शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

लाखानींना २५ लाखांचा गंडा : नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:06 IST

जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

ठळक मुद्देजळगावच्या शेंगदाणा व्यापाऱ्याची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.खुशाल भगवानदास लाखानी (वय २४, रा. आदर्शनगर, जळगाव) हे आशीर्वाद अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाने राजकोट (गुजरात) येथून शेंगदाण्याचा व्यवसाय करतात. लाखानी दलालांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मागणीनुसार माल पाठवितात.१५ नोव्हेंबर २०१८ ला कळमन्यातील कृष्णा ट्रेडिंग कंपनी, कन्हैयालाल लालवानी (रा. इतवारी मस्कसाथ) याने लाखानी यांच्याशी संपर्क करून त्यांनी श्री कॉर्पोरेशनच्या मालकाचा नंबर दिला. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, तुम्हाला मोठी ऑर्डर मिळेल, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार लाखानी यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला असता, त्याने बालाजी कन्व्हर्सर(दलाल, इतवारी बाजार)चा संपर्क क्रमांक देऊन त्याच्याशी बोलायला सांगितले. त्यानुसार लाखानींनी बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकासोबत संपर्क केला असता त्याने १६ टन शेंगदाण्याची ऑर्डर दिली. माल पोहचल्यानंतर चार दिवसांनी पेमेंट मिळेल, असेही सांगितले. त्यानुसार लाखानींनी ३ जानेवारी २०१९ ला जलाराम ट्रान्सपोर्ट राजकोट येथून कृष्णा ट्रेडिंगमध्ये १२ लाख ६० हजारांचा शेंगदाणे पाठविले. ७ जानेवारीला शेंगदाणे नागपुरात पोहचले. त्यानंतर बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकाने संक्रांतीपूर्वी २५ टन शेंगदाणे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार लाखानींनी पुन्हा १७ लाख ७९ हजार ७५० रुपयांचा माल बालाजी कन्व्हर्सरला पाठविला. १२ जानेवारीला तो येथे पोहचला. ठरल्याप्रमाणे एकूण ४१ टन शेंगदाण्याचे ३० लाख ३९ हजार ७५० रुपये लाखानींना घ्यायचे होते. मात्र, त्यातील केवळ ५ लाख रुपये लाखानींना देऊन कृष्णा ट्रेडर्स तसेच बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकांनी २५ लाख ३९ हजार ७५० रुपयांची रक्कम हडपली. एवढेच नव्हे तर लाखानी ज्या मोबाईलवर संपर्क करीत होते, ते फोन आणि आपली दुकाने बंद करून आरोपी पळून गेले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने लाखानी यांनी बुधवारी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.अनेकांना गंडाया दलालांनी ज्या पद्धतीने आपली दुकाने बंद करून येथून पळ काढला. त्यावरून त्यांनी लाखानींसारखाच अन्य व्यापाऱ्यांनाही गंडा घातला असावा, असा संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी