शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लाडली लक्ष्मी ‘पुन्हा लाडात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलींचा जन्मदर वाढावा याकरिता केंद्र सरकारच्या ‘आयआरडीए’ने सुरू केलेली ‘लाडली लक्ष्मी’ नागपूर महापालिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मुलींचा जन्मदर वाढावा याकरिता केंद्र सरकारच्या ‘आयआरडीए’ने सुरू केलेली ‘लाडली लक्ष्मी’ नागपूर महापालिकेने राबविली. परंतु, या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ आणखी किती अधिक देता येईल, याकरिता पर्याय तपासण्याचे निर्देश देत तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी योजना बंद केली होती. जोवर अधिकच्या लाभासंदर्भातील पर्याय मिळत नाही, तोवर जुनी योजना राबविण्यात यवी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी मनपाच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत दिले.

प्रश्नोत्तराच्या तासात लाडली लक्ष्मी योजना बंद पडल्याचा मुद्दा दिव्या धुरडे यांनी उपस्थित केला. योजना बंद असल्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित असल्याने ही योजना सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तत्कालीन आयुक्तांनी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारा लाभ अधिक कसा करता येईल, याबाबतचा पर्याय शोधण्याकरिता ही योजना बंद केली असून, अर्ज घेणे बंद असून मागील वर्षी ऑगस्टपासून पालिकेने प्रीमिअम भरले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. विद्यमान आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी देखील तत्कालीन आयुक्तांच्या निर्णयावर सहमती दर्शविली. यावरून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली. यानंतर शहरातील भ्रूणहत्येची माहिती मागण्यात आली. शहरात अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर महापौरांनी हाच योजनेचा मूळ उद्देश असून मुलींचा जन्मदर वाढावा याकरिता योजना असल्याचे सांगत योजना सुरू करण्याचे निर्देश दिले.

....

लाभार्थ्यांपेक्षा कंपन्यांना अधिक लाभ : आयुक्त

लाडली लक्ष्मी योजनेत लाभार्थ्यांना केवळ ५ टक्केच फायदा झाला असून, कंपन्यांनाच लाभ झाला. योजनाही उत्तम आहे; परंतु प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. याचा अभ्यास करण्याची गरज आहे. योजनेंतर्गत रक्कम ही वेगवेगळ्या मार्गाने गुंतविल्यास लाभार्थ्यांना चांगला लाभ देता येऊ शकतो. यात काही वाईट नसून, योजनेत तसे पर्याय असणे गरजेचे असल्याचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

....

कंपन्याला फायदा झाल्याचा पुरावा काय? - महापौर

‘लाडली लक्ष्मी’ योजनेनुसार ० ते १ वर्ष वयोगटातील शहरातील बीपीएल कुटुंबातील मुलीला लाभ दिला जातो. योजनेतून महापालिकेला नुकसान झाले असेल, लाभार्थ्यांना लाभ मिळाला नसेल आणि कंपन्यांचा फायदा झाला असेल तर तसा कुठला सर्व्हे, अहवाल आहे का? असा सवाल करून नवा पर्याय मिळेल तोवर जुनी योजना जशीची तशी सुरू करण्यात यावी, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

--------------------------