शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

मिहान-खापरीचे भूसंपादन, पुनर्वसन दोन महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:51 IST

मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देआवश्यक निधी मिळणार : पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत दिले.बैठकीला रवींद्र कुंभारे, प्रकाश पाटील, अविनाश कातडे, एमएडीसीचे चहांदे व शेकडो गावकरी उपस्थित होते. गावठाणाच्या पुनर्वसनाला शासनाने मंजुरी दिली आहे. वर्धा रोडच्या पूर्वीकडे पुनर्वसन होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. सर्वे नं २२७ आणि २२८ मधील ३.२२ हेक्टर जमीन भूसंपादन करायची आहे. भूसंपादनापूर्वी ही जमीन मिहानच्या नावाने होती. त्यामुळे भूसंपादनात अडचणी निर्माण झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाने आता रेकॉर्ड दुरुस्ती केली. जोपर्यंत मिहानकडून भूसंपादनाचा निधी येणार नाही, तोपर्यंत कलम १९/३ची कारवाई करता येत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.मिहानकडे निधी तयार आहे. तो जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केल्यानंतर लगेच भूसंपादनाची कारवाई होऊन पैसे वाटप केले जातील. या कारवाईसाठ़ी दोन महिन्याचा अवधी लागणार आहे. झोपडपट्टीचाही पुनर्वसनात समावेश केला जाणार आहे. भूखंड वाटपासाठ़ीची यादी तयार आहे. या यादीवर १२४ आक्षेप आले असून भूसंपादन कार्यालयाकडे ते पाठविण्यात आले. आक्षेप निकाली निघाले की आठवडाभरात प्लॉट वाटपही करण्यात येणर आहे. शेतकºयाला ३००० चौ. फूट, शेतकरी नसेल त्याला १५०० चौ. फूट आणि अतिक्रमणधारक असेल तर त्याला १००० चौ. फूट प्लॉट दिला जाईल. बांधलेले घर पुनर्वसनाच्या जागेवर स्थलांतरित करण्यात येईल. त्यासाठी ट्रक आणि १० हजार रुपये मिहानकडून देण्यात येतील.गावठाणाची हद्द ठरवताना नगर भूमापन विभागाने काही चुका केल्या आहेत, त्या सुधारणे आवश्यक आहे. यासाठ़ी पुन्हा मोजणी करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. नागरी सुविधा मिहानने त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. तसेच नवीन जागेचे पट्टेवाटपही लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले. या भागात असलेली म्हाडाची कॉलनी मिहानला हस्तांतरित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षभरात संपूर्ण गाव नवीन जागेवर वसलेले असेल. ज्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळाले, पैसे मिळाले, त्यांची जागा मिहानने ताब्यात घ्यावी. तसेच ज्यांना घरे मिळाली पण त्यांनी भाड्याने दिले असेल तर भाडेकरूंनी रिकामे करावे असेही सांगण्यात आले.

 

टॅग्स :MihanमिहानChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे