शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

लाखोंची विकासकामे मात्र स्वच्छतेकडे कानाडोळा; नागपूर स्थानकावर रेल्वे प्रशासनाची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 11:14 IST

मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.

ठळक मुद्देकेवळ महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यासाठी झाला परिसर स्वच्छ

दयानंद पाईकराव।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील सहा महिन्यात नागपूर रेल्वेस्थानकावर लाखो रुपये खर्चून विकासकामांचा सपाटा लावण्यात आला. रेल्वेस्थानकाच्या आत आणि बाहेर उद्यान तयार करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी महाव्यवस्थापकांच्या दौऱ्यानिमित्त रेल्वेस्थानक चकाचक करण्यात आले. बाहेरुन शोभेची झाडे, कुंड्या आणण्यात आल्या. परंतु सौंदर्यीकरणावर लाखो रुपये उधळणाऱ्या प्रशासनाने वारंवार मागणी होऊनही पश्चिमेकडील भागात साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नाही.यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यांना उघड्यावर लघुशंकेला जावे लागत असून रेल्वे प्रशासनाने अस्वच्छतेचे अभियान सुरु केले की काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.नागपूर रेल्वेस्थानकावर पश्चिमेकडील भागात एक आरक्षित तिकिटांचे तर दोन अनारक्षित तिकिटांचे कार्यालय आहे. येथे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सोईसुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. आरक्षण कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली नाही. पिण्याचे पाणी तर सोडा परंतु साध्या प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांची पंचाईत होत आहे. व्यवस्थाच नसल्यामुळे रेल्वेस्थानकावर येणारे नागरिक लघुशंकेसाठी रेल्वेस्थानक परिसरात पार्किंग, नव्याने तयार करण्यात आलेले गार्डन, आरपीएफ शेजारील अपंगांचे पार्किंग याचा वापर करताना दिसतात.यामुळे परिसरात दुर्गंधी पसरणे सुरू झाले आहे. रेल्वे प्रशासनाने पश्चिमेकडील भागात लाखो रुपये खर्चून विकासकामे केली. परंतु प्रवाशांना साध्या पिण्याचे पाणी आणि प्रसाधनगृह उपलब्ध करून दिले नसल्यामुळे नागरिक प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत.

विनाकारण होते दंडात्मक कारवाईनागपूर शहरात सार्वजनिक प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जाणाऱ्या नागरिकांना कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र, रेल्वेस्थानकात व्यवस्थाच नसल्यामुळे नागरिक रेल्वेस्थानकात प्रवेश करून प्लॅटफार्मवरील प्रसाधनगृहात लघुशंकेसाठी जातात. बाहेर पडताना टीसीची नजर संबंधित नागरिकावर गेल्यास ते त्याला पकडतात. विनातिकीट समजून रेल्वेस्थानकात प्रवेश केल्याबद्दल २५० रुपये दंड ठोठावतात. यामुळे नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

स्वच्छता अभियानाची ऐशीतैशीरेल्वे मंत्रालयाने अधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक, परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. वेळोवेळी रेल्वे प्रशासन पथनाट्य, बॅनर, पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती करते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर मात्र साधे प्रसाधनगृह उपलब्ध करून न दिल्यामुळे स्वच्छता अभियानाला रेल्वे प्रशासनाने तिलांजली दिल्याचा भास होत आहे. येथे स्वच्छतेबाबत कोणतीच खबरदारी प्रशासन घेताना दिसत नसल्यामुळे स्वच्छता अभियानाची ऐशीतैशी होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर