शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित : खासदार नामग्याल यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:08 IST

लद्दाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी दावा केला की, लेह लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होईल. या परिसरात राष्ट्रवादाची भावना आहे. येथील लोक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे. ते म्हणाले सरकारने कलम ३७० काढल्यानंतर लद्दाखने विकासाची गती पकडली आहे.

ठळक मुद्देकलम ३७० काढल्याने बदलली दशा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लद्दाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी दावा केला की, लेह लद्दाखच्या विकासामुळे देशाच्या सीमा सुरक्षित होईल. या परिसरात राष्ट्रवादाची भावना आहे. येथील लोक देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे. ते म्हणाले सरकारने कलम ३७० काढल्यानंतर लद्दाखने विकासाची गती पकडली आहे. शिक्षण, ऊर्जा व रेल्वे सुविधा निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले जात आहे.जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक समितीच्या महर्षी व्यास सभागृहात आयोजित ‘लद्दाख काल आणि आज’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यात नामग्याल बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्रीधरराव गाडगे उपस्थित होते. त्याचबरोबर आमदार कृष्णा खोपडे, अनिल सोले, मोहन मते, जम्मू कश्मीर अध्ययन केंद्राच्या मीरा खडक्कार, जिव्हाळा फाऊंडेशनचे आशिष वांदिले व मनीष मेश्राम उपस्थित होते. नामग्याल म्हणाले सरकारचा कलम ३७० हटविण्याचा निर्णय धाडसी होता. एकेकाळी लेह-लद्दाख येथील लोकांचे कुणीच कैवारी नव्हते. या भागाला पडिक जमिनीचे क्षेत्र म्हटले जात होते. जम्मू काश्मिरातील लोक लढून-झगडून आपल्या मागण्या पूर्ण करीत होते. परंतु लेह-लद्दाखमध्ये असे होत नव्हते. येथे डिग्री कॉलेज देखील नव्हते. नोकऱ्या मिळत नव्हत्या. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अन्य राज्यात जावे लागत होते. कलम ३७० काढल्यानंतर राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे विद्यापीठ सुरू होत आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट कॉलेज सुरू होण्यास सुरुवात झाली आहे. जनता खूश आहे.दरम्यान श्रीधरराव गाडगे म्हणाले की, नागरिकता संशोधन कायद्यात नवीन काहीच नाही. केवळ हिंदू शब्दाला परिभाषित केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर देशाचा विरोध केला जात आहे. यासाठी सजग राहण्याची गरज आहे.सौर ऊर्जेला भरपूर संधीनामग्याल म्हणाले लद्दाखमध्ये सौर ऊर्जेचे उत्पादन करण्यासाठी भरपूर संधी आहे. लद्दाख पूर्ण जगाला वीज पुरवठा करण्याची क्षमता ठेवतो. त्याचप्रकारे पर्यटन क्षेत्राचाही येथे विकास होऊ शकतो. आपल्या सांस्कृतीचे जतन करणारे हे राज्य सुख, शांती, प्रेम करुणेचा संदेश देणारे आहे.व्होटबँकेसाठी देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्ननागरिकता संशोधन कायदा (सीएए) ला होत असलेल्या विरोधाबद्दल नामग्याल म्हणाले व्होटबॅँकेसाठी देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्माचे राजकारण करणारे पक्ष आज धर्मनिरपेक्षतेची शिकवण देत आहे. जे कधी भारतीय तिरंगा व संविधानावर बोलत नव्हते, ते आज संविधान धोक्यात असल्याचे सांगत, तिरंगा घेऊन फिरत आहे. वीर सावरकरांवर टीका केली जात आहे. हे सर्व ‘मोदी है तो मुमकिन है’ चे उदाहरण आहे.पाकिस्तान, चीनचा कब्जानामग्याल म्हणाले लद्दाखच्या काही भागावर चीन व पाकिस्तानचा कब्जा आहे. पाकिस्तानने लद्दाखचा ५ हजार वर्ग किलोमीटरचे क्षेत्र चीनला दिले आहे. अक्साई चीन हा भारताचा भाग होता, तोही चीनला दिला. लद्दाख- तिब्बत सीमा वाद मोठा करण्यात आला. मोदी सरकारच्या कार्यकाळात सध्या घुसखोरीला लगाम लागला आहे. आता लोक बॉर्डर पार करण्यास भित आहे. भारत आता सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूचा सफाया करीत आहे.

टॅग्स :ladakhलडाखchinaचीन