शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लाखानींना २५ लाखांचा गंडा : नागपुरातील कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:06 IST

जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

ठळक मुद्देजळगावच्या शेंगदाणा व्यापाऱ्याची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जळगावच्या एका शेंगदाणा व्यापाऱ्याला नागपुरातील दोन दलालांनी २५ लाखांचा गंडा घातला. रक्कम बुडविणाऱ्या दलालांनी आपली दुकाने बंद करून नागपुरातून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.खुशाल भगवानदास लाखानी (वय २४, रा. आदर्शनगर, जळगाव) हे आशीर्वाद अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या नावाने राजकोट (गुजरात) येथून शेंगदाण्याचा व्यवसाय करतात. लाखानी दलालांच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मागणीनुसार माल पाठवितात.१५ नोव्हेंबर २०१८ ला कळमन्यातील कृष्णा ट्रेडिंग कंपनी, कन्हैयालाल लालवानी (रा. इतवारी मस्कसाथ) याने लाखानी यांच्याशी संपर्क करून त्यांनी श्री कॉर्पोरेशनच्या मालकाचा नंबर दिला. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, तुम्हाला मोठी ऑर्डर मिळेल, असे आरोपीने सांगितले. त्यानुसार लाखानी यांनी संबंधित व्यक्तीशी संपर्क केला असता, त्याने बालाजी कन्व्हर्सर(दलाल, इतवारी बाजार)चा संपर्क क्रमांक देऊन त्याच्याशी बोलायला सांगितले. त्यानुसार लाखानींनी बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकासोबत संपर्क केला असता त्याने १६ टन शेंगदाण्याची ऑर्डर दिली. माल पोहचल्यानंतर चार दिवसांनी पेमेंट मिळेल, असेही सांगितले. त्यानुसार लाखानींनी ३ जानेवारी २०१९ ला जलाराम ट्रान्सपोर्ट राजकोट येथून कृष्णा ट्रेडिंगमध्ये १२ लाख ६० हजारांचा शेंगदाणे पाठविले. ७ जानेवारीला शेंगदाणे नागपुरात पोहचले. त्यानंतर बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकाने संक्रांतीपूर्वी २५ टन शेंगदाणे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार लाखानींनी पुन्हा १७ लाख ७९ हजार ७५० रुपयांचा माल बालाजी कन्व्हर्सरला पाठविला. १२ जानेवारीला तो येथे पोहचला. ठरल्याप्रमाणे एकूण ४१ टन शेंगदाण्याचे ३० लाख ३९ हजार ७५० रुपये लाखानींना घ्यायचे होते. मात्र, त्यातील केवळ ५ लाख रुपये लाखानींना देऊन कृष्णा ट्रेडर्स तसेच बालाजी कन्व्हर्सरच्या संचालकांनी २५ लाख ३९ हजार ७५० रुपयांची रक्कम हडपली. एवढेच नव्हे तर लाखानी ज्या मोबाईलवर संपर्क करीत होते, ते फोन आणि आपली दुकाने बंद करून आरोपी पळून गेले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने लाखानी यांनी बुधवारी कळमना ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींची चौकशी केली जात आहे.अनेकांना गंडाया दलालांनी ज्या पद्धतीने आपली दुकाने बंद करून येथून पळ काढला. त्यावरून त्यांनी लाखानींसारखाच अन्य व्यापाऱ्यांनाही गंडा घातला असावा, असा संशय आहे. पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी