शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

लाखोंची विकासकामे मात्र स्वच्छतेकडे कानाडोळा; नागपूर स्थानकावर रेल्वे प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 11:14 IST

मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.

ठळक मुद्देकेवळ महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यासाठी झाला परिसर स्वच्छ

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर उद्यान तयार करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानिमित्त रेल्वेस्थानक चकाचक करण्यात आले. बाहेरुन शोभेची झाडे, कुंड्या आणण्यात आल्या. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागत असून रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेचे अभियान सुरु केले की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात एक आरक्षित तिकिटांचे तर दोन अनारक्षित तिकिटांचे कार्यालय आहे. येथे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोईसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आरक्षण कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. पिण्याचे पाणी तर सोडा परंतु साध्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. व्यवस्थाच नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर येणारे नागरिक लघुशंकेसाठी रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग, नव्याने तयार करण्यात आलेले गार्डन, आरपीएफ शेजारील अपंगांचे पार्किंग याचा वापर करताना दिसतात.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील भागात लाखो रुपये खर्चून विकासकामे केली. परंतु प्रवाशांना साध्या पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नसल्यामुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत.

विनाकारण होते दंडात्मक कारवाईनागपूर शहरात सार्वजनिक प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, रेल्वेस्थानकात व्यवस्थाच नसल्यामुळे नागरिक रेल्वेस्थानकात प्रवेश करून प्लॅटफार्मवरील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जातात. बाहेर पडताना टीसीची नजर संबंधित नागरिकावर गेल्यास ते त्याला पकडतात. विनातिकीट समजून रेल्वेस्थानकात प्रवेश केल्याबद्दल २५० रुपये दंड ठोठावतात. यामुळे नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

स्वच्छता अभियानाची ऐशीतैशीरेल्वे मंत्रालयाने अधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक, परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. वेळोवेळी रेल्वे प्रशासन पथनाट्य, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून न दिल्यामुळे स्वच्छता अभियानाला रेल्वे प्रशासनाने तिलांजली दिल्याचा भास होत आहे. येथे स्वच्छतेबाबत कोणतीच खबरदारी प्रशासन घेताना दिसत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर