक्षप्रणाली अस्तित्वात आहे. त्यानुसार सन २०११ पासून या बरेजा पंच कमिटीचे अध्यक्ष म्हणून वसंत महाजन, सचिव केशव पोकळे यांचे संचालक मंडळ कार्यरत होते. या मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०१४ मध्ये संपला असताना, संबंधित संचालक मंडळाने बरेजा पंच कमिटीची मालमत्ता खाजगी समजून घटनेची नियमावली धाब्यावर बसवून, सन २०१३ मध्ये संस्थेचे नाव ‘नागवेल पान उत्पादक संस्था’ असे नामकरण करून मूळ जमिनीच्या सातबारावर नागवेल पान उत्पादक तथा कृषी संयुक्त सहकारी संस्था म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे सातबारावर फेरफार केला. याचा फेरफार क्र. ३, ५ जुलै २०१३ नुसार नोंद आहे. या संस्थेची अधिकृतपणे कुठेही नोंद नाही.सन २०१३-१४ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीवर काही पट्टेदारांनी आक्षेप घेतला. बरेजा पंच कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक तलाठ्याला या जमिनीचा अभिलेख, सातबारा, आठ अ व नकाशाची मागणी केली. तलाठ्याने दिलेल्या सातबाराप्रमाणे सर्वे क्र. ५, ६, ६८ या अभिलेखावर बरेजा पंच कमिटी संस्थेच्या नावाऐवजी नागवेल पान उत्पादक तथा कृषी संयुक्त सहकारी संस्था मर्यादित, खातेदार एकूण २१४ असा उल्लेख केला असून, या जमिनीचे मूळ मालक बदलविण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी (महसूल) रामटेक, तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना १०० पट्टेदारांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले. या संस्थेचे आज वारसान हक्काप्रमाणे ४५० पट्टेदार सभासद आहेत. महसूल विभागातील दस्तऐवजावरील नोंदीनुसार या जमिनीवर बरेजा पंच कमिटीचा सामूहिक मालकी हक्क आहे. पूर्वी वाजीब-उल-अर्जनुसार पट्टेदारांमधून नंबरदार निवडून त्याच्याकडे संस्थेची व मालमत्तेची देखरेख असे. या जमिनीचा फेरफार करण्यात आल्याने पट्टेदार सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे.